शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

आयुष्यातील सर्वात आनंदाची दोन वर्षे कोणती? काय सांगतो रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 16:58 IST

आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. त्यातून अनेक अनुभव येत असून त्याबाबतच्या अनेक आठवणी आपल्या मनात घर करून राहतात.

आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. त्यातून अनेक अनुभव येत असून त्याबाबतच्या अनेक आठवणी आपल्या मनात घर करून राहतात. जेव्हाही आपण कधी मागे वळून आयुष्यात घडलेल्या घटनांकडे पाहतो. त्यावेळी त्या आठवणींमुळे नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. मग ती शाळेतील मस्ती असो किंवा कॉलेजमधील फूल-टू धमाल. आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींपैकी अशा अनेक गोष्टी असतात, ज्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. त्या आठवणींमध्ये अनेकदा आपण रमतो. आपल्या प्रत्येकाच्याच आयु्ष्यात असे अनेक क्षण येतात जे आपल्या हृदयाच्या फार जवळ असतात. अशातच एका रिसर्चमधून व्यक्तीच्या आयुष्यातील दोन सर्वात आनंदी वर्षांचा खुलासा करण्यात आला आहे. 

द सेंटर ऑफ इकोनॉमिक्समार्फत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील 17 ते 85 वयोगट असणाऱ्या 23 हजार व्यक्तींचा सर्व्हे करण्यात आला. त्यासाठी या व्यक्तींना त्यांच्या जीवनाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये पुढच्या पाच वर्षांत तुमच्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी तुम्ही काय करणार? या प्रश्नाचाही समावेश होता. त्यानंतर पाच वर्षांनी याच व्यक्तींचे पुन्हा इंटरव्ह्यू घेण्यात आले. त्यामध्ये त्यांनी पाच वर्षांपूर्वी ठरविल्याप्रमाणे आनंद उपभोगला की नाही याबाबत विचारण्यात आले. 

संशोधनातून अभ्यासकांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, व्यक्तीची आनंदाची पातळी वयाच्या 23 आणि 69 वर्षी वाढते. याव्यतिरिक्त वयवर्ष 20 ते 70 दरम्यान आनंदाची पातळी ही कमी असते. निष्कर्षानुसार, व्यक्ती 23 वर्षांची असते तेव्हा अत्यंत उत्साही असते. तिच्या आयुष्याकडून अनेक अपेक्षा असतात. तसेच ज्यावेळी व्यक्ती 69 वर्षांची होते त्यावेळी तिेने आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात. तसेच कामाचा ताणही नसतो. त्यामुळे ती व्यक्ती शांत आणि टेन्शन फ्री असते. 

संशोधनातून असं समोर आलं की, व्यक्ती तरूण असताना आयुष्यातील आनंद वाढविण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच प्रौढ व्यक्ती त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकदा मुलांनी ठरविलेल्या काही गोष्टी करण्यासाठी आई-वडिलांकडून नकार देण्यात येतो. म्हणूनच जेव्हा काही सदस्यांचा पाच वर्षांनी पुन्हा इंटरव्ह्यू घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ठरविल्याप्रमाणे काही झाले नाही. त्यांनी ठरवलेल्या आनंदाच्या सर्व संकल्पना अपूर्णच राहिल्या होत्या. 

आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. त्यामध्ये चांगल्या, वाईट अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशातच आनंद किंवा दुःखाचे प्रसंग हे कायमचे टिकत नाहीत. त्यामुळे टेन्शन न घेता आलेल्या संकटांमधून योग्य तो मार्ग काढत आनंदाचा शोध घेत आयुष्य जगायचे असते. शेवटी कोणीतरी सांगितलेच आहे, 'कल किसने देखा है'

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य