शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वयानुसार कुणी किती पाणी प्यायला हवं? आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत आणि वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 14:42 IST

World Water Day : भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा-शरीर हायड्रेटेड राहतं आणि त्वचा आणखी तरूण दिसते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा येतो.

World Water Day : सध्या उन्हाळा सुरू आहे आणि पाणी भरपूर पिण्याचा सल्ला सगळेच देतात. अशात आज वर्ल्ड वाटर डे (World Water Day) आहे. दरवर्षी 22 मार्चचा हा दिवस पाळला जातो. या दिवशी पाणी पिण्याचं महत्व लोकांना सांगितलं जातं आणि त्याबाबत जागरूकता केली जाते. एका रिपोर्टनुसार, 2.2 अब्ज लोक स्वच्छ पाण्यापासून दूर आहेत.

मनुष्याचं साधारण 70 टक्के शरीर पाण्यापासून बनलेलं असतं. पाणी शरीरातील पेशींना पोषक तत्व देण्याचं आणि शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं महत्वाचं काम करतं. पाण्यात अनेक पोषक तत्व असतात जे शरीर निरोगी ठेवतात. पाण्याशिवाय जगणं याचा विचारच केला जाऊ शकत नाही. त्यामुळे भरपूर पाणी प्यायला हवं.

भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा-शरीर हायड्रेटेड राहतं आणि त्वचा आणखी तरूण दिसते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा येतो. पाणी किडनीला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. 

तुम्हाला कदाचित माहीत नसेल मेंदुचा 73 टक्के भाग पाण्यापासून बनलेला असतो. डिहायड्रेशनमुळे मेंदुची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि डोकेदुखीसोबत इतरही समस्या वाढू शकतात. अशात तुम्ही तुमच्या वजनानुसार दिवसातून किती प्यायला पाहिजे हे तुम्हाला माहीत असायला हवं.

रोज किती पाणी प्यावं?

रोज एका व्यक्तीने किती पाणी प्यायला हवं हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. जसे की, वजन, वय, लिंह आणि तुम्ही कोणतं काम करता. प्रत्येकासाठी पाण्याचं प्रमाण एकसारखं असू शकत नाही. पण सामान्यपणे एका व्यक्तीने दिवसातून 2 ते 3 लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

वयानुसार किती प्यावं पाणी

मेयो क्लीनिकनुसार, एक निरोगी आणि व्यक्तीला प्रति किलोग्राम शरीराच्या वजनासाठी दर दिवसाला जवळपास 35 मिलीलीटर पाण्याची गरज असते. म्हणजे जेवढं जास्त तुमचं वजन असेल तेवढं जास्त पाणी तुम्हाला पावं लागेल. 

50 किलो वजन असणाऱ्यांनी रोज जवळपास 1.7 लीटर पाणी प्यावं.

60 किलो वजन असणाऱ्यांनी रोज साधारम 2.1 लीटर पाणी प्यावं.

70 किलो वजन असलेल्या व्यक्तींनी रोज साधारण 2.4 लीटर पाणी प्यावं.

80 किलो वजन असणाऱ्या व्यक्तींनी रोज जवळपास 2.8 लीटर पाणी प्यावं.

शारीरिक मेहनत जास्त असेल तर जास्त पाणी

जे लोक जास्त शारीरिक मेहनतीचं काम करतात किंवा जास्त व्यायाम करतात किंवा उष्ण भागात राहतात त्यांना घाम जास्त जातो. अशात त्यांना जास्त पाणी प्यावं लागतं. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी जास्त प्यावं लागतं.

आयुर्वेदातील पाणी पिण्याचे नियम

- भरपूर पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात. पण पाणी पचवणंही तेवढंच महत्वाचं असतं.

- घाम, बद्धकोष्ठता, तोंड कोरडं पडणे आणि लघवीचा रंग जास्त पिवळा झाला तर जास्त पाणी प्यावे.

- जेवण केल्यावर लगेच पाणी न पिता साधारण 30 मिनिटांनंतर पाणी प्यावे. याने पचन चांगलं होतं.

- वाताने पीडित लोकांनी जेवण केल्यावर 30 मिनिटांनी आणि जास्त वजन असलेल्या लोकांनी जेवणाच्या 30 मिनिटांआधी पाणी प्यावे.

- उभं राहून पाणी पिणं टाळलं पाहिजे. नेहमीच बसून पाणी प्यावे. तेव्हाच त्याचे फायदे मिळतील.

- पाणी कधीही ढसाढसा किंवा घाईने नाही तर एक एक घोट करून प्यावे.

- फ्रिजमधील थंड पाणी पिणं टाळा. उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिल्यास जास्त फायदे मिळतील.

- पाणी स्टोर करण्यासाठी माती किंवा तांब्याच्या भांड्याचा कमी आणि स्टीच्या भांड्याचा जास्त वापर करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWaterपाणी