शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

महिलांनो, वजन ठेवा आटोक्यात. शास्त्रज्ञांचा सल्ला

By admin | Updated: May 22, 2017 15:51 IST

सावधान. विशीनंतर वर्षाला पाऊणेदोन किलोपेक्षा अधिक वजन वाढत असेल, तर आजारांनी व्हाल त्रस्त

 - मयूर पठाडे

 
आरोग्याचं एक सर्वसाधारण सूत्र आहे. विविध प्रकारच्या आजारांपासून तुम्हाला वचायचं असेल तर आधी तुमचं वजन आटोक्यात ठेवा. कारण बरचसे आजार आपल्या चुकीच्या लाइफस्टाइलमुळे होतात. त्याचं पहिलं प्रतिबिंब पडतं ते आपल्या वजनात. त्यामुळे त्या त्या रोगांशी लढताना आणि त्यांना प्रतिबंध घालतानाही तुम्हाला पहिल्यांदा दोन हात करावे लागतात, ते या वाढत्या आणि वाढलेल्या वजनाशीच.
 
नुकत्याच झालेल्या संशोधनानं तर शास्त्रज्ञांनी सर्वांना; विशेषत: महिलांना सावधानतेचा इशारा दिला आहे, तुमच्या विशीत असतानाच तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा. हे नियंत्रण जर सुटलं तर त्यावर कंट्रोल ठेवणं नंतर अवघड जातं आणि भविष्यात तुम्हाला लठ्ठपणालाही सामोरं जावं लागू शकतं. 
त्यासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅँड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी विशीतील आणि तिशीतील महिलांचा अभ्यास केला आणि एक निष्कर्ष काढला. हा निष्कर्ष आणखी सोपा करून सांगताना या संशोधकांनी सरळ एक आराखडाच तयार केला.
वयाच्या विशीत असताना तुमचं वजन फार वाढू देऊ नका. समजा वयाच्या विशीत तुमचह वजन दरवर्षी साधारण पाऊणेदोन किलो किंवा त्यापेक्षा थोडं अधिक वाढत असेल, तर वयाच्या चाळीशीपर्यंत तुम्ही चांगले लठ्ठ झालेले असाल आणि आरोग्याच्या संदर्भातील अनेक व्याधींनी तुम्हाला घेरलेलंही असेल. 
वजन वर्षाला पाऊणेदोन किलो, म्हणजे काही फार नाही, महिन्याला छटाक दोन छटाक वजन वाढलं तर असं काय मोठं बिघडलं, असं कुणाला वाटू शकेल, पण त्यामुळे भविष्यात त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना समाोरं जावं लागू शकतं. 
त्यामुळे शास्त्रज्ञांनी महिलांना करायला अगदी सो असा सल्ला दिला आहे. वयाच्या विशीत असताना दीर्घ काळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपलं वजन वर्षाला पाऊणेदोन किलोपेक्षा जास्त वाढू देऊ नका. 
 
वजन वाढल्यानं काय होतं?
 
 
वजन आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण देतं. वाढतं वजन एकाचवेळी दोन मोठय़ा समस्यांना साोबत घेऊन येतं, ते म्हणजे लठ्ठपणा आणि डायबेटिस. एकदा हे दोघं आले की मग इतर आजारांनाही ते घरोबा करून देतात. 
विशषत: लाइफस्टाइलमुळे हे आजार होतात, पण या आजारांमुळे पुन्हा आपोआप तुमची लाइफस्टाइल बदलते, असं हे दुहेरी दुष्टचक्र आहे. 
शिवाय वाढत्या वजनामुळे होणारं मृत्यूंचं प्रमाणही खूप मोठं आहे. 
 
का वाढतं वजन?
वजन वाढीची अनेक कारणं आहेत. त्यात धुम्रपान हे एक. पण विशेषत: महिलांमध्ये वजनवाढीचं एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे लग्नानंतर गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाचं प्रमाण. त्यामुळे वजन वाढू शकतं. याशिवाय वैवाहिक समस्या, घटस्फोट, जोडीदाराचा मृत्यू, सांसारिक टेन्शन्स. यामळे महिलांचं वजन वाढू शकतं. रजोनिवृत्तीनंतरच्या काळात त्यामुळे छातीचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.