शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनो, वजन ठेवा आटोक्यात. शास्त्रज्ञांचा सल्ला

By admin | Updated: May 22, 2017 15:51 IST

सावधान. विशीनंतर वर्षाला पाऊणेदोन किलोपेक्षा अधिक वजन वाढत असेल, तर आजारांनी व्हाल त्रस्त

 - मयूर पठाडे

 
आरोग्याचं एक सर्वसाधारण सूत्र आहे. विविध प्रकारच्या आजारांपासून तुम्हाला वचायचं असेल तर आधी तुमचं वजन आटोक्यात ठेवा. कारण बरचसे आजार आपल्या चुकीच्या लाइफस्टाइलमुळे होतात. त्याचं पहिलं प्रतिबिंब पडतं ते आपल्या वजनात. त्यामुळे त्या त्या रोगांशी लढताना आणि त्यांना प्रतिबंध घालतानाही तुम्हाला पहिल्यांदा दोन हात करावे लागतात, ते या वाढत्या आणि वाढलेल्या वजनाशीच.
 
नुकत्याच झालेल्या संशोधनानं तर शास्त्रज्ञांनी सर्वांना; विशेषत: महिलांना सावधानतेचा इशारा दिला आहे, तुमच्या विशीत असतानाच तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा. हे नियंत्रण जर सुटलं तर त्यावर कंट्रोल ठेवणं नंतर अवघड जातं आणि भविष्यात तुम्हाला लठ्ठपणालाही सामोरं जावं लागू शकतं. 
त्यासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅँड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी विशीतील आणि तिशीतील महिलांचा अभ्यास केला आणि एक निष्कर्ष काढला. हा निष्कर्ष आणखी सोपा करून सांगताना या संशोधकांनी सरळ एक आराखडाच तयार केला.
वयाच्या विशीत असताना तुमचं वजन फार वाढू देऊ नका. समजा वयाच्या विशीत तुमचह वजन दरवर्षी साधारण पाऊणेदोन किलो किंवा त्यापेक्षा थोडं अधिक वाढत असेल, तर वयाच्या चाळीशीपर्यंत तुम्ही चांगले लठ्ठ झालेले असाल आणि आरोग्याच्या संदर्भातील अनेक व्याधींनी तुम्हाला घेरलेलंही असेल. 
वजन वर्षाला पाऊणेदोन किलो, म्हणजे काही फार नाही, महिन्याला छटाक दोन छटाक वजन वाढलं तर असं काय मोठं बिघडलं, असं कुणाला वाटू शकेल, पण त्यामुळे भविष्यात त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना समाोरं जावं लागू शकतं. 
त्यामुळे शास्त्रज्ञांनी महिलांना करायला अगदी सो असा सल्ला दिला आहे. वयाच्या विशीत असताना दीर्घ काळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपलं वजन वर्षाला पाऊणेदोन किलोपेक्षा जास्त वाढू देऊ नका. 
 
वजन वाढल्यानं काय होतं?
 
 
वजन आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण देतं. वाढतं वजन एकाचवेळी दोन मोठय़ा समस्यांना साोबत घेऊन येतं, ते म्हणजे लठ्ठपणा आणि डायबेटिस. एकदा हे दोघं आले की मग इतर आजारांनाही ते घरोबा करून देतात. 
विशषत: लाइफस्टाइलमुळे हे आजार होतात, पण या आजारांमुळे पुन्हा आपोआप तुमची लाइफस्टाइल बदलते, असं हे दुहेरी दुष्टचक्र आहे. 
शिवाय वाढत्या वजनामुळे होणारं मृत्यूंचं प्रमाणही खूप मोठं आहे. 
 
का वाढतं वजन?
वजन वाढीची अनेक कारणं आहेत. त्यात धुम्रपान हे एक. पण विशेषत: महिलांमध्ये वजनवाढीचं एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे लग्नानंतर गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाचं प्रमाण. त्यामुळे वजन वाढू शकतं. याशिवाय वैवाहिक समस्या, घटस्फोट, जोडीदाराचा मृत्यू, सांसारिक टेन्शन्स. यामळे महिलांचं वजन वाढू शकतं. रजोनिवृत्तीनंतरच्या काळात त्यामुळे छातीचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.