शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

महिलांनो, वजन ठेवा आटोक्यात. शास्त्रज्ञांचा सल्ला

By admin | Updated: May 22, 2017 15:51 IST

सावधान. विशीनंतर वर्षाला पाऊणेदोन किलोपेक्षा अधिक वजन वाढत असेल, तर आजारांनी व्हाल त्रस्त

 - मयूर पठाडे

 
आरोग्याचं एक सर्वसाधारण सूत्र आहे. विविध प्रकारच्या आजारांपासून तुम्हाला वचायचं असेल तर आधी तुमचं वजन आटोक्यात ठेवा. कारण बरचसे आजार आपल्या चुकीच्या लाइफस्टाइलमुळे होतात. त्याचं पहिलं प्रतिबिंब पडतं ते आपल्या वजनात. त्यामुळे त्या त्या रोगांशी लढताना आणि त्यांना प्रतिबंध घालतानाही तुम्हाला पहिल्यांदा दोन हात करावे लागतात, ते या वाढत्या आणि वाढलेल्या वजनाशीच.
 
नुकत्याच झालेल्या संशोधनानं तर शास्त्रज्ञांनी सर्वांना; विशेषत: महिलांना सावधानतेचा इशारा दिला आहे, तुमच्या विशीत असतानाच तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा. हे नियंत्रण जर सुटलं तर त्यावर कंट्रोल ठेवणं नंतर अवघड जातं आणि भविष्यात तुम्हाला लठ्ठपणालाही सामोरं जावं लागू शकतं. 
त्यासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅँड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी विशीतील आणि तिशीतील महिलांचा अभ्यास केला आणि एक निष्कर्ष काढला. हा निष्कर्ष आणखी सोपा करून सांगताना या संशोधकांनी सरळ एक आराखडाच तयार केला.
वयाच्या विशीत असताना तुमचं वजन फार वाढू देऊ नका. समजा वयाच्या विशीत तुमचह वजन दरवर्षी साधारण पाऊणेदोन किलो किंवा त्यापेक्षा थोडं अधिक वाढत असेल, तर वयाच्या चाळीशीपर्यंत तुम्ही चांगले लठ्ठ झालेले असाल आणि आरोग्याच्या संदर्भातील अनेक व्याधींनी तुम्हाला घेरलेलंही असेल. 
वजन वर्षाला पाऊणेदोन किलो, म्हणजे काही फार नाही, महिन्याला छटाक दोन छटाक वजन वाढलं तर असं काय मोठं बिघडलं, असं कुणाला वाटू शकेल, पण त्यामुळे भविष्यात त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना समाोरं जावं लागू शकतं. 
त्यामुळे शास्त्रज्ञांनी महिलांना करायला अगदी सो असा सल्ला दिला आहे. वयाच्या विशीत असताना दीर्घ काळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपलं वजन वर्षाला पाऊणेदोन किलोपेक्षा जास्त वाढू देऊ नका. 
 
वजन वाढल्यानं काय होतं?
 
 
वजन आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण देतं. वाढतं वजन एकाचवेळी दोन मोठय़ा समस्यांना साोबत घेऊन येतं, ते म्हणजे लठ्ठपणा आणि डायबेटिस. एकदा हे दोघं आले की मग इतर आजारांनाही ते घरोबा करून देतात. 
विशषत: लाइफस्टाइलमुळे हे आजार होतात, पण या आजारांमुळे पुन्हा आपोआप तुमची लाइफस्टाइल बदलते, असं हे दुहेरी दुष्टचक्र आहे. 
शिवाय वाढत्या वजनामुळे होणारं मृत्यूंचं प्रमाणही खूप मोठं आहे. 
 
का वाढतं वजन?
वजन वाढीची अनेक कारणं आहेत. त्यात धुम्रपान हे एक. पण विशेषत: महिलांमध्ये वजनवाढीचं एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे लग्नानंतर गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाचं प्रमाण. त्यामुळे वजन वाढू शकतं. याशिवाय वैवाहिक समस्या, घटस्फोट, जोडीदाराचा मृत्यू, सांसारिक टेन्शन्स. यामळे महिलांचं वजन वाढू शकतं. रजोनिवृत्तीनंतरच्या काळात त्यामुळे छातीचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.