शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नारळ पाणी रात्री प्यावे की नाही? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 09:29 IST

Coconut Water : जर तुम्ही नारळ पाणी रात्री पित असाल तर याने काही नुकसानही होतात. नारळ पाणी रात्री प्यायल्याने काय काय नुकसान होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Coconut Water : नारळाचं पाणी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि अनेक गंभीर समस्यांचा धोका टाळण्यासाठी फार फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यात लोक नारळाच्या पाण्याचं भरपूर सेवन करतात. यातून अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराला मिळतात. पण हे फायदे शरीराला तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने त्याचं सेवन कराल. नारळ पाणी पिण्याची योग्य वेळही तुम्हाला माहीत असली पाहिजे. 

एक्सपर्टनुसार, नारळ पाणी पिण्याची सगळ्यात योग्य सकाळी आणि दुपारी आहे. पण जर तुम्ही नारळ पाणी रात्री पित असाल तर याने काही नुकसानही होतात. नारळ पाणी रात्री प्यायल्याने काय काय नुकसान होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच नारळ पाणी पिण्याची योग्य पद्धतही जाणून घेऊ.

जास्त लघवी लागणे

नारळ पाण्यात नॅचरल ड्यूरेटिक तत्व असतात. त्यामुळे रात्री नारळ पाण्याचं सेवन केल्याने तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याची समस्या होऊ शकते. याने तुमची झोपही खराब होते.

पचनासंबंधी समस्या

रात्री काही लोकांना नारळ पाण्यातील शुगर आणि इलेक्ट्रोलाइट्स पचवण्यास समस्या होऊ शकते. यामुळे पोट फुगणे, गॅस आणि पोटासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. त्यामुळे रात्री नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे.

शुगर वाढू शकते

नारळ पाण्यात नॅचरल शुगर भरपूर असते. त्यामुळे रात्री नारळ पाणी प्यायल्याने काही लोकांमध्ये शुगरची लेव्हल वाढू शकते. खासकरून डायबिटीस असलेल्या लोकांनी रात्री नारळ पाणी पिऊ नये.

झोप येत नाही

नारळ पाण्यात भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे ऊर्जा वाढवतात. रात्री नारळ पाण्याचं सेवन केल्याने तुमच्यातील अॅक्टिवनेस वाढतो. ज्यामुळे झोप न येण्याची समस्या होऊ शकते.

अधिक हायड्रेशन

रात्री नारळ पाणी प्यायल्याने शरीरात अधिक हायड्रेशन होऊ शकतं. अधिक हायड्रेशनमुळे इलेक्ट्रोलाइटचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे थकवा, मांसपेशींमध्ये वेदना आणि इतरही काही समस्या होऊ शकतात.

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ

मनारळ पाणी रिकाम्या पोटी किंवा दुपारी पिणं अधिक चांगलं मानलं जातं. सकाळी रिकाम्या पोटी नारळाचं पाणी प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्याशिवाय डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. सकाळी नारळ पाणी प्याल तर हार्टबर्न, एसिडिटी आणि मॉर्निंग सिकनेस दूर होतं.

वर्कआउट करण्याआधी किंवा नंतर नारळ पाणी पिता येऊ शकतं. नारळ पाणी हे एक हायड्रेटिंग ड्रिंक आहे आणि शरीराला ऊर्जा देतं. अशात हे तुम्ही एनर्जी बूस्टिंग ड्रिंकसारखं पिऊ शकता.

दुपारच्या वेळ नारळ पाणी प्याल तर याने पचन क्रिया चांगली होते. याने डायजेशनसंबंधी वेगवेगळ्या समस्याही दूर होतात. जेवण केल्यावर पोट फुगण्याची समस्याही होत नाही. नारळ पाण्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होतात ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य