शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हृदयरोग असलेल्यांनी पाणी कमी प्यावं? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 11:32 IST

Heart patient Tips : सामान्यपणे पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा मिळतो. पण जसा विषय हृदयरोगांच्या रूग्णांचा येतो तेव्हा हा नियम लागू पडत नाही.

Heart patient Tips : सामान्यपणे असंच ऐकायला मिळतं की, चांगल्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं असतं. सल्ला दिला जातो की, दिवसभरातून कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे. काही लोक सांगतात की, निरोगी राहण्यासाठी रोज कमीत कमी 2 ते 4 लीटर पाणी प्यावे. असो, सामान्यपणे पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा मिळतो. पण जसा विषय हृदयरोगांच्या रूग्णांचा येतो तेव्हा हा नियम लागू पडत नाही. त्यांना पाणी कमी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे आम्ही नाही तर एक्सपर्ट्स सांगतात. चला जाणून घेऊन  हृदयरोगाच्या रूग्णांनी पाणी कमी प्यावं का? दिवसभरातून किती पाणी प्यावे?

पाणी कमी का प्यावं?

एक्सपर्ट्सनुसार, हृदयरोगाच्या रूग्णांनी जास्त पाणी पिऊ नये. यामुळे त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो. केवळ पाणी नाहीतर इतर पेय पदार्थ जसे की, ज्यूस, दूधही कमी प्यावं. याचं कारण हार्टच्या रूग्णांनी जास्त पाणी प्यायल्याने पाणी फुप्फुसात जास्त जमा होऊ लागतं ज्यामुळे पाय, मांड्या आणि कंबरेवर सूज येऊ लागते. ज्यामुळे तुमच्या हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. इतकंच नाहीतर  फुप्फुसांमध्ये पाणी जमा होण्याचा धोकाही वाढतो. ज्यामुळे रूग्णाला श्वास घेण्यास समस्या होऊ शकते.

किती पाणी प्यावं?

तसं तर एका निरोगी व्यक्तीने कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायला हवं. पण हार्टच्या रूग्णांनी हिवाळ्यात दिवसभरात दीड लीटर पाणी प्यावं. तेच उन्हाळ्यात कमीत कमी दोन लीटर पाणी प्यावं. हृदयरोग असलेल्यांनी पाणी एकाचवेळी नाही तर थोड्या थोड्या वेळाने प्यायलं पाहिजे. एकाचवेळी जास्त पाणी प्यायल्याने हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे रूग्णाला श्वास घेण्यास समस्या होऊ शकते.

कधी होतं क्रोनिक डिहाइड्रेशन?

जर सहा महिन्यांपासून सतत शरीरात पाणी कमी असेल तर यामुळे क्रोनिक हायपोटेंशनची समस्या होऊ शकते. हायपोटेंशनला सोप्या भाषेत सांगायचं तर ब्लड प्रेशर लो होणं. जर शरीरात 2 ते 5 टक्के दरम्यान पाणी कमी झालं तर याला माइल्ड डिहायड्रेशन म्हणतात. तेच जर 5 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणी कमी झालं तर याला क्रोनिक डिहायड्रेशन म्हटलं जातं.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य