शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

जेवण केल्यावर आंघोळ न करण्याचा का दिला जातो सल्ला? वाचाल तर रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 09:44 IST

After and Before Meal Habit : जास्तीत जास्त लोक जेवणाआधी आणि नंतर काहीना काही चुका करतात. ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात.

After and Before Meal Habit : रोज दोन ते तीन वेळ जेवण करणं ही आपल्या शरीराची गरज असते. कारण आहाराशिवाय आरोग्य चांगलं राहू शकत नाही. जेवणाचे काही नियम असतात. पण सगळेच लोक ते फॉलो करतात असं नाही. जास्तीत जास्त लोक जेवणाआधी आणि नंतर काहीना काही चुका करतात. ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जेवणाआधी आणि नंतर कोणत्या चुका करू नये याबाबत सांगणार आहोत, जेणेकरून तुमचं आरोग्य बिघडू नये. 

जेवणानंतर आंघोळ करू नये

जर जेवण केल्यानंतर आंघोळ केली तर याबाबत म्हटलं जातं की, जेवण केल्यावर २ तासांपर्यंत आंघोळ करू नये. अन्न पचवण्यासाठी शरीराचं फायर एलिमेंट जबाबदार असतं, जसेही तुम्ही जेवण करता तेव्हा फायर एलिमेंट अ‍ॅक्टिव होतं. ज्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. हे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण जर तुम्ही जेवण केल्यावर आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया हळुवार होते.

जेवणानंतर किती वेळाने करावी आंघोळ?

एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यावर आंघोळ करणं नुकसानकारक ठरतं. याने अ‍ॅसिडिटी, उलटी अशा समस्या होतात. इतकंच नाही तर तुमचा लठ्ठपणाही वाढू शकतो. नियमानुसार, व्यक्तीने जेवणाआधी आंघोळ केली पाहिजे. कारण जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा प्रत्येक पेशी री-एनर्जाइज्ड होतात आणि आपल्याला फ्रेश वाटतं. याने आपल्या शरीराला भूक लागल्याचे सिग्नल मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर साधारण १ तासानंतर आंघोळ करावी.

जेवणानंतर लगेच झोपू नये

जेवण केल्यावर लगेच झोपणंही आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. यामुळे अन्न व्यवस्थित पचन होत नाही. असं केलं तर शरीरात फॅट जमा होऊ लागतं आणि लठ्ठपणाचा धोका अधिक वाढतो. अन्न चांगलं पचन व्हावं यासाठी गरजेचं आहे की, जेवण केल्यावर काही वेळ पायी चालावं. 

जास्त पाणी पिऊ नये

जेवणानंतर पाणी पिणं फार गरजेचं असतं. कारण याने अन्न पचन होण्यास मदत मिळते. पण जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय चुकीची आहे. जेवणानंतर लगेच भरपूर पाणी प्याल तर अन्न पचन होत नाही. अशात पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. त्यामुळे जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य