शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

खूप भात खाऊनही लठ्ठ का होत नाही साऊथचे लोक? जाणून घ्या भात बनवण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 12:49 IST

भात जगात सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. भारतात भात सगळ्यात जास्त खाल्ला जातो, खासकरून साऊथ इंडियात.

जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर जास्तीत जास्त लोक तुम्हाला भात न खाण्याचा सल्ला देतात. कारण असं मानलं जातं की, भात खाल्ल्याने वजन वाढतं. यामुळे भात आवडणारे लोकही भात खात नाही. भात जगात सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. भारतात भात सगळ्यात जास्त खाल्ला जातो, खासकरून साऊथ इंडियात.

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, साऊथ इंडियातील अनेक फेमस डिश जसे की, इटली, डोसा, उत्तप्पा इत्यादींमध्ये तांदळाचा वापर केला जातो. त्याशिवाय येथील लोक जेवणातही भात भरपूर खातात. आता प्रश्न हा आहे की, जर भात खाल्ल्याने वजन वाढतं तर मग येथील लोक लठ्ठपणाचे शिकार का नाहीत?

भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं?

सगळ्यात आधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं का? संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्राचे संस्थापक आणि आयुर्वेद एक्सपर्ट महारुद्र शंकर शेटे यांच्यानुसार, पांढऱ्या तांदळाला रिफाइंड केलं जातं. यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. यात हाय ग्लायसेमिक इंडेक्सही जास्त असतो आणि रिफायनिंग प्रोसेस दरम्यान फायबरसहीत अनेक मिनरल्स नष्ट होतात. हेच कारण आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती पांढरा भात खातात तेव्हा त्यांच्या शरीरात शुगर लवकर तुटते आणि रक्तात मिक्स होते. हेच मुख्य कारण आहे की, जास्तीत जास्त लोक लठ्ठपणा किंवा वजन वाढण्यासाठी पांढऱ्या भाताला जबाबदार मानतात.

साऊथ इंडियन लोक भात खाऊनही लठ्ठ का नाही?

एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमधील लोक इतका भात खातात तरीही त्यांना काही होत नाही. इतर राज्यातील लोक थोडा भात खात असतील तरी त्यांचं वजन वाढतं. याचं एक मोठं कारण म्हणजे साऊथमध्ये तांदळाला पॉलिश केलं जात नाही. इतर राज्यांमध्ये पांढरा तांदूळ दोन ते तीन वेळा पॉलिश केला जातो. जो अनेक आजारांचं कारण ठरतो.

भात बनवण्याची योग्य पद्धत

एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमध्ये भात बनवण्याची पद्धत त्यांना लठ्ठ होऊ देत नाही. साऊथमध्ये लोक सामान्य तांदळाचा वापर करतात आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भात शिजवण्यासाठी प्रेशर कूकरचा वापर करत नाहीत. ते पातेल्यात भात शिजवतात. पातेल्यात भात शिजवताना त्यात जो फेस येतो तो ते काढून टाकतात. मुळात तांदळाच्या पाण्यावर येणारा फेसच लठ्ठपणासहीत अनेक आजारांचं कारण बनतो. त्यामुळे भात नेहमी पातेल्यात शिजवा.

रोज किती भात खावा?

एक्सपर्ट्स मानतात की, तांदळांमध्ये पोर्शन कंट्रोलही फार गरजेचं आहे म्हणजे तुम्ही किती भात खात आहात यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. केवळ भातच नाही तर तुम्ही काहीही जास्त खाल्लं तर तुमच्या शरीराला नुकसान होईल. अनेक राज्यांमध्ये कमीत कमी एक वेळा भात खाल्ला जातो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य