शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

खूप भात खाऊनही लठ्ठ का होत नाही साऊथचे लोक? जाणून घ्या भात बनवण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 12:49 IST

भात जगात सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. भारतात भात सगळ्यात जास्त खाल्ला जातो, खासकरून साऊथ इंडियात.

जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर जास्तीत जास्त लोक तुम्हाला भात न खाण्याचा सल्ला देतात. कारण असं मानलं जातं की, भात खाल्ल्याने वजन वाढतं. यामुळे भात आवडणारे लोकही भात खात नाही. भात जगात सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. भारतात भात सगळ्यात जास्त खाल्ला जातो, खासकरून साऊथ इंडियात.

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, साऊथ इंडियातील अनेक फेमस डिश जसे की, इटली, डोसा, उत्तप्पा इत्यादींमध्ये तांदळाचा वापर केला जातो. त्याशिवाय येथील लोक जेवणातही भात भरपूर खातात. आता प्रश्न हा आहे की, जर भात खाल्ल्याने वजन वाढतं तर मग येथील लोक लठ्ठपणाचे शिकार का नाहीत?

भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं?

सगळ्यात आधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं का? संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्राचे संस्थापक आणि आयुर्वेद एक्सपर्ट महारुद्र शंकर शेटे यांच्यानुसार, पांढऱ्या तांदळाला रिफाइंड केलं जातं. यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. यात हाय ग्लायसेमिक इंडेक्सही जास्त असतो आणि रिफायनिंग प्रोसेस दरम्यान फायबरसहीत अनेक मिनरल्स नष्ट होतात. हेच कारण आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती पांढरा भात खातात तेव्हा त्यांच्या शरीरात शुगर लवकर तुटते आणि रक्तात मिक्स होते. हेच मुख्य कारण आहे की, जास्तीत जास्त लोक लठ्ठपणा किंवा वजन वाढण्यासाठी पांढऱ्या भाताला जबाबदार मानतात.

साऊथ इंडियन लोक भात खाऊनही लठ्ठ का नाही?

एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमधील लोक इतका भात खातात तरीही त्यांना काही होत नाही. इतर राज्यातील लोक थोडा भात खात असतील तरी त्यांचं वजन वाढतं. याचं एक मोठं कारण म्हणजे साऊथमध्ये तांदळाला पॉलिश केलं जात नाही. इतर राज्यांमध्ये पांढरा तांदूळ दोन ते तीन वेळा पॉलिश केला जातो. जो अनेक आजारांचं कारण ठरतो.

भात बनवण्याची योग्य पद्धत

एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमध्ये भात बनवण्याची पद्धत त्यांना लठ्ठ होऊ देत नाही. साऊथमध्ये लोक सामान्य तांदळाचा वापर करतात आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भात शिजवण्यासाठी प्रेशर कूकरचा वापर करत नाहीत. ते पातेल्यात भात शिजवतात. पातेल्यात भात शिजवताना त्यात जो फेस येतो तो ते काढून टाकतात. मुळात तांदळाच्या पाण्यावर येणारा फेसच लठ्ठपणासहीत अनेक आजारांचं कारण बनतो. त्यामुळे भात नेहमी पातेल्यात शिजवा.

रोज किती भात खावा?

एक्सपर्ट्स मानतात की, तांदळांमध्ये पोर्शन कंट्रोलही फार गरजेचं आहे म्हणजे तुम्ही किती भात खात आहात यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. केवळ भातच नाही तर तुम्ही काहीही जास्त खाल्लं तर तुमच्या शरीराला नुकसान होईल. अनेक राज्यांमध्ये कमीत कमी एक वेळा भात खाल्ला जातो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य