शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

खूप भात खाऊनही लठ्ठ का होत नाही साऊथचे लोक? जाणून घ्या भात बनवण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 12:49 IST

भात जगात सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. भारतात भात सगळ्यात जास्त खाल्ला जातो, खासकरून साऊथ इंडियात.

जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर जास्तीत जास्त लोक तुम्हाला भात न खाण्याचा सल्ला देतात. कारण असं मानलं जातं की, भात खाल्ल्याने वजन वाढतं. यामुळे भात आवडणारे लोकही भात खात नाही. भात जगात सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. भारतात भात सगळ्यात जास्त खाल्ला जातो, खासकरून साऊथ इंडियात.

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, साऊथ इंडियातील अनेक फेमस डिश जसे की, इटली, डोसा, उत्तप्पा इत्यादींमध्ये तांदळाचा वापर केला जातो. त्याशिवाय येथील लोक जेवणातही भात भरपूर खातात. आता प्रश्न हा आहे की, जर भात खाल्ल्याने वजन वाढतं तर मग येथील लोक लठ्ठपणाचे शिकार का नाहीत?

भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं?

सगळ्यात आधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं का? संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्राचे संस्थापक आणि आयुर्वेद एक्सपर्ट महारुद्र शंकर शेटे यांच्यानुसार, पांढऱ्या तांदळाला रिफाइंड केलं जातं. यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. यात हाय ग्लायसेमिक इंडेक्सही जास्त असतो आणि रिफायनिंग प्रोसेस दरम्यान फायबरसहीत अनेक मिनरल्स नष्ट होतात. हेच कारण आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती पांढरा भात खातात तेव्हा त्यांच्या शरीरात शुगर लवकर तुटते आणि रक्तात मिक्स होते. हेच मुख्य कारण आहे की, जास्तीत जास्त लोक लठ्ठपणा किंवा वजन वाढण्यासाठी पांढऱ्या भाताला जबाबदार मानतात.

साऊथ इंडियन लोक भात खाऊनही लठ्ठ का नाही?

एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमधील लोक इतका भात खातात तरीही त्यांना काही होत नाही. इतर राज्यातील लोक थोडा भात खात असतील तरी त्यांचं वजन वाढतं. याचं एक मोठं कारण म्हणजे साऊथमध्ये तांदळाला पॉलिश केलं जात नाही. इतर राज्यांमध्ये पांढरा तांदूळ दोन ते तीन वेळा पॉलिश केला जातो. जो अनेक आजारांचं कारण ठरतो.

भात बनवण्याची योग्य पद्धत

एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमध्ये भात बनवण्याची पद्धत त्यांना लठ्ठ होऊ देत नाही. साऊथमध्ये लोक सामान्य तांदळाचा वापर करतात आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भात शिजवण्यासाठी प्रेशर कूकरचा वापर करत नाहीत. ते पातेल्यात भात शिजवतात. पातेल्यात भात शिजवताना त्यात जो फेस येतो तो ते काढून टाकतात. मुळात तांदळाच्या पाण्यावर येणारा फेसच लठ्ठपणासहीत अनेक आजारांचं कारण बनतो. त्यामुळे भात नेहमी पातेल्यात शिजवा.

रोज किती भात खावा?

एक्सपर्ट्स मानतात की, तांदळांमध्ये पोर्शन कंट्रोलही फार गरजेचं आहे म्हणजे तुम्ही किती भात खात आहात यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. केवळ भातच नाही तर तुम्ही काहीही जास्त खाल्लं तर तुमच्या शरीराला नुकसान होईल. अनेक राज्यांमध्ये कमीत कमी एक वेळा भात खाल्ला जातो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य