शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

खूप भात खाऊनही लठ्ठ का होत नाही साऊथचे लोक? जाणून घ्या भात बनवण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 12:49 IST

भात जगात सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. भारतात भात सगळ्यात जास्त खाल्ला जातो, खासकरून साऊथ इंडियात.

जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर जास्तीत जास्त लोक तुम्हाला भात न खाण्याचा सल्ला देतात. कारण असं मानलं जातं की, भात खाल्ल्याने वजन वाढतं. यामुळे भात आवडणारे लोकही भात खात नाही. भात जगात सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. भारतात भात सगळ्यात जास्त खाल्ला जातो, खासकरून साऊथ इंडियात.

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, साऊथ इंडियातील अनेक फेमस डिश जसे की, इटली, डोसा, उत्तप्पा इत्यादींमध्ये तांदळाचा वापर केला जातो. त्याशिवाय येथील लोक जेवणातही भात भरपूर खातात. आता प्रश्न हा आहे की, जर भात खाल्ल्याने वजन वाढतं तर मग येथील लोक लठ्ठपणाचे शिकार का नाहीत?

भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं?

सगळ्यात आधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं का? संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्राचे संस्थापक आणि आयुर्वेद एक्सपर्ट महारुद्र शंकर शेटे यांच्यानुसार, पांढऱ्या तांदळाला रिफाइंड केलं जातं. यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. यात हाय ग्लायसेमिक इंडेक्सही जास्त असतो आणि रिफायनिंग प्रोसेस दरम्यान फायबरसहीत अनेक मिनरल्स नष्ट होतात. हेच कारण आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती पांढरा भात खातात तेव्हा त्यांच्या शरीरात शुगर लवकर तुटते आणि रक्तात मिक्स होते. हेच मुख्य कारण आहे की, जास्तीत जास्त लोक लठ्ठपणा किंवा वजन वाढण्यासाठी पांढऱ्या भाताला जबाबदार मानतात.

साऊथ इंडियन लोक भात खाऊनही लठ्ठ का नाही?

एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमधील लोक इतका भात खातात तरीही त्यांना काही होत नाही. इतर राज्यातील लोक थोडा भात खात असतील तरी त्यांचं वजन वाढतं. याचं एक मोठं कारण म्हणजे साऊथमध्ये तांदळाला पॉलिश केलं जात नाही. इतर राज्यांमध्ये पांढरा तांदूळ दोन ते तीन वेळा पॉलिश केला जातो. जो अनेक आजारांचं कारण ठरतो.

भात बनवण्याची योग्य पद्धत

एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमध्ये भात बनवण्याची पद्धत त्यांना लठ्ठ होऊ देत नाही. साऊथमध्ये लोक सामान्य तांदळाचा वापर करतात आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भात शिजवण्यासाठी प्रेशर कूकरचा वापर करत नाहीत. ते पातेल्यात भात शिजवतात. पातेल्यात भात शिजवताना त्यात जो फेस येतो तो ते काढून टाकतात. मुळात तांदळाच्या पाण्यावर येणारा फेसच लठ्ठपणासहीत अनेक आजारांचं कारण बनतो. त्यामुळे भात नेहमी पातेल्यात शिजवा.

रोज किती भात खावा?

एक्सपर्ट्स मानतात की, तांदळांमध्ये पोर्शन कंट्रोलही फार गरजेचं आहे म्हणजे तुम्ही किती भात खात आहात यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. केवळ भातच नाही तर तुम्ही काहीही जास्त खाल्लं तर तुमच्या शरीराला नुकसान होईल. अनेक राज्यांमध्ये कमीत कमी एक वेळा भात खाल्ला जातो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य