शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

माझे असणे कोणासाठी महत्त्वाचे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 08:56 IST

Health: ‘माझे असणे किंवा नसणे हे कोणासाठी महत्त्वाचे आहे?’-असा प्रश्न तुम्ही कधी स्वत:ला विचारला आहे किंवा खरं म्हणजे असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे?

- वंदना अत्रे (दुर्धर व्याधीग्रस्तांच्या मदतगटात कार्यरत)  ‘माझे असणे किंवा नसणे हे कोणासाठी महत्त्वाचे आहे?’-असा प्रश्न तुम्ही कधी स्वत:ला विचारला आहे किंवा खरं म्हणजे असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे?- खूप डोळे उघडणारा आहे हा प्रश्न आणि रोजच्या धकाधकीत तो कधीच असा समोर येत नाही. मला स्पष्ट आठवते आहे, केमोची पहिली सायकल घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर पडले. एप्रिलच्या उष्ण रणरणत्या दुपारीसुद्धा त्या बाहेरच्या जगात नेहमीची धावपळ सुरू होती. वाहने आणि माणसे यांची न संपणारी लगबग बघून मला नकळतच एकदम रडू कोसळले. वाटले मी कॅन्सरने आजारी; पण सगळे जग त्याच्याच वेगाने धावतेय. कोणालाच माझ्याबद्दल काळजी, दु:ख काहीच वाटत नसेल?..

आज तो क्षण आठवताना प्रत्येक वेळी माझ्या त्या समजुतीचे हसू येते..! ‘जगाच्या व्यवहारात आपण एक महत्त्वाची व्यक्ती आहोत’, असा उगीचच आपला समज असतो. या समजुतीचा एक भाग म्हणजे ‘माझ्याशिवाय घर चालूच शकणार नाही’, असा प्रत्येक स्त्रीला असलेला भ्रम! त्या दिवशी माझ्यासाठी हा भ्रमाचा भोपळा फटकन फुटला. जाणवले, आपण असण्या-नसण्यामुळे जगाला चिमूटभरसुद्धा फरक पडत नसतो..

मग माझे असणे कोणासाठी महत्त्वाचे? - माझ्यासाठीच! ‘आपले जगणे आधी स्वत:साठी आहे’, हे कधीतरी असे लख्खपणे समजले पाहिजे. तरच ते आनंदी होण्याचा विचार मनात येऊ शकतो. कॅन्सर समोर उभी असताना आणि जगण्याची कोणतीही हमी नसताना मला आनंदाचा विचार सुचत होता! हा नक्की वेडेपणाच; पण हाताशी असलेला प्रत्येक क्षण जमेल तेवढा आनंदाने जगण्याची इच्छा प्रबळ होते तेव्हा हा वेडेपणासुद्धा साधतो! नक्की. 

त्यासाठी काही प्रश्न स्वत:ला विचारावे लागतात. पहिला अर्थातच, माझा आनंद कशात आहे? आजवर कधी शोध घेतला त्याचा आपण? पैसे, हौसेने जमवलेल्या अगणित वस्तू, नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी मिळालेले पद-सन्मान. कुठे दिसतो मला तो आनंदाचा रसरशीत कंद? हा गुंता सोडवताना जीव थकून जातो. या शोधात समोर येणारे आणखी काही प्रश्न ओलांडत असताना हळूहळू दिशा उजळत जातात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स