शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

श्रावणात कसा असायला हवा तुमचा आहार? जाणून घ्या हेल्दी पर्याय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 09:45 IST

आज आम्ही सांगणार आहोत की, तुम्ही या दिवसांमध्ये काय खायला हवं जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील. 

श्रावणाला सुरूवात झाली आहे. या महिन्यात भगवान शिवाची आराधना केली जाते आणि लोक दर सोमवारी उपवास करतात. या दिवसांमध्ये लोक सात्विक आहार घेतात. जे लो उपवास करतात त्यांनी या दिवसात खाण्या-पिण्याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आज आम्ही सांगणार आहोत की, तुम्ही या दिवसांमध्ये काय खायला हवं जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील. 

1) साबूदाना

साबूदाना उपवासाच्या दिवसात भरपूर लोक खातात. साबूदान्यामध्ये भरूर फाबरत असतं आणि इतरही आवश्यक पोषक तत्व असतात. ज्यामुळे साबूदाना एक पौष्टिक आहार ठरतो. साबूदान्याची खिचडी किंवा वडे बनवून खाऊ शकता. हा एक हेल्दी आहार ठरेल आणि तुमचं पोटही चांगलं राहील.

2) फळं

श्रावणात तुम्ही वेगवेगळी फळं खाऊ शकता. या दिवसात अनेक फळं बाजारात मिळतात. या दिवसात काही फळं खाल तर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. केळी, सफरचंद, द्राक्ष. पपई यांचं सेवन तुम्ही करू शकता. याने पोट तर चांगलं राहीलच सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतील.

3) ड्राय फ्रूट्स

घरातील मोठे लोक रोज मुठभर ड्राय फ्रूट्स खाण्याचा सल्ला देतात. या पवित्र महिन्यातही असं करून तुम्ही हेल्दी राहू शकता. यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि पोषक तत्व असतात. हे तुम्ही दिवसा कोणत्याही वेळी खाऊ शकता. ड्राय फ्रूट्स हे एक चांगलं नाश्ता ठरू शकतात. बदाम, काजू आणि एकत्र करून खाऊ शकता.

4) खोबरं

या दिवसात तुमच्या आहारात खोबऱ्याचा समावेश करायला हवा. याने आरोग्याला वेगवेगळे फायदे मिळतात. याचा तुम्ही वेगवेगळ्या पदार्थामध्ये समावेश करून सेवन करू शकता. याने पदार्थांची टेस्टही वाढते. 

5) शेंगदाणे

शेगदाण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतं ज्यामुळे शरीराला खूप फायदे मिळतात. याने पोट भरलेलं राहतं आणि भूक कमी लागते. शेंगदाण्याच्या सेवनाने हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. मात्र, याचं सेवन कमी प्रमाणात करावं. जास्त शेंगदाणे खाल्ले तर मळमळ होऊ शकते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य