शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

लहान मुलं आणि वयोवृद्धांना का दिला जातो बदामाची साल न खाण्याचा सल्ला? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:37 IST

Almond Peels Side Effects : अनेकांना प्रश्न पडतात की, बदामाची साल काढून टाकावी की नाही? या सालीमुळे काही नुकसान होतं का? लहान मुले आणि वयोवृद्धांना बदामाची साल न खाण्याचा सल्ला का दिला जातो? 

Almond Peels Side Effects : बदाम खाण्याचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. याने शरीराला शक्ती मिळते आणि मेंदुची क्षमताही वाढते. बरेच लोक बदामाचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये याचा समावेश केला जातो. काही लोक बदाम रात्रभर भिजवून ठेवून सकाळी खातात. भिजवलेले बदाम खाताना लोक त्याची साल काढून टाकतात. पण अनेकांना प्रश्न पडतात की, बदामाची साल काढून टाकावी की नाही? या सालीमुळे काही नुकसान होतं का? लहान मुले आणि वयोवृद्धांना बदामाची साल न खाण्याचा सल्ला का दिला जातो? 

बदामाची साल फायदेशीर की नुकसानकारक?

अनेक एक्सपर्ट सांगतात की, बदामाच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यात अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर असतं. ज्यामुळे केस आणि त्वचेला पोषण मिळतं. म्हणजे बदामाची सालही शरीरासाठी फायदेशीर असते.

बदाम सालीसोबत खावेत की नाही?

अनेकांना प्रश्न पडत असतो की, बदाम सालीसोबत खावेत की साल काढून? एक्सपर्टनुसार, अनेक जुन्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, भिजवलेले बदाम नेहमी साल काढूनच खावेत. कारण पाण्यात भिजवल्यावर सालीमध्ये टॅनिन नावाचं तत्व तयार होतं. जे शरीरासाठी नुकसानकारक असतं.

भिजवलेल्या बदामाची साल काढली तर त्याची शक्ती आणखी वाढते. मात्र, न्यूटिशन आणि साइंटिफिक आधारावर नुकत्याच समोर आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, बदामाची सालही खूप फायदेशीर असते. जर बदाम सालीसोबत खाल्लेत तर शरीराला अनेक फायदे मिळतात. यातून शरीराला फायबर आणि व्हिटॅमिन ई मिळतं. वय आणि परिस्थितीनुसार, बदाम सालीसोबत किंवा साल काढून खाल्ले पाहिजेत.

लहान मुले आणि वृद्धांसाठी बदामाची साल नुकसानकारक कशी?

नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर कुणाला पचनासंबंधी समस्या असेल तर त्यांचं पचन तंत्र अनेक गोष्टी योग्यपणे पचवू शकत नाही. जास्तकरून वयोवृद्ध आणि लहान मुलांचं पचन तंत्र कमजोर असतं. त्यामुळे त्यांना साल काढूनच बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांना पुरेसं पोषण मिळावं. जर त्यांनी सालीसोबत बदाम खाल्लेत तर पचनासंबंधी समस्या होऊ शकते. जर पचनासंबंधी समस्या नसेल तर तुम्ही बदाम सालीसोबतही खाऊ शकता.

एका दिवसात किती बदाम खाऊ शकता?

एका रिपोर्टनुसार, एक वयस्क व्यक्ती एक दिवसात कमीत कमी २३ बदाम खाऊ शकते. इतके बदाम खाल्ल्याने शरीराला पुरेसं प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल आणि हेल्दी फॅट मिळतं. यापेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने कॅलरी वाढू शकतात आणि फॅटही वाढू शकतं.

वातावरणानुसार खा बदाम

आयुर्वेदानुसार, बदामामुळे वात आणि पित्त दोष संतुलित करण्यास मदत मिळते. बदाम गरम असतात त्यामुळे यांचं जास्त सेवन केल्यास पित्त दोष वाढू शकतो. ज्यामुळे पोटासंबंधी समस्या जसे की, अॅसिडिटी, पोटात जळजळ होऊ शकते. थंडीच्या दिवसांमध्ये जास्त बदाम खाऊ शकता. तर उन्हाळ्यात बदाम भिजवून खाल्ले पाहिजेत.

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

बदाम भिजवून ठेवल्याने ते नरम होतात. अशात ते चावणं सोपं होतं. त्याशिवाय बदामाच्या सालीमध्ये फायटिक अॅसिड असतं जे पोषक तत्वांचं अवशोषण योग्यपणे होण्यास रोखतं. भिजवलेल्या बदामात हे तत्व कमी असतं.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य