शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी राहण्यासाठी जेवणाची योग्य वेळ कोणती? 'हे' माहीत नसेल तर पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:07 IST

Eating Timing Tips : तुम्हाला नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ माहीत असली पाहिजे. याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Eating Timing Tips : आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आहाराची पौष्टिकता आणि आहाराचं प्रमाण या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण यानेच अन्न पचनाची क्रिया योग्यपणे होते. सोबतच जेवणाची वेळही फारच महत्वाची असते. कारण या वेळेवरच तुमचं मेटाबॉलिज्म अवलंबून असतं. चुकीच्या वेळेवर जेवण केल्याने केल्याने आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात तुम्हाला नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ माहीत असली पाहिजे. याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नाश्ता आणि जेवणाची योग्य वेळ

सकाळचा नाश्ता

सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील संपूर्ण आहाराचा महत्वाचा भाग असतो. नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभरातील कामे करण्यासाठी ऊर्जा मिळते. एक्सपर्टनुसार, सकाळी झोपेतून उठल्यावर ७ ते ८ वाजता दरम्यान किंवा ९ वाजताच्या आधी नाश्ता करायला हवा. फार फार तर तुम्ही १० वाजेपर्यंत नाश्ता करायला हवा. नाश्त्यात प्रोटीन आणि फ्रूट्सचं सेवन करावं. फोडणीचा भात किंवा रात्री शिल्लक राहिलेल्या चपात्यांचा चिवडा देखील आरोग्यदायी असतो.

दुपारचं जेवण

सकाळचा नाश्ता केल्यावर जवळपास ४ तासांनी दुपारचं जेवण करावं. याने ब्लड ग्लुकोज संतुलित राहतं. अनावश्यक भूक किंवा क्रेविंग मॅनेज होते. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत आणि जास्तीत जास्त ३ वाजेपर्यंत जेवण उरकायला हवं. दुपारच्या जेवणात भाजी, चपाती, भात, डाळी यांचा समावेश असावा. 

रात्रीचं जेवण

जास्तीत जास्त एक्सपर्ट हाच सल्ला देतात की, रात्रीचं जेवण हे नेहमी झोपण्याच्या दोन तास आधी करावं. अंधार होताच शरीराची सरकेडिअन सायकल अॅक्टिव होते. मेलाटोनिनचं प्रमाण वाढतं आणि पॅंक्रियाची सक्रियताही कमी होते. रात्री उशीरा जेवण केल्याने ब्लड शुगर वाढण्याचाही धोका असतो. सोबतच वजनही वाढू शकतं. त्यामुळे रात्रीचं जेवण ७ ते ८ वाजता दरम्यान करण्याचा प्रयत्न करावा.

जेवणानंतर लगेच करू नका 'या' चुका

लगेच झोपू नये

बरेच लोक जेवण केल्यावर लगेच झोपतात. पण ही एक मोठी चूक आहे. कारण यामुळे तुम्हाला अॅसिडिटी आणि पोटासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. छातीत जळजळ आणि पोटदुखीही होऊ शकते. तसेच जेवल्यावर लगेच झोपल्याने पचनही चांगलं होत नाही.

लगेच फोन हाती घेणे

जेवण केल्यावर लगेच फोन बघायला सुरूवात करणंही नुकसानकारक आहे. जास्तीत जास्त लोकांना ही सवय असते. ते जेवण झालं की, लगेच बेड किंवा सोफ्यावर बसून फोन बघतात. यामुळे पचनास समस्या होते आणि पोट बाहेर येण्याची समस्या होते.

चहा किंवा कॉफी

बऱ्याच लोकांना जेवण केल्यावर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. जेवण केल्यावर चहा किंवा कॉफी प्यायल्याने अॅसिडिक रिफ्लक्सची समस्या होते. यामुळे छातीत जळजळ आणि पोट खराब होतं.

लगेच कामाला सुरूवात

बरेच लोक ऑफिसमध्ये जेवण केल्यावर लगेच कामाला लागतात. असं करणं चुकीचं आहे. जेवण केल्यावर काही वेळ चालावं त्यानंतर काम करावं. असं केल्याने तुमचं वजन वाढणार नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य