शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

काय असतं चहाची सवय लागण्याचं कारण? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 14:40 IST

Tea Habit Reason : अनेकांना असा प्रश्न पडतो की, चहा पिण्याची सवय कशी लागते? यासाठी काय कारणीभूत असतं? हेच आज जाणून घेणार आहोत.

Tea Habit Reason : जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात गरमागरम चहाने होते. काही लोक दिवसातून केवळ दोनदा म्हणजे सकाळी आणि सायंकाळी चहा घेतात. तर काही लोक दिवसातून अनेक कप चहा पितात. अनेक लोकांना चहाची सवय झाली असते. त्यांना चहा मिळाला नाही तर त्यांचं डोकं दुखू लागतं. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, चहा पिण्याची सवय कशी लागते? यासाठी काय कारणीभूत असतं? हेच आज जाणून घेणार आहोत.

कशी लागते चहा पिण्याची सवय?

चहामध्ये कॅफीन नावाचं तत्व असतं. कॅफीन हे सवय लावणारं एक तत्व आहे. या तत्वामुळेच तुम्हाला चहा पिण्याची नेहमी नेहमी ईच्छा होते. अशात चहा मिळाला नाही तर चिडचिड वाढते, डोकेदुखी होते, हृदयाचे ठोकेही वाढतात तसेच थकवा जाणवू लागतो. काही लोकांना चहाची एकप्रकारे नशा येते. एक महिना चहा सोडला तर कॅफीन सवय कमी करता येऊ शकते.

चहामध्ये अ‍ॅसिड बनवण्याची क्षमता

चहा हा अ‍ॅसिडिक नेचरचा असतो. म्हणजे चहा प्यायल्याने पोटात अ‍ॅसिड तयार होतं. जर आधीच पोटात जास्त अ‍ॅसिड असेल तर चहाने अ‍ॅसिड अधिक जास्त वाढतं. पोटात जर अ‍ॅसिड वाढलं तर वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. त्यामुळेच चहाचं जास्त सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

१ महिना चहा सोडल्यावर होणारे फायदे                           

स्ट्रेस दूर होईल

अनेकजण स्ट्रेस कमी करण्यासाठी अनेक कप चहा पितात. पण चहामध्ये भरपूर प्रमाणात कॅफीन हे तत्व असतं. याचं जास्त सेवन केल्याने स्ट्रेस वाढतो. अनेक झोप न लागण्याची समस्या देखील होते. अशात तुम्ही एक महिना चहा बंद केला तर तुमचा स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळेल.

पचन तंत्र चांगलं होईल

चहाचं जास्त सेवन केल्याने पचन तंत्रावर वाईट प्रभाव पडतो. अशात तर तुम्ही एक महिना चहा न पिण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंग, छातीत जळजळ अशा समस्या होणार नाहीत.

चांगली झोप येईल

एक्सपर्ट सांगतात की, चहाचं जास्त सेवन केल्याने झोप प्रभावित होते. याला कारण चहामधील कॅफीन हे तत्व असतं. जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल तर एक महिना चहा सेवन बंद करून बघा. याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारेल.

चहा पिताना टाळायच्या चुका

रिकाम्या पोटी चहाचं सेवन

बरेच लोक झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटीच चहाचं सेवन करतात. ही सवय तुमच्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकते. असं केल्याने ब्लोटिंग, गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते. कधी कधी आंबट ढेकरही येऊ शकते. छातीत जळजळ होते. 

चहामध्ये जास्त मसाले

लवंग, वेलची, आले आणि दालचीनी यामुळे नक्कीच चहाची टेस्ट वाढते. पण हेही लक्षात ठेवा की, हे मसाले गरम असतात. त्यामुळे यांच्या जास्त सेवनाने वात, पित्त आणि कफाची समस्या होऊ शकते. पावसाळ्यात यांचा जास्त वापर कमी प्रमाणात करा.

चहा जास्त वेळ उकडणे

या दिवसात सगळ्यांनाच कडक चहा हवा असतो. पण चहा जास्त वेळ उकडल्याने आरोग्याचं मोठं नुकसान होतं. याने पचन तंत्र बिघडतं, सोबतच जास्त उकडल्याने कॅफीनचं प्रमाण वाढतं ज्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे ही चूक टाळा.

जास्त चहा पिऊ नका

पावसांच्या सरींसोबत गरमागरम चहा सगळ्यांना हवाहवा वाटतो. पण चहाच्या जास्त सेवनामुळे नुकसानच होतं. जास्त चहा घेतल्याने शरीरात आयर्नला अवशोषण करण्याची क्षमता घटते, जे चहातील टॅनिनमुळे होतं. त्यामुळे काळजी घ्या की, दिवसातून एक किंवा दोन कपांपेक्षा जास्त चहा चांगली बाब नाही.

जेवण केल्यावर चहा

अनेक लोकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची चुकीची सवय असते. जर तुम्हीही या दिवसात दोन कपांपेक्षा जास्त चहा पित असाल तर हे आरोग्यासाठी फार नुकसानकारक आहे. यामुळे पचनासंबंधी समस्या वाढतात आणि शरीरात आयर्न व प्रोटीनच्या अवशोषणात अडथळा येतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य