शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

नोमोफोबिया म्हणजे काय?...ही लक्षणं तुम्हाला आहेत? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 09:30 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत मोबाइलचा समावेश करणे ही फक्त आता औपचारिकता राहिली आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत मोबाइलचा समावेश करणे ही फक्त आता औपचारिकता राहिली आहे. एकदा का संयुक्त राष्ट्रांनी यासंदर्भात ठराव केला की, सगळे देश त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची घाई करतील, एवढे आपले जीवन मोबाइलशी तादात्म्य पावले आहे. असे हे जीवनावश्यक उपकरण जरा जरी नजरेच्या आड झाले तरी मोबाइलधारकाचा जीव कासावीस होतो. 

काळाजी गरज म्हणा किंवा अगतिकता, मोबाइल आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. सकापासून रात्रीपर्यंत आपल्यातील प्रत्येक जण असंख्य वेळा असंख्य कारणांसाठी मोबाइल स्क्रीनवर काही ना काही स्क्रोल करत असतो. रोजचे व्यवहार, सोशल कनेक्ट, डिजिटल व्यवहार, कार्यालयीन कामकाज, पैशांची देवाणघेवाण, ज्ञान, मनोरंजन, आध्यात्म, साहित्य या सगळ्यांसाठी आपण सारेच मोबाइलवर विसंबून राहू लागलो आहोत. कोणाचा संपर्क क्रमांक तोंडपाठ असणे हे आजकाल ‘कूल’ कॅटेगरीत मोडते. थोडक्यात काय, आपले सारे विश्व मोबाइलच्या मुठ्ठीत गेले आहे. 

असा हा जीव की, प्राण असलेला मोबाइल नजरेपासून लांब झाला किंवा त्यातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स काही कारणास्तव डिसकनेक्ट झाले तर आपला जीव वरखाली होतो. देहाच्या या अवस्थेला नोमोफोबिया असे संबोधले जाते. मानसशास्त्रज्ञांनी मोबाइलधारकांच्या वर्तनाचे विश्लेषण करून शास्त्रीय कसोट्यांवर त्याची चाचणी करून हा शब्द स्थापित केला आहे. मोबाइलपासून किमान दोन तास दूर राहायचे असा दंडक केला आणि तो अंमलात आणण्याची सक्ती केली तर मोबाइलधारक या अवस्थेला पोहोचतात. नोमोफोबिया हा एक मानसिक आजार असून त्यावर ठरावीक असा काही उपचार नाही. साधारणत: मिलेनियल्समध्ये हा आजार आढळून येतो. 

लक्षणे काय असतात?1. मोबाइल जवळपास नसल्यास अस्वस्थ वाटणे, श्वासोच्छवास अनियमित होणे, घाम फुटणे, अंग थरथरणे. उपाय काय आहेत?1. नोमोफोबिया हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी दिवसाचे ठरावीक तास मोबाइलपासून लांब राहण्याचा नियम कटाक्षाने पाळावा.2. शक्य झाल्यास संपूर्ण एक दिवस डिजिटल उपवास करावा. मोबाइलच्या अति आहारी जाणे टाळावे.

- विनय उपासनी, मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई