शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

काय आहे लेप्टोस्पायरोसिस आजार आणि काय असतात त्याची लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 16:37 IST

Leptospirosis disease : हा आजार म्हणजे एक सौम्य संसर्ग असतो पण तो गंभीर आजाराला कारणीभूत ठरू शकतो किंवा काही दुर्मिळ केसेसमध्ये रुग्णाचा मृत्यू देखील ओढवू शकतो.

(डॉ. श्वेता शाह, लीड कन्सल्टन्ट, मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शन प्रिव्हेन्शन,  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल)

लेप्टोस्पायरोसिस हा संसर्ग असून तो लेप्टोस्पायरा या एक प्रकारच्या जंतूमुळे होतो. हा झूनॉटिक आजार आहे, म्हणजे हा संसर्ग मनुष्य आणि उंदीर, कुत्रे, गाय यासारख्या प्राण्यांना देखील होऊ शकतो. सर्वसामान्यतः हा आजार म्हणजे एक सौम्य संसर्ग असतो पण तो गंभीर आजाराला कारणीभूत ठरू शकतो किंवा काही दुर्मिळ केसेसमध्ये रुग्णाचा मृत्यू देखील ओढवू शकतो. म्हणूनच या संसर्गाबद्दल काही वैज्ञानिक माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.  

हा आजार कसा पसरतो?

प्राण्यांनी ज्यामध्ये लघवी केली आहे असे दूषित पाणी आणि मातीमध्ये हा सूक्ष्मजंतू असतो.  जेव्हा एखादी व्यक्ती या पाण्यातून किंवा मातीमधून चालते तेव्हा शरीरावरील एखाद्या खुल्या जखमेतून (जी एरव्ही सहज दिसून येत नाही) किंवा डोळे किंवा तोंड यासारख्या श्लेष्मल त्वचेतून शरीरात प्रवेश करू शकतो.  त्यानंतर हा जंतू रक्तप्रवाहात शिरतो व संपूर्ण शरीरात पसरतो. 

मुंबईमध्ये, खासकरून मान्सूनमध्ये पावसाचे पाणी, सांडपाणी किंवा साठून राहिलेले दूषित पाणी यामधून जेव्हा लोक चालतात तेव्हा लेप्टोस्पायरा जंतूचा संसर्ग पसरण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.  काहीवेळा दूषित पाणी प्यायल्याने देखील संसर्ग होऊ शकतो. दूषित पाणी असलेली तळी व नद्यांमध्ये पोहोल्याने, त्या पाण्यातून चालल्याने, कायाकिंग, राफ्टिंग केल्याने देखील हा आजार होऊ शकतो.  

या आजाराची लक्षणे कोणती असतात? 

लेप्टोस्पायरा जंतूने दूषित स्रोताशी एखाद्या व्यक्तीचा संपर्क आल्यापासून ती व्यक्ती आजारी पडेपर्यंतचा कालावधी दोन दिवसांपासून चार आठवड्यांपर्यंतचा असू शकतो.

-  माणसांमध्ये लेप्टोस्पायरोसिसची अनेक लक्षणे दिसून येतात. खूप ताप येणे, थंडी वाजणे, पुरळ येणे, डोकेदुखी, सांधेदुखी अशी सौम्य लक्षणे दिसून येऊ शकतात. काहीवेळा पोटात दुखणे, उलट्या होणे, अतिसार असे देखील त्रास होऊ शकतात. पावसाळ्यात होणाऱ्या इतर अनेक आजारांची देखील हीच लक्षणे असतात त्यामुळे काहीवेळा रुग्णाकडून वैद्यकीय मदत घेण्यात देखील उशीर केला जाऊ शकतो.

- बऱ्याचदा संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात सौम्य लक्षणे दिसून येतात.  त्यानंतर त्या व्यक्तीची सर्व लक्षणे निघून जातात आणि दुसऱ्या टप्प्यात किडनी व यकृत यांच्यावर परिणाम करणारी अतिशय गंभीर लक्षणे दिसून येऊ लागतात. कावीळ (त्वचा व डोळे पिवळे पडणे), मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावामुळे डोळे लाल होणे आणि त्यानंतर किडनी, यकृत निकामी होणे किंवा मेंदुज्वर असे आजार देखील होऊ शकतात.

आजाराचे निदान कसे केले जाते?

साठलेले पाणी किंवा दूषित माती यांच्याशी रुग्णाचा गेल्या एका महिन्यात संपर्क आला होता का ही डॉक्टरांसाठी एक सर्वात महत्त्वाची माहिती ठरते. तसे झाले असल्यास लेप्टोस्पायरोसिसची दाट शक्यता वर्तवली जाऊ शकते.

- आजाराच्या निदानाची खात्री करून घेण्यासाठी रक्ताची तपासणी केली जाते. संपूर्ण ब्लड काउंट, किडनी व यकृत यांचे कार्य दर्शवणाऱ्या तपासण्या तसेच रक्तामध्ये जंतू आहे अथवा नाही याची तपासणी किंवा लेप्टोस्पायरोसिसच्या अँटीबॉडीजचा (ELISA किंवा मायक्रोस्कोपिक अग्ल्युटीनेशन टेस्ट “MAT” मार्फत IgM आणि IgG डिटेक्शन) शोध घेणे यांचा यामध्ये समावेश असतो. PCR टेस्ट्स देखील उपलब्ध आहेत आणि संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उपयोगी ठरू शकतात.  

संसर्गाला आळा कसा घालावा? 

- प्राण्यांची लघवी ज्याठिकाणी असेल अशा ठिकाणांशी संपर्क टाळावा, साठून राहिलेल्या पाण्यामध्ये जाणे टाळावे. प्राण्यांच्या लघवीशी आपल्या शरीराचा थेट संपर्क येऊ नये यासाठी प्राण्यांसोबत काम करताना पूर्ण कपडे घालावेत, बंद शूज, हातमोजे इत्यादींचा वापर करावा. 

- सांडपाणी किंवा पुराच्या पाण्याशी थेट संपर्क आल्यास आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर अँटिबायोटिक्स प्रोफिलॅक्सिस (उदाहरणार्थ डॉक्सिसायक्लीन किंवा अझिथ्रोमायसिन)

-पाळीव प्राण्यांमध्ये संसर्गाला प्रतिबंध घालणे देखील महत्त्वाचे आहे. 

आजकाल बहुतांश घरांमध्ये पाळीव प्राणी असतात. त्यांना संसर्ग होऊ शकतो किंवा त्यांच्यामार्फत संसर्ग पसरू शकतो. बऱ्याचदा त्यांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत.  त्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये संसर्गाला आळा घालणे महत्त्वाचे आहे.  उंदीर, जंगली प्राणी आणि प्राण्यांचे मृतदेह यांच्यापासून पाळीव प्राण्यांना दूर ठेवावे. भरपूर पाऊस पडून गेल्यावर किंवा पुरानंतर पाळीव प्राण्यांना दूषित पाण्यात जाऊ देऊ नये. 

लेप्टोस्पायरोसिस बरा केला जाऊ शकतो का?

डॉक्सिसायक्लीन, अझिथ्रोमायसिन, सेफट्रीएक्सन यासारखी अँटिबायोटिक्स देऊन लेप्टोस्पायरोसिस पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. ही अँटिबायोटिक्स तोंडावाटे किंवा शिरेच्या आत दिली जाऊ शकतात.  रुग्ण घरी असो किंवा रुग्णालयात त्याच्या/तिच्या शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे राखले गेले पाहिजे.  ताप आणि दुखण्यांसाठी लक्षणांवरील इतर उपचार आणि पूरक उपचार केले जातात. रुग्ण अधिक गंभीर झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये 24*7अशा आजारावर उत्तम सेवा उपलब्ध आहेत.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य