शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊन फायदे तर मिळतातच, पण 'या' चुका टाळल्या पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 10:30 IST

तांबाच्या भांड्यात किंवा बॉटलमध्ये रात्रभर ठेवलेलं पाणी सकाळी झोपेतून उठल्यावर प्याल तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

Copper Bottle Water Benefits: वेगवेगळ्या धातुंचे आपल्या आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. तांब्याचाही आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने वापर केला जातो. बरेच लोक तांब्याच्या बॉटलमधील पाणीही पितात. यातून अनेक पोषक तत्व शरीरात जातात. तांबाच्या भांड्यात किंवा बॉटलमध्ये रात्रभर ठेवलेलं पाणी सकाळी झोपेतून उठल्यावर प्याल तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हे फायदे काय काय आहेत आणि हे पाणी पिताना काय चुका करू नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

१) कॅन्सर धोका टळतो

कॅन्सरला मुख्य कारण फ्री रेडिकल्स आणि त्यांचे नुकसानकारक प्रभाव आहे. तांब एक अॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात काम करून सगळ्या फ्री रेडिकल्स विरोधात लढतं. तसेच त्यांच्या नकारात्मक प्रभावांना नष्ट करतं. त्यासोबतच तांब्यातून मेलेनिनचं उप्तादन करण्यास मदत करतं. जे सूर्याच्या नुकसानकारक किरणांपासून बचाव करतो.

२) हाय ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, तांब्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रिग्लिसराइड स्तर कमी करण्यासाठी ओळखलं जातं. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जन्मापासूनच कॉपर कमी असेल तर यामुळे हायपरटेंशन वाढण्याचा धोका असतो. अशात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जाऊ शकतं.

३) एनीमियापासून बचाव

शरीरात आयर्न कमी झालं तर एनीमियाची समस्या समस्या होते. अशात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने एनीमियाची समस्या दूर करण्यास मदत मिळते. शरीरात तांब कमी झालं तर हेमेटोलॉजिकल विकार होऊ शकतो. पांढऱ्या रक्त पेशी कमी झाल्यानेही असं होतं. अशात तांब खाद्याला हीमोग्लोबिन बनवण्यास मदत करतं. याने तुमच्या शरीरातील आयर्न अवशोषित करण्यास मदत होते. 

४) पचन चांगलं होतं

आयुर्वेदात दावा केला जातो की, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं आणि शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच या पाण्याने पोटातील सूज कमी होते आणि पचन चांगलं होण्यास मदत मिळते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पोटाचा अल्सर, अपचन आणि पोटात इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना या चुका टाळा

न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी सांगितलं की, तांब्याच्या भांड्यातील पाणी तेव्हाच शरीरासाठी फायदेशीर ठरतं जेव्हा तुम्ही पद्धतीने त्याच वापर कराल. अशात तांब्याच्या भांड्यातील किंवा बॉटलमधील पाणी पिताना या 3 चूका करणं टाळलं पाहिजे. नाही तर शरीरात वेदनेसह गंभीर आजारांचा धोकाही राहतो.

तांब्याच्या बॉटलने दिवसभर पाणी पिणे

जर तुम्ही दिवसभर तांब्याच्या बॉटल किंवा भांड्यातील पाणी पित असाल तर शक्यता आहे की, तुमच्या शरीरात कॉपरचं प्रमाण जास्त होईल. यामुळे मळमळ होणे, चक्कर येणे, पोटदुखीसोबत लिव्हर आणि किडनी फेल होण्याचा धोकाही होऊ शकतो.

तांब्याच्या भांड्यात लिंबू आणि मध टाकलेल्या पाण्याचं सेवन

हे सत्य आहे की, सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध टाकलेलं पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जेव्हा तुम्ही हे पाणी तांब्याच्या भांड्यातून सेवन करता तेव्हा ते विषासारखं काम करतं. लिंबात आढळणारं आम्ल कॉपरसोबत मिळून शरीरात अॅसिड तयार करतं. ज्यामुळे पोटदुखी, पोटात गॅस आणि उलटी होण्याचा धोका राहतो.

तांब्याची बॉटल रोज स्वच्छ करणे

तांब्याचं भांड नियमितपणे धुवू नये. रोज हे भांडं धुतल्याने यातील फायदेशीर गुण कमी होऊ लागतात. त्यामुळे एकदा वापरल्यावर ते केवळ पाण्याने धुवून घ्या. आणि महिन्यातून एकदा मीठ आणि लिंबूचा वापर करून चांगल्या प्रकारे स्वच्छ करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स