शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊन फायदे तर मिळतातच, पण 'या' चुका टाळल्या पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 10:30 IST

तांबाच्या भांड्यात किंवा बॉटलमध्ये रात्रभर ठेवलेलं पाणी सकाळी झोपेतून उठल्यावर प्याल तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

Copper Bottle Water Benefits: वेगवेगळ्या धातुंचे आपल्या आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. तांब्याचाही आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने वापर केला जातो. बरेच लोक तांब्याच्या बॉटलमधील पाणीही पितात. यातून अनेक पोषक तत्व शरीरात जातात. तांबाच्या भांड्यात किंवा बॉटलमध्ये रात्रभर ठेवलेलं पाणी सकाळी झोपेतून उठल्यावर प्याल तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हे फायदे काय काय आहेत आणि हे पाणी पिताना काय चुका करू नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

१) कॅन्सर धोका टळतो

कॅन्सरला मुख्य कारण फ्री रेडिकल्स आणि त्यांचे नुकसानकारक प्रभाव आहे. तांब एक अॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात काम करून सगळ्या फ्री रेडिकल्स विरोधात लढतं. तसेच त्यांच्या नकारात्मक प्रभावांना नष्ट करतं. त्यासोबतच तांब्यातून मेलेनिनचं उप्तादन करण्यास मदत करतं. जे सूर्याच्या नुकसानकारक किरणांपासून बचाव करतो.

२) हाय ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, तांब्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रिग्लिसराइड स्तर कमी करण्यासाठी ओळखलं जातं. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जन्मापासूनच कॉपर कमी असेल तर यामुळे हायपरटेंशन वाढण्याचा धोका असतो. अशात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जाऊ शकतं.

३) एनीमियापासून बचाव

शरीरात आयर्न कमी झालं तर एनीमियाची समस्या समस्या होते. अशात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने एनीमियाची समस्या दूर करण्यास मदत मिळते. शरीरात तांब कमी झालं तर हेमेटोलॉजिकल विकार होऊ शकतो. पांढऱ्या रक्त पेशी कमी झाल्यानेही असं होतं. अशात तांब खाद्याला हीमोग्लोबिन बनवण्यास मदत करतं. याने तुमच्या शरीरातील आयर्न अवशोषित करण्यास मदत होते. 

४) पचन चांगलं होतं

आयुर्वेदात दावा केला जातो की, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं आणि शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच या पाण्याने पोटातील सूज कमी होते आणि पचन चांगलं होण्यास मदत मिळते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पोटाचा अल्सर, अपचन आणि पोटात इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना या चुका टाळा

न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी सांगितलं की, तांब्याच्या भांड्यातील पाणी तेव्हाच शरीरासाठी फायदेशीर ठरतं जेव्हा तुम्ही पद्धतीने त्याच वापर कराल. अशात तांब्याच्या भांड्यातील किंवा बॉटलमधील पाणी पिताना या 3 चूका करणं टाळलं पाहिजे. नाही तर शरीरात वेदनेसह गंभीर आजारांचा धोकाही राहतो.

तांब्याच्या बॉटलने दिवसभर पाणी पिणे

जर तुम्ही दिवसभर तांब्याच्या बॉटल किंवा भांड्यातील पाणी पित असाल तर शक्यता आहे की, तुमच्या शरीरात कॉपरचं प्रमाण जास्त होईल. यामुळे मळमळ होणे, चक्कर येणे, पोटदुखीसोबत लिव्हर आणि किडनी फेल होण्याचा धोकाही होऊ शकतो.

तांब्याच्या भांड्यात लिंबू आणि मध टाकलेल्या पाण्याचं सेवन

हे सत्य आहे की, सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध टाकलेलं पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जेव्हा तुम्ही हे पाणी तांब्याच्या भांड्यातून सेवन करता तेव्हा ते विषासारखं काम करतं. लिंबात आढळणारं आम्ल कॉपरसोबत मिळून शरीरात अॅसिड तयार करतं. ज्यामुळे पोटदुखी, पोटात गॅस आणि उलटी होण्याचा धोका राहतो.

तांब्याची बॉटल रोज स्वच्छ करणे

तांब्याचं भांड नियमितपणे धुवू नये. रोज हे भांडं धुतल्याने यातील फायदेशीर गुण कमी होऊ लागतात. त्यामुळे एकदा वापरल्यावर ते केवळ पाण्याने धुवून घ्या. आणि महिन्यातून एकदा मीठ आणि लिंबूचा वापर करून चांगल्या प्रकारे स्वच्छ करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स