शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

वजन कमी करायचंय असेल तर हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा, तरच होईल फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 18:47 IST

Weight Loss Tips : खरंतर डाएट करणे म्हणजे खाणे-पिणे सोडणे नाही. तुमच्या शरीराला मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्सची गरज असते. आणि हे तत्व तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांमधून या गोष्टी मिळत असतात. 

Weight Loss Tips : वजन वाढण्याची समस्या अलिकडे अनेकांना भेडसावत आहे. त्यामुळे अनेकजण डायटींगचा आधार घेतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, डाएट करताना काय खावे काय खाऊ नये. या गैरसमजात अनेकजण उपाशी राहतात. पण खरंतर डाएट करणे म्हणजे खाणे-पिणे सोडणे नाही. तुमच्या शरीराला मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्सची गरज असते. आणि हे तत्व तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांमधून या गोष्टी मिळत असतात. 

असे अनेक पदार्थ आहेत ज्यात 'बॅड स्टार्च'चं प्रमाण अधिक असतं. जर हे पदार्थ खाणे तुम्ही टाळले तर तुम्ही तुमचं वजन वेगाने कमी करु शकता. चला जाणून घेऊ कोणते पदार्थ तुम्ही खाऊ नये. 

व्हाईट ब्रेड आणि मैद्यापासून तयार पदार्थ

मैद्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ वजन कमी करण्यात सर्वात मोठा अडसर निर्माण करतात. आजकाल ब्रेकफास्ट, स्नॅक्स आणि फास्टफूड हे मैद्यापासून तयार केलेले असतात. सॅंडविच, व्हाइट ब्रेड, पास्ता, बिस्कीटे, नूडल्स हे मैद्यापासून तयार केलेले असतात. मैद्यापासून तयार करण्यात आलेल्या या पदार्थांमध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट दोन्ही मोठ्या प्रमाणात असतात. तर फायबर, प्रोटीन आणि इतर पोषक तत्वे कमी असतात. यात शुगरचं प्रमाणही अधिक असतं. 

ब्रेकफास्ट सेरियल

ब्रेकफास्ट सेरियलच्या नावाने मार्केटमध्ये आज कितीतरी खाण्या-पिण्याच्या वस्तू उपलब्ध आहेत. या फूड्सबाबत दावा केला जातो की, हे वेगवेगळ्या धान्यांपासून जसे की, कॉर्न, बाजरी, जव, गहू ज्वारी यांपासून तयार केलेले असतात. पण सत्य हे आहे की, हे खाल्याने तुमचं ब्लड शुगर वाढतं. खासकरुन त्या ब्रेकफास्ट फूड्सच्या सेवनाने जे दुधात मिश्रीत करुन खाल्ले जातात. हे पदार्थ धान्यापासून तयार केलेले असतात पण हे धान्य प्रोसेस्ड असतं. त्यामुळे तुम्ही या रेडीमेड फूडऐवजी या धान्याचं सेवन ब्रेकफास्टमध्ये करा. याने तुम्हाला फायदा होईल. 

तांदूळ

दररोज घराघरात तांदूळाचा वापर केला जातो. या तांदूळामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक असतं, ज्याने तुमच्या शरीरातील चरबी वाढते. तसेच भात खाल्याने त्यावेळी तुमचं पोट भरलेलं वाटतं पण काही वेळातच तुम्हाला भूक लागते. आणि अशात तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त कॅलरी खाता. जर वजन कमी करायचं असेल तर पांढरे तांदूळ खाणे बंद करा. त्याजागी ब्राऊन तांदूळ किंवा क्विनोआचा वापर करा. पण हेही कमी प्रमाणातच खावे.

बटाटे

कव्हर काढलेल्या पांढऱ्या बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असतात. याने ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढते. बटाटे डीप फ्राय करुन त्या बटाट्यांचे पदार्थ जसे की, टिक्की, बर्गर, फ्राइज इत्यादींचं सेवन तुमचं वजन कमी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ देत नाही. त्यामुळे यांचं सेवन आधी बंद करा. जर तुम्हाला बटाटा खायचाच आहे तर त्याच्या सालीसोबतच खावे. बटाटाच्या सालीमध्ये फायबर असतं, ज्याने तुमचं पोट भरलेलं राहतं. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स