शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

​दिवाळीत वजन वाढलंय...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 18:20 IST

दिवाळी म्हणजे नवनवीन खाद्य-पदार्थांची मेजवानीच असते. त्यात स्वीट, मिठाई, शंकरपाडे आदी गोड पदार्थ तसेच तेल-तुपात तळलेल्या चकल्या, कारंज्या आदींमुळे नक्कीच वजन वाढते. ....

- Ravindra Moreदिवाळी म्हणजे नवनवीन खाद्य-पदार्थांची मेजवानीच असते. त्यात स्वीट, मिठाई, शंकरपाडे आदी गोड पदार्थ तसेच तेल-तुपात तळलेल्या चकल्या, कारंज्या आदींमुळे नक्कीच वजन वाढते. आपण वेळीच उपाय केला नाही तर ही समस्या पुढे वाढत जाते आणि विविध आजारांना आमंत्रण मिळते.  वाढलेले वजन कसे कमी करावे याबाबत आजच्या सदरात आपण जाणून घेऊया...नियोजन कराजर आपण वजन कमी करण्याचे नियोजन नाही केले तर आपले वजन कधीही कमी होणार नाही. एक उद्दिष्ट ठरवा आणि त्यानुसार प्लॅन बनवा. किती दिवसात किती किलो वजन कमी करु शकता. मात्र, हा प्लॅन बनवित असताना आपण स्वत:ला कोणत्याही समस्येत अडकवू नका. खूप झोपाबरेचजण असे समजतात की, जास्त झोपल्याने वजन वाढते, मात्र नव्या संशोधनानुसार झोपेमुळे वजन कमी होत असते. जर आपण ७ ते ८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर त्यामुळे जास्त भूक लागते आणि आपण गरजेपेक्षा जास्त खातो. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.स्नॅक्स खाणे टाळाकित्येकजण जेवणदेखील चारवेळा करतात आणि स्नॅक्सदेखील खातात. जर आपणास वेळोवेळी स्नॅक्स खाण्याची सवय असेल, तर जेवणाचे प्रमाण थोडे कमी करा. यामुळे शरीरातील कॅलरीज वाढतात आणि पर्यायाने वजनदेखील वाढते. खाण्याचे प्रमाण ठरवाबहुतेकजण दिवसभर खातच असतात आणि त्यांना माहितदेखील नसते, की त्यांनी किती प्रमाणात जेवण केले. यासाठी आपण दिवसभरात किती खाणार याचे प्रमाण ठरवून घ्या. भरपूर चालाकार आणि मोटारसायकल असल्याने बरेचजण चालतच नाहीत. वजन कमी करण्यासाठी भरपूर चाला तसेच पायºयांचादेखील प्रयोग करा. त्याचप्रमाणे आपला मनपसंत खेळ खेळा. अतिरिक्त कॅलरी हटवा६५ टक्के लोग शुगर असणारी पेये किंवा कोल्ड्रिंक्स भरपूर पितात. यामुळे पोट भरत नाही, मात्र अतिरिक्त कॅलरीज मिळतात.   जड वजन उचलाआपण पुरुष असो वा महिला, जड वजन उचलल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बर्न होतात.व्यायामात विविधता आणाएका दिवसात अनेक प्रकारचे व्यायाम करा, जसे पाच मिनिट कार्डिओ ट्रेडमिल, बाइक केल्यानंतर लगेच डंबेल सर्किट, स्ट्रेचिंग आणि बेंच ओवर करा. हा व्यायाम सातत्याने आठ वेळेस करा. कार्बोहायड्रेट्स हटवावजन कमी करायचे असेल तर आहारातून पास्ता, भात आणि बे्रड आदी वस्तूंना हटवा आणि त्याऐवजी फळे आणि भाजीपाला यांचा समावेश करा. अशाने आपण कितीही खाल्ले तरी वजन वाढणार नाही. साध्या गोष्टींचा वापर कराजर आपणाकडे जिम जाण्यासाठी पैसे किंवा वेळ नसेल तर आपण घरीच दोरी उड्या मारा. अगोदर ५० वेळा उड्या मारा नंतर वाढवून १०० वेळा मारा. जास्त आराम नकोव्यायाम करतेवेळी फक्त १० ते ३० सेकंदापर्यंतच आराम करा. यावेळी जास्त आराम नको. उपवास कराआपण जर दिवसातून दोन किंवा तीन वेळेस जेवण करत असाल तर आठवड्यातून एक दिवस उपवास करणे गरजेचे आहे. अशाने आपण सहज आणि आरामाने आपले वजन कमी करु शकाल. प्रोटीन जास्त खाप्रोटीन जास्त खाल्ल्याने मांसपेशी बनतात आणि यामुळे शरीरातील फॅट बर्न होते. शिवाय पोटदेखील भरलेले असते. पाणी भरपूर प्या आपण दिवसभर भरपूर पाणी प्या. यामुळे आपल्याला जास्त भूक लागणार नाही आणि पोटदेखील भरलेले असेल. तसेच जेवणाअगोदर एक ग्लास पाणी प्यायला हवे, यामुळे नक्कीच वजन कमी होईल.