शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

लहान मुलं डायबिटीसचे शिकार होण्याआधी अशी घ्या काळजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 10:18 IST

सध्याच्या काळात अनियमित जीवन शैली आणि वातावरणातील बदलामुळे लहान मुलांच्या  आरोग्यावर नकारात्मक परिणाम  होत असतो.

सध्याच्या काळात  अनियमित जीवन शैली आणि वातावरणातील बदलामुळे लहान मुलांच्या  आरोग्यावर नकारात्मक परिणाम  होत असतो. मुलांचा इंटरनेटचा अतिवापर तसंच खाण्यापिण्याच्या बाबतीत असणारा निष्काळजीपणा त्यांना महागात पडू शकतो.  सर्वसाधारणपणे मोठ्या वयोगटातील लोकांना जे आजार व्हायचे ते आता लहान मुलांना सुद्धा होतात. अतिशय कमी वयात उद्भवणारे हे जीवघेणे आजार मुलांचे भवितव्य धोक्यात आणत आहे. 

मधूमेह या रोगाचं नाव ऐकून असा समज तयार होतो की  हा आजार फक्त जास्त वयाच्या लोकांमध्येच होतो. पण असं नसून  हा आजार लहान मुलांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणावर होत आहे. लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीस हा टाईप १ डायबिटीस असतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. जाणून घ्या लहान मुलांमध्ये होत असलेल्या डायबिटिसचं प्रमुख लक्षणं काय आहेत.

लहान मुलांना थकवा जाणवतो

डोकेदुखी होते

जास्त  तहान  लागणे

जास्त भूक लागणे

पोटात दुखणे 

वजन अचानक कमी होणे 

रात्रीच्या वेळी सतत लघवीला येणे

प्राईवेट पार्टसवर खाज येणे 

जास्तवेळ थंडीच्या वातावारणात राहिल्यामुळे इम्यून सिस्टीम रोगांचा सामना  करण्यासाठी एंटीबॉयटिक चे उत्पादन करते. त्यामुळे इंसुलीनचे प्रमाण कमी होते आणि मधूमेह होण्याचा धोका अधिक असतो. तसंच काहीवेळा वायरल इन्फेक्शनमुळे सुध्दा डायबिटीस टाईप १ होण्याचा धोका अधिक असतो.  शारीरिक हालचाल कमी केल्याने सुध्दा अशा प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो.  जास्त खाल्ल्यामुळे तसंच कार्बोहायड्रेट्स अति प्रमाणात शरीरात असल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते. तर काही वेळेला अनूवांशिकतेमुळे सुध्दा डायबिटिस टाईप १ होऊ शकतो. चॉकलेट्स कुकीज आणि कोल्डड्रिंक्सच्या अतिसेवनाने समस्या वाढू शकते. या आजारापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी मुलांनी तसंच पालकांनी घेणं गरजेचं आहे.

डायबिटीस टाईप१ पासून बचाव करण्यासाठी उपाय

लहान मुलांनी रोज २ ग्लास दूध घेणं गरजेचं आहे. दुधात कार्बोहायड्रेटस असतात. ते रक्तातील  साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात. मुलांच्या डाएटमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करायला हवा. आहारात डाळींचा समावेळ असावा. पपई. सफरचंद, पेरू डाळिंब या फळांचं सेवन करायला हवं. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास या आजारांपासून दूर राहता येतं.  

टॅग्स :Healthआरोग्य