शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

वजन घटवताना अवेळी लागणारी भूक अशी करा कंट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 17:02 IST

अधिक खाल्ले गेल्यास वजन वाढते आणि परिणाम उलटा होतो. म्हणूनच भूकेवर सकारात्मक पद्धतीने मात कशी करावी, हे जाणून घेऊया...

(Image Credit: receitas-online.net)

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भूकेवर नियंत्रण मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. वजन घटवण्याच्या नादात उपास मार केली जाते. त्यातून अधिक खाल्ले गेल्यास वजन वाढते आणि परिणाम उलटा होतो. म्हणूनच भूकेवर सकारात्मक पद्धतीने मात कशी करावी, हे जाणून घेऊया...

आरोग्यदायी फॅट्सचा आहार वाढवा

अनेकजण फॅटयुक्त पदार्थांचा आहारातील समावेश कमी करतात. परंतु फॅट्समुळेच भूकेवर नियंत्रण ठेवता येतं. फॅट्समधून उर्जा मिळते. तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे शोषण सुधारते. पेशींना मजबूत बनवते. त्यामुळे बदाम, अ‍ॅव्हॅकॅडो, मासे, ऑलिव्ह ऑईल यांचा आहारात समावेश करा.

फायबर्सचा आहार वाढवा

पचनक्रियेला नियमित करण्यासाठी फायबर्स महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे पाण्याचा अंश टिकून राहण्यास मदत होते. म्हणूनच आहारात हिरव्या भाज्यांचा,फळांचा समावेश वाढवा. त्यामध्ये कॅलरीजही योग्य प्रमाणात आढळतात. सलाड किंवा फळं खाण्याच्या सवयीमधून शरीराला फायबर्सही मिळतात.

प्रोटीन्सचा आहार वाढवा

तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश वाढवा. यामुळे आहार पोटभरीचा होतो तसेच त्यातील अमायनो अ‍ॅसिड भूक नियमित ठेवण्यासाठी मदत होते. त्यासाठी अख्या डाळी, मासे, अंडी, यांचा आहारातील समावेश वाढवा.

भूक लागल्यावर च्युईंगम चघळा

वेळी अवेळी  लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी च्युईंग गम चघळणे हा अत्यंत फायदेशीर उपाय आहे. यामुळे वजन कमी होत नसले तरीही कमीत कमी कॅलरीज शरीरात जातात. मात्र च्युईंगगम हे शुगर फ्री असेल याची काळजी घ्या. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स