शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

जेवण पॅक करण्यासाठी फॉईल पेपरचा वापर करता? तर वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 11:07 IST

सध्या देशातील महाराष्ट्रात आणि इतरही काही राज्यांमध्ये प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे. मुलांसाठी स्कूल लंच पॅक करणं असो किंवा ऑफिससाठी लंच प्रत्येक गोष्टीसाठी फॉईल पेपरचा वापर होतो.

सध्या देशातील महाराष्ट्रात आणि इतरही काही राज्यांमध्ये प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे. मुलांसाठी स्कूल लंच पॅक करणं असो किंवा ऑफिससाठी लंच प्रत्येक गोष्टीसाठी फॉईल पेपरचा वापर होतो. पण तुम्हाला माहीत आहे का? हाच फॉईल पेपर पदार्थांची चव बिघडवण्यासाठी कारणीभूत असून शरीरासाठीही घातक ठरतो. 

आताच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये माणसाच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल घडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे जेवण बनवण्याची पद्धत आणि ते पॅक करण्याच्या पद्धतीमध्येही बदल घडून आले आहेत. आधी जे आपण कपड्यामध्ये किंवा कागदामध्ये पदार्थ पॅक करत असू तेच आता अॅल्युमिनिअमच्या फॉइल पेपरमध्ये पॅक केलं जातं. अनेकदा जेवण शिजवताना किंवा मांसाहारी पदार्थ ग्रिल्ड करताना फॉईल पेपरचा वापर करण्यात येतो. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त वेळ फॉईल पेपरमध्ये पदार्थ ठेवले तर ते खराब होतात, तसेच त्यातील पोषक तत्वही नष्ट होतात. फॉईल पेपरमध्ये पदार्थ गरम करत असाल तर ते शरीरासाठी अत्यंत घातक ठरतं. मसालेदार पदार्थांवर याचा परिणाम अधिक होत असून फॉईल पेपरमधील रासायनिक घटक पदार्थामध्ये मिसळून जातात. हे पदार्थ खाल्याने रासायनिक घटक शरीरामध्ये प्रवेश करतात. 

शरीरासाठी घातक असतो फॉईल पेपर - 

अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये जेवण बनवणं किंवा पॅक करणं आरोग्यासाठी घातक असतं. संशोधनातून या गोष्टींचा खुलासाही करण्यात आला आहे की, अॅल्युमिनिअम मेंदूच्या विकासाच्या प्रक्रियेवर परिणाम करतो. ज्या लोकांना हाडांसंबंधीत आजार आधीपासूनच असतील त्यांच्यासाठी हे अत्यंत घातक ठरतं. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, फॉईल पेपरमध्ये शिजवलेले अन्नपदार्थ गरजेपेक्षा जास्त अॅल्युमिनिअम खेचून घेतात. काही संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, जर आपल्या शरीरामध्ये अॅल्युमिनिअमची मात्रा अधिक झाली तर त्याचा गंभीर परिणाम हा आपल्या मेंदूवर होतो. यामुळे मेंदूमधील पेशींची वाढ खुंटते आणि काही गोष्टींचा विसर पडणे, विचार करण्याची शक्ती कमजोर होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. 

शरीरामध्ये अॅल्युमिनिअमची मात्रा वाढली तर हाडं कमजोप होणं, रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे अल्जायमर सारख्या विसरण्याच्या आजाराचं मूल कारणही अॅल्युमिनिअमच आहे. 

उपाय -

- फॉईल पेपरमध्ये जास्त गरम खाद्यपदार्थ पॅक करू नयेत. 

- खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी चांगल्या क्वॉलिटिच्या फॉईल पेपरचा वापर करावा.

- अॅसिडीक खाद्यपदार्थ फॉईल पेपरमध्ये पॅक करू नयेत. त्यामुळे पदार्थ लवकर खराब होत असून त्यांच्यातील केमिकल बॅलेन्स बिघडतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नHealthआरोग्य