शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

'हा' आजार असल्यास कोरोनाचा धोका दुप्पट; तात्काळ चाचणी करण्याचं आरोग्य मंत्रालयाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 18:13 IST

CoronaVirus News & Latest Updates : ज्या लोकांचे खाणंपिणं, आहार, सवयी व्यवस्थित नसतात तसंच ज्यांना धुम्रपानाची सवय असते. अशा लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. परिणामी या व्हायरसचं संक्रमण जीवघेणं ठरू शकतं. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं टीबी म्हणजे क्षय रोगानेग्रस्त असलेल्या रुगांना कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार अन्य लोकांच्या तुलनेत टीबी या आजाराने पिडीत असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका दुप्पट असतो. त्यासाठी टीबीची उपचार घेत असलेल्या सगळ्या रुग्णांची तपासणी होणं आवश्यक आहे. एका संशोधनातून दिसून आले की, कोरोनाच्या 0.37 ते4.47 रुग्णांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. टीबीचे रुग्ण असलेल्या लोकांना तसंच या आजारातून बाहेर आलेल्या लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. 

वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार याबाबत आरोग्यं मंत्रालयानं दिशानिर्देश जारी केले आहेत. कोरोना संक्रमणादरम्यान टीबीच्या रुग्णांचा धोका जास्त वाढतो. याशिवाय  टीबीनेग्रस्त असलेल्या लोकांना इतरांच्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांचे खाणंपिणं, आहार, सवयी व्यवस्थित नसतात तसंच ज्यांना धुम्रपानाची सवय असते. अशा लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. परिणामी या व्हायरसचं संक्रमण जीवघेणं ठरू शकतं. 

मंत्रालयानं दिलेल्या माहितीनसार टीबी आणि कोविड १९ असे आजार आहेत. ज्यात फुफ्फुसांवर आक्रमण होतं. आकडेवारीनुसार मागच्या वर्षांच्या तुलनेत जानेवारी आणि जून महिन्यात कोरोनाच्या माहामारीमुळे मृत्यू होत असलेल्या टीबीच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यातून असं दिसून येतं की, टीबी असलेल्या रुग्णांना या माहामारीचा धोका जास्त आहे. 

दरम्यान जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 32 लाखांच्या वर गेला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

याच दरम्यान कोरोनाचा धक्कादायक ग्राफ समोर आला आहे. गेल्या 10 दिवसांत देशात कोरोना व्हायरसमुळे तब्बल 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसाला जवळपास 1000 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. देशातील रुग्णसंख्या रोज नवा उच्चांक गाठत असून 32 लाखांचा टप्पा आता पार केला आहे.

 देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे अनेक नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 लाख 34 हजार 475 वर पोहोचली असून कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 59,449 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 7,07,267 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 24,67,759 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

हे पण वाचा-

लढ्याला यश! भारतात कोरोनाची 2 सर्वात स्वस्त औषधं आली; एक टॅब्लेट 55 रुपयांना

युद्ध जिंकणार! रशियाकडून कोरोना लसीबाबत गुड न्यूज; लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू होणार? 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स