शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Diet Plan : चहाबरोबर खारी, रक्तातील साखर होईल भारी; सकाळी मैदा खाणे हानीकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 10:57 IST

बऱ्याच मुलांना बिस्किटचा संपूर्ण पुडाच लागतो. काही मुले टोस्टवर धडाका लावतात....

पुणे : सकाळी सगळे आवरून झाल्यावर पहिल्या चहाबरोबर खारी, टोस्ट लागतातच. काही नाही तर किमान बिस्किट तरी हवेच. हे सगळे खाण्यासाठी फारच छान लागते; पण ते रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरते. ज्यांना त्रास आहे तो वाढू शकतो तर ज्यांना नाही त्यांना तो सुरू होऊ शकतो.

सगळीकडेच चहा- खारी, बिस्किटे

सर्वसामान्यांपासून ते धनिकांपर्यंत बहुतेकांच्या घरी सकाळच्या चहाची सुरुवात ही त्याच्याबरोबर काहीतरी खायला घेऊनच केली जाते. त्यातही टोस्ट, खारी, बिस्किट हे पदार्थ तर असतातच. लहान मुले तर सकाळी शाळेत जाताना खाण्याची सुरुवातच यापासून करतात. पालकच त्यासाठी आग्रही असतात. बऱ्याच मुलांना बिस्किटचा संपूर्ण पुडाच लागतो. काही मुले टोस्टवर धडाका लावतात तर वसाहतीमधील मुलांंना खारी खाल्याशिवाय होतच नाही.

का नकोत हे पदार्थ?

हे सर्व पदार्थ मैद्यापासून तयार होतात. त्यात पोषणमुल्य तर नाहीतच पण शरीरात आधीपासून असलेल्या योग्य प्रथिनांचीही ते हानी करतात. शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण ते वाढवतात. असेच खाण्याची सवय ठेवली तर शरीरालाही त्याचीच सवय होते. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. ती वाढली की आपोआपच रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. हे चक्रच आहे. खाण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर या सगळ्याची परिणिती अखेर दवाखान्यात दाखल होण्यातच होते.

मग खावे तरी काय?

आहारतज्ज्ञांच्या मते सकाळी सर्वप्रथम आपण जे काही खातो ते शरीराला उपयुक्त घटक ज्यात असतील तेच असायला हवे. कारण, यावेळी खालेल्या पदार्थांचे चांगले पचन होते. मैद्याचे पदार्थ खाल्ले तर त्याचे पचन होईल. मात्र, त्यापासून शरीराला आवश्यक ते घटक मिळणारच नाहीत. त्याचबरोबर नंतरचा शरीराला आवश्यक असणारा नाश्ता करता येणार नाही. कारण, पोट भरलेले असते. त्यामुळे शक्यतो गव्हाच्या पिठापासून तयार केलेला खाकरा किंवा त्यासारखे पदार्थ यावेळी खायला हवेत.

मैद्याच्या पदार्थांमुळे शुगर वाढते, ती अनियंत्रीत होते व वाढलेल्या शुगरमुळे रक्तदाबाचाही त्रास होतो. लहान मुलांसाठी तर हे सर्वात धोकादायक खाणे आहे. कारण, मुलांना त्याची सवय होते व नंतर मग दुसरे पौष्टिक खाणे त्यांच्याकडून होतच नाही. त्यामुळे खारी, टोस्ट असे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत.

- सुप्रिती दीक्षित, आहारतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य