शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त खव्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने होतात 'हे' गंभीर त्रास, असा ओळखा शुद्ध खवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 17:34 IST

आज आम्ही तुम्हाला शुद्ध आणि भेसळयुक्त खव्यामध्ये काय फरक असतो याबद्दल माहिती देणार आहोत. खाली दिलेल्या काही टिप्सच्या आधारे तुम्ही शुद्ध खवा आणि भेसळयुक्त खवा यांच्यातील फरक ओळखू शकता.

सध्या श्रावण महिना सुरु आहे. श्रावण महिन्यात अनेक सण असतात, उपवास असतात आणि या सर्व प्रसंगी आपल्याकडे एक पदार्थ नक्की असतो तो म्हणजे कोणताही गोड पदार्थ. हे गोड मोठ्या प्रमाणात खव्यापासून बनवले जातात. सध्या बाजारातून मिठाईची खरेदी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने केली जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की या सणासुदीच्या काळात बाजारात भेसळयुक्त मिठाई किंवा भेसळयुक्त खव्याचा धंदाही झपाट्याने वाढतो आहे.

त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला शुद्ध आणि भेसळयुक्त खव्यामध्ये काय फरक असतो याबद्दल माहिती देणार आहोत. खाली दिलेल्या काही टिप्सच्या आधारे तुम्ही शुद्ध खवा आणि भेसळयुक्त खवा यांच्यातील फरक ओळखू शकता.

अशी करा शुद्ध आणि भेसळयुक्त खव्याची ओळख

- खव्याचा एक छोटा तुकडा घेऊन अंगठा आणि बोटामध्ये थोडा वेळ दाबा किंवा रगडा. असे केल्यानंतर जर त्यात असलेल्या तुपाचा वास अंगठ्यावर बराच काळ राहिला तर तो खवा शुद्ध समजावा. नाहीतर तो खवा भेसळयुक्त आहे.

- खव्याचा छोटा तुकडा हातावर घ्या आणि त्याचा हाताच्या तळहातावर गोळा तयार करा. तुम्ही ते तळहातांमध्ये बराच वेळ फिरवत राहा. त्यानंतर मऊ गोळा तयार झाला तर तो खावा शुद्ध आहे आणि जर तो गोळा फुटायला लागला तर समजून घ्या की तो खवा भेसळयुक्त आहे.

- थोडे पाणी गरम करून त्यात 5 ग्रॅम खवा घाला. ते थंड झाल्यावर त्यात आयोडीनचे द्रावण टाका. यानंतर खव्याचा रंग निळा पडू लागला तर समजून घ्या की तो खवा भेसळयुक्त आहे.

- शुद्ध आणि भेसळयुक्त खाव्यात फरक ओळखण्यासाठी तुम्ही आणखी एक उपाय करू शकता. खवा तोंडात टाका. तोंडात टाकल्यानंतर जर खवा तोंडाला चिकटत असेल तर तो भेसळयुक्त खवा आहे. कारण खऱ्या खव्याची चव कच्च्या दुधासारखी असते आणि तो चिकटत नाही.

- खव्याची शुद्धता ओळखण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. खव्याचा थोडा तुकडा पाण्यात टाकून फेटा. यानंतर त्याचे छोटे तुकडे झाले तर तो खवा भेसळयुक्त आहे आणि असा खवा खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

भेसळयुक्त खावा खाल्ल्याने होतात हे दुष्परिणामभेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास विषबाधा, उलट्या, पोटदुखी आदी समस्या उद्भवू शकतात, असे डॉक्टरांचे मत आहे. भेसळयुक्त खव्यापासून बनवलेल्या मिठाईमुळे आपल्या किडनी आणि यकृतावर परिणाम होतो आणि पचनक्रियाही बिघडते. त्यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. या मिठाई खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स