शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

नाश्त्याला चहा बरोबर चपाती खात असाल तर ही चूक करु नका, पडेल अशी महागात की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 17:04 IST

आयुर्वेदातल्या विरुद्ध आहार (Opposite Foods) या प्रकरणात कशासोबत काय खाऊ नये, हे सांगितलेलं आहे. अशा पदार्थांमुळे पोषणमूल्यांचा (Nutrients) ऱ्हास होतो. तसंच गॅसेस, थकवा, मळमळ, पोट फुगणे अशा पचनासंदर्भातल्या तक्रारी निर्माण होतात.

कोरोनाकाळात घरी बसलेल्या बहुतांश जणांनी अन्नपदार्थ तयार करायला शिकायचा प्रयत्न केला. सध्या तर इतके नवनवीन पदार्थ व त्यांच्या रेसिपीज उपलब्ध झाल्या आहेत, की घरबसल्या कोणालाही ते करणं सहज शक्य होऊ शकतं. जिभेचे चोचले पुरवायला कोणाला नाही आवडत? पण हे करताना तब्येतीवर होणारा आहाराचा परिणाम विसरून चालत नाही. आयुर्वेदही हेच सांगतो. आयुर्वेदात काय खावं, किती खावं, कधी खावं याबाबत नियम सांगितले आहेत. कोणत्या पदार्थांसोबत काय खावं, किंवा खाऊ नये हेही सांगितलं आहे. आहारतज्ज्ञही तेच सांगतात. 'हिंदुस्तान टाइम्स'ने याबाबत माहिती देणाकं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

आयुर्वेदातल्या विरुद्ध आहार (Opposite Foods) या प्रकरणात कशासोबत काय खाऊ नये, हे सांगितलेलं आहे. अशा पदार्थांमुळे पोषणमूल्यांचा (Nutrients) ऱ्हास होतो. तसंच गॅसेस, थकवा, मळमळ, पोट फुगणे अशा पचनासंदर्भातल्या तक्रारी निर्माण होतात.

कोबी-फ्लॉवर वर्गातल्या भाज्यांसोबत आयोडीन असलेल्या भाज्याकोबी, फ्लॉवर, लेट्यूस, ब्रोकोली अशा भाज्यांमधलं संयुगं आयोडीन शोषून घ्यायला बाधा आणतात. त्यामुळे थायरॉइड ग्रंथीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे थायरॉइड संदर्भातला काही आजार असल्यास क्रुसिफेरस (Cruciferous) वर्गातल्या भाज्या अर्थात कोबी-फ्लॉवरसारख्या भाज्यांचं सेवन कमी करावं. तसंच मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि फोर्टिफाइड सॉल्ट यांच्यासोबत अशा भाज्यांचं सेवन करू नये.

क जीवनसत्त्व आणि दूधक जीवनसत्त्व (Vitamin C) असणारी पालकासारखी भाजी आणि संत्रं, लिंबू, प्लम, बेरी वर्गातली फळं यांच्यात आम्ल असतं. दुधामध्ये केसिन (Casein) नावाचं संयुग असतं. आधीच दूध पचायला जड असतं. त्यात जर ते क जीवनसत्त्व असलेल्या भाज्या किंवा फळांसोबत घेतलं, तर ते घट्ट होण्याची प्रक्रिया होते. यामुळे गॅसेस, छातीत जळजळ अशा तक्रारी सुरू होतात.

चहा आणि लोहयुक्त पदार्थअनेकांना चहासोबत पोळी खाण्याची सवय असते; मात्र ती चुकीची असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. चहासोबत लोहयुक्त पदार्थ (Iron Rich Foods) खाल्ल्यानं चहातलं टॅनिन आणि ऑक्झॅलेट्स शरीरात शोषले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे चहासोबत धान्याचे पदार्थ, पालेभाज्या, नट्स (Nuts) खाऊ नयेत. उपाशीपोटी चहा घेणंही टाळावं.

आहारासोबत फळांचं सेवनफळं पचायला हलकी व सोपी असतात; मात्र जेवण पचायला वेळ लागतो. या विरुद्ध गुणधर्मांमुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेचच फळं खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो. त्याचं कारण जेव्हा अन्न पचायला सुरुवात होते, तेव्हा तुम्ही खाल्लेली फळं पोटात तशीच राहतात व त्यामुळे आंबवण्याची (Fermatation) क्रिया होते.

नट्स भिजवल्याशिवाय खाऊ नयेतनट्समध्ये फायटिक आम्ल (Phytic Acid) नावाचं संयुग असतं. या संयुगामुळे नट्समधल्या कॅल्शिअम, आयर्न, झिंक या गोष्टी शरीरात शोषल्या जाऊ शकत नाहीत. बदाम, शेंगदाणे, अक्रोड, सोयाबीन, डाळी भिजवल्यानंतर त्यांच्यातलं आम्ल कमी होतं. त्यामुळे ते घटक अधिक पोषक ठरतात.

विरुद्ध आहार घेतल्यानं पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आहार सर्वसमावेशक आणि योग्य असावा, असं आपलं आहारशास्त्र सांगतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स