शहरं
Join us  
Trending Stories
1
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
2
‘सत्तेत राहून एकमेकावर आरोप कसले करतात? हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा’, काँग्रेसचं भाजपा आणि अजित पवारांना आव्हान   
3
भारत, चीन, ब्राझील आणि सौदी अरेबिया अमेरिकेतून काढताहेत पैसे, जाणून घ्या कारण
4
बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप
5
Rohini Acharya : "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट
6
'तुषार आपटेचं भर चौकात मुंडके छाटा', स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करताच कालीचरण महाराज कडाडले
7
'भविष्यात शिंदेंची जागा तुरुंगात असेल, त्यांनीच स्वतःच्या गळ्याभोवती फास बांधलाय', गणेश नाईकांचे खळबळजनक गौप्यस्फोट
8
नितीश कुमार यांनी ज्येष्ठ नेत्याला दिला पक्षातून नारळ, जेडीयू म्हणाली, आता आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही
9
Travel : गोव्याचे 'हे' ५ नाईट मार्केट्स एकदातरी बघायलाच हवे! शॉपिंग प्रेमी अन् पर्यटकांसाठी जणू स्वर्गच
10
"३ वर्ष काम बंद, नवीन घराचा हफ्ता द्यायला पैसे नव्हते, त्यावेळी..."; अमृता खानविलकरने सांगितला स्वामी समर्थांचा विलक्षण अनुभव
11
भयावह! आधी अमानुष मारहाण, मग विष पाजलं... बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या
12
IND vs NZ ODI Record: किंग कोहलीकडे विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला मागे टाकत नवा इतिहास रचण्याची संधी
13
Reliance Jio IPO कधी खुला होणार, GMP ९३ रुपयांवर; काय आहे असेल प्राईज ब्रँड?
14
भरधाव वेग, १६ जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू; ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार
16
बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट
17
Numerology: ११ जानेवारीला उघडणार ब्रह्मांडाचे दार; एक तीव्र इच्छा दिवसभरात दोनदा व्यक्त करण्याची संधी!
18
संशयाने चार मुलांना केले अनाथ ! दगडावर ठेचून पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; ८० वर्षीय आजोबांवर आली जबाबदारी
19
WPL 2026 Double Header UP vs GG And MI vs DC Live Streaming : 'डबल हेडर'चा थरार! जेमिमासाठी MI विरुद्धची मॅच ठरेल खास; कारण...
20
२०२६ संपूर्ण वर्ष ५ राशींना साडेसाती, ‘हे’ उपाय करा; शनि काही बिघडवणार नाही, उलट कृपाच करेल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: बालआरोग्याचीच नव्हे तर बालमनाचीही घेऊ काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 20:21 IST

कोरोनाच्या या वातावरणात विविध बालगृहात असणाऱ्या बालकांची मानसिकता आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

>>विजय जाधव

एका सूक्ष्म विषाणूने सध्या मानवी जीव धोक्यात आला आहे. हा कोरोना विषाणूजन्य आजार कुठून आला? त्याचा केव्हा नायनाट होणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. कोरोनाची भीती ही सर्वाधिक मुलं व वृद्धांना अधिक आहे. त्यामुळे त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे आणि कोरोनाला दूर ठेवले पाहिजे. घराघरांतील ज्येष्ठ आणि मुलांची कुटुंबीय काळजी घेत आहेत. मात्र संस्था, बालगृहांतील मुलांच्या संरक्षण आणि सुरक्षेविषयीही सूचना मिळत आहेत.

जी मुले बाहेर संस्थेत आहेत, त्यांना खरी मदत अपेक्षित आहे. सर्व शासकीय, प्रशासकीय संस्था, महानगरपालिका याबाबतीत जागरूक असल्या, तरी या बालकांपर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. आज अनेक बालके आपल्या आईच्या मायेपासून दुर्दैवाने दूर आहेत आणि हे सर्वात मोठे पण भयावह सत्य आहे. समतोलच्या शिबिरात सध्याच्या परिस्थितीत स्टेशनवर राहणा-या कुटुंबातील मुलगा आहे. लॉकडाऊनला सुरुवात झाली, तेव्हा हे कुटुंब आमच्या संपर्कात आले. मुलाला आमच्याकडे देताना आईवडील खूप भावनिक झाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ते गावी निघाले होते. मात्र, ट्रेन बंद झाल्याने त्यांना थांबावे लागले होते.

दोन-तीन दिवसांनी ते भेटायला येणार होते, परंतु पोलिसांनी त्यांना येऊ दिले नाही. अशा वेळी मनात अनेक प्रश्न निर्माण झाले की, ज्यांना मायेनेच तोडले आहे, त्यांना जगताना किती वेदना होत असतील. कारण तुमच्याजवळ सर्वकाही असले, तरीसुद्धा आईच्या मायेचा स्पर्श जगातील कोणत्याही गोष्टीची बरोबरी करू शकणार नाही. हा प्रश्न फक्त समतोलकडे असणा-या बालकांचा नाही, तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील बालगृहात असणा-या बालकांचा आहे. काही मुलांबरोबर बोलताना समजले की, दोन भाऊ एका बालगृहात आहेत. आईवडील नाही, आजी सांभाळत होती. ती दादरला फुले विकते, तिथेच राहायची. त्यात ही दोन मुले सांभाळायची. आर्थिक स्थिती कमजोर होती. मुलांना कोण, कधी, कुठे घेऊन जातील, माहीतही पडणार नाही, म्हणून आजीने त्यांना काळजीपोटी बालगृहात दाखल केले. कोरोनाच्या या महामारीतून मुले वाचली आहेत. परंतु, माझी आजी कुठे असेल, कशी असेल, काय खात असेल, असे अनेक प्रश्न या मुलांना पडले होते. आजच्या स्थितीत आजी भेटायला जरी आली, तरीही मुलांना जवळ घेऊ शकणार नाही किंवा मायेचा स्पर्श करू शकणार नाही. कोरोनाच्या भीतीने सर्वकाही संपेल की काय, असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

सर्वाेच्च न्यायालयाने देशातील सर्व बालकांचे कोरोनापासून सरंक्षण होण्यासाठी काही निर्देश दिलेत.

१) जिल्ह्यातील सर्व अधिकारी ज्यामध्ये बालकल्याण समिती किंवा बालन्याय मंडळ ज्यांना न्यायिक अधिकार आहेत, त्यांनी बालकांच्या हिताचे निर्णय आॅनलाइन किंवा व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने घेण्यास परवानगी दिली आहे, ज्यामध्ये आरोग्य, संरक्षण यांचा विचार होणे आवश्यक आहे.

२) बालकांना लागणा-या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची जबाबदारी आहे.

३) बालकांना कोरोनासंदर्भात काही लक्षणे दिसून आली, तर ताबडतोब स्वतंत्र व्यवस्था तयार व्हायला पाहिजे व तेथे बालके व्यवस्थित राहिली पाहिजे.

४) महिन्यात दोन वेळा वैद्यकीय अधिकारी बालकांची तपासणी करून अहवाल सादर करतील.

५) बालकांना सांभाळणारे कार्यकर्ते किंवा कर्मचारी यांनी सुविधेकडे लक्ष दिले पाहिजे, यात दिरंगाई होऊ नये.

खरंतर, असे अनेक विषय, सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. प्रश्न आहे तो त्याची अंमलबजावणी केली जाते का? हे तपासणीसाठी असणारे अधिकारी भेट देऊन हे बघत आहेत का? आणि ज्या ठिकाणी हे होत नाही, त्यांच्यावर कारवाई होणार का? हा. शासकीय परिपत्रक हे नेहमीच निघते पण इथे प्रश्न आहे, सामाजिक बांधीलकी व देशातील सर्व बालकांप्रति असलेल्या संवेदनशीलतेचा.

मुलांना मदत करायचीच आहे व ती संबंधितांना मिळाली पाहिजे. ती जबाबदारी शासनाची व समाजाची आहे, हे जरी सत्य असले, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चुकीचे वागणारे, खोटी माहिती देणारेही समोर येत आहे. असत्याने वागणाऱ्या या सर्वांना पुढील काळातील फंड, देणग्यांची चिंता पडली आहे. ज्या संस्था व संस्थांमधील बालके हे समाजातील घटक म्हणून निर्धास्तपणे कार्य करीत आहेत, त्यांना मात्र असे कितीही कोरोना आले, तरी फरक पडणार नाही. कारण, त्यामध्ये खरेपणा असेल. सामाजिक बांधीलकी कायम असेल.

(लेखक बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य आहेत.)

(संकलन : स्नेहा पावसकर)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस