शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

CoronaVirus News: बालआरोग्याचीच नव्हे तर बालमनाचीही घेऊ काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 20:21 IST

कोरोनाच्या या वातावरणात विविध बालगृहात असणाऱ्या बालकांची मानसिकता आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

>>विजय जाधव

एका सूक्ष्म विषाणूने सध्या मानवी जीव धोक्यात आला आहे. हा कोरोना विषाणूजन्य आजार कुठून आला? त्याचा केव्हा नायनाट होणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. कोरोनाची भीती ही सर्वाधिक मुलं व वृद्धांना अधिक आहे. त्यामुळे त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे आणि कोरोनाला दूर ठेवले पाहिजे. घराघरांतील ज्येष्ठ आणि मुलांची कुटुंबीय काळजी घेत आहेत. मात्र संस्था, बालगृहांतील मुलांच्या संरक्षण आणि सुरक्षेविषयीही सूचना मिळत आहेत.

जी मुले बाहेर संस्थेत आहेत, त्यांना खरी मदत अपेक्षित आहे. सर्व शासकीय, प्रशासकीय संस्था, महानगरपालिका याबाबतीत जागरूक असल्या, तरी या बालकांपर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. आज अनेक बालके आपल्या आईच्या मायेपासून दुर्दैवाने दूर आहेत आणि हे सर्वात मोठे पण भयावह सत्य आहे. समतोलच्या शिबिरात सध्याच्या परिस्थितीत स्टेशनवर राहणा-या कुटुंबातील मुलगा आहे. लॉकडाऊनला सुरुवात झाली, तेव्हा हे कुटुंब आमच्या संपर्कात आले. मुलाला आमच्याकडे देताना आईवडील खूप भावनिक झाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ते गावी निघाले होते. मात्र, ट्रेन बंद झाल्याने त्यांना थांबावे लागले होते.

दोन-तीन दिवसांनी ते भेटायला येणार होते, परंतु पोलिसांनी त्यांना येऊ दिले नाही. अशा वेळी मनात अनेक प्रश्न निर्माण झाले की, ज्यांना मायेनेच तोडले आहे, त्यांना जगताना किती वेदना होत असतील. कारण तुमच्याजवळ सर्वकाही असले, तरीसुद्धा आईच्या मायेचा स्पर्श जगातील कोणत्याही गोष्टीची बरोबरी करू शकणार नाही. हा प्रश्न फक्त समतोलकडे असणा-या बालकांचा नाही, तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील बालगृहात असणा-या बालकांचा आहे. काही मुलांबरोबर बोलताना समजले की, दोन भाऊ एका बालगृहात आहेत. आईवडील नाही, आजी सांभाळत होती. ती दादरला फुले विकते, तिथेच राहायची. त्यात ही दोन मुले सांभाळायची. आर्थिक स्थिती कमजोर होती. मुलांना कोण, कधी, कुठे घेऊन जातील, माहीतही पडणार नाही, म्हणून आजीने त्यांना काळजीपोटी बालगृहात दाखल केले. कोरोनाच्या या महामारीतून मुले वाचली आहेत. परंतु, माझी आजी कुठे असेल, कशी असेल, काय खात असेल, असे अनेक प्रश्न या मुलांना पडले होते. आजच्या स्थितीत आजी भेटायला जरी आली, तरीही मुलांना जवळ घेऊ शकणार नाही किंवा मायेचा स्पर्श करू शकणार नाही. कोरोनाच्या भीतीने सर्वकाही संपेल की काय, असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

सर्वाेच्च न्यायालयाने देशातील सर्व बालकांचे कोरोनापासून सरंक्षण होण्यासाठी काही निर्देश दिलेत.

१) जिल्ह्यातील सर्व अधिकारी ज्यामध्ये बालकल्याण समिती किंवा बालन्याय मंडळ ज्यांना न्यायिक अधिकार आहेत, त्यांनी बालकांच्या हिताचे निर्णय आॅनलाइन किंवा व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने घेण्यास परवानगी दिली आहे, ज्यामध्ये आरोग्य, संरक्षण यांचा विचार होणे आवश्यक आहे.

२) बालकांना लागणा-या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची जबाबदारी आहे.

३) बालकांना कोरोनासंदर्भात काही लक्षणे दिसून आली, तर ताबडतोब स्वतंत्र व्यवस्था तयार व्हायला पाहिजे व तेथे बालके व्यवस्थित राहिली पाहिजे.

४) महिन्यात दोन वेळा वैद्यकीय अधिकारी बालकांची तपासणी करून अहवाल सादर करतील.

५) बालकांना सांभाळणारे कार्यकर्ते किंवा कर्मचारी यांनी सुविधेकडे लक्ष दिले पाहिजे, यात दिरंगाई होऊ नये.

खरंतर, असे अनेक विषय, सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. प्रश्न आहे तो त्याची अंमलबजावणी केली जाते का? हे तपासणीसाठी असणारे अधिकारी भेट देऊन हे बघत आहेत का? आणि ज्या ठिकाणी हे होत नाही, त्यांच्यावर कारवाई होणार का? हा. शासकीय परिपत्रक हे नेहमीच निघते पण इथे प्रश्न आहे, सामाजिक बांधीलकी व देशातील सर्व बालकांप्रति असलेल्या संवेदनशीलतेचा.

मुलांना मदत करायचीच आहे व ती संबंधितांना मिळाली पाहिजे. ती जबाबदारी शासनाची व समाजाची आहे, हे जरी सत्य असले, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चुकीचे वागणारे, खोटी माहिती देणारेही समोर येत आहे. असत्याने वागणाऱ्या या सर्वांना पुढील काळातील फंड, देणग्यांची चिंता पडली आहे. ज्या संस्था व संस्थांमधील बालके हे समाजातील घटक म्हणून निर्धास्तपणे कार्य करीत आहेत, त्यांना मात्र असे कितीही कोरोना आले, तरी फरक पडणार नाही. कारण, त्यामध्ये खरेपणा असेल. सामाजिक बांधीलकी कायम असेल.

(लेखक बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य आहेत.)

(संकलन : स्नेहा पावसकर)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस