शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

फुड पॉयझनिंगची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा अन्यथा झालेला असेल खूप उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:19 IST

फूड पॉयझनिंग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कशी असतात ते जाणून घेऊया.

आज ७ जून जगभरात 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' साजरा केला जातो. अन्नातील धोके टाळणे, ते शोधणे आणि उपाय करण्यासाठी दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो. आपण जे काही खात आहात ते स्वच्छ, ताजे आणि पौष्टिक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दीर्घायुष्यासाठी आपले एकंदर आरोग्य चांगले राहील. आपण अन्नजन्य रोग, अन्न विषबाधा टाळू शकता. दरवर्षी एका खास थीम अंतर्गत लोकांचे लक्ष याकडे वेधले जाते, लोकांना जागरूक केले जाते. यंदाच्या 'जागतिक अन्न सुरक्षा दिना'ची थीम 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' अशी आहे. म्हणजेच जेवढे सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी खाल तेवढे तुमचे आरोग्य चांगले राहील.

सर्व वयोगटातील लोकांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः उन्हाळ्यात अन्नजन्य रोगांचा धोका जास्त असतो, ज्यामध्ये अन्न विषबाधा ही एक कॉमन समस्या आहे. फूड पॉयझनिंग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कशी असतात ते जाणून घेऊया.

अन्नजन्य रोग म्हणजे काय?जेव्हा तुम्ही दूषित अन्न किंवा पाणी, द्रवपदार्थ सेवन करता तेव्हा अन्नजन्य रोग होतात. अनेक प्रकारचे रोग निर्माण करणारे सूक्ष्मजंतू किंवा रोगजनक अन्नपदार्थ दूषित करू शकतात, त्यामुळे विविध प्रकारचे अन्नजन्य आजार होऊ शकतात. बहुतेक अन्नजन्य रोग हे विविध जीवाणू, विषाणू आणि परजीवी यांच्यामुळे होणारे संक्रमण असतात. असुरक्षित खाद्यपदार्थांमुळे अनेक रोग होतात.

अन्न विषबाधा म्हणजे काय? हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अन्नातून होणार्‍या आजारांना सामान्यतः अन्न विषबाधा म्हणतात. दूषित, खराब झालेले किंवा विषारी अन्न खाल्ल्याने असे होते. अन्न विषबाधेच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या आणि अतिसार यांचा समावेश होतो. दरवर्षी जगभरातील लाखो लोकांना कोणत्या ना कोणत्या अन्न विषबाधेचा त्रास होतो. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. अन्नातून विषबाधा झाल्यास काहीवेळा ते एका दिवसात बरे होऊ शकते, काहीवेळा यास 1 आठवड्यापासून 8 आठवडे देखील लागतात. काही प्रकरणे उपचाराशिवाय बरे होतात.

अन्न विषबाधेची लक्षणे -अन्न विषबाधा संसर्गाच्या स्त्रोतावर अवलंबून असल्याने लक्षणे देखील बदलू शकतात. अन्नातून विषबाधेच्या सामान्य प्रकरणांमध्ये खालील लक्षणे दिसतात-

  • ओटीपोटात दुखणे, पेटके
  • अतिसार
  • उलट्या, मळमळ
  • भूक न लागणे
  • अशक्त वाटणे
  • डोकेदुखी
  • अन्न विषबाधाची गंभीर लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात:
  • अतिसार जो 3 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकतो.
  • 102°F पेक्षा जास्त ताप आहे.
  • पाहण्यात किंवा बोलण्यात अडचण.
  • तोंड कोरडे पडण्यासह निर्जलीकरणाची गंभीर लक्षणे, लघवी कमी होणे.
  • लघवी करताना रक्त येणे.

अन्नातून विषबाधेवर उपचार -गंभीर लक्षणे दिसत नसल्यास या विषबाधेवर उपचार घरी देखील शक्य आहेत. यासाठी तुम्हाला स्वतःला हायड्रेट ठेवावे लागेल. इलेक्ट्रोलाइट्स समृद्ध स्पोर्ट्स ड्रिंक्स प्या. नारळ पाणी प्यायल्याने ताजी फळे, कार्बोहायड्रेट्स शरीरात राहतात आणि थकवा दूर होतो. या काळात कॅफिनचे सेवन टाळा. हर्बल चहा प्या, ज्यामध्ये कॅमोमाइल, पेपरमिंट, डँडेलियन औषधी वनस्पती असतील. हे सर्व खराब पोट, अस्वस्थ पचन सुधारण्यास मदत करतात. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे योग्य वेळी घ्या. जुलाब, उलट्या झाल्यास स्वत: औषध घेऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरी शिजवलेले हलके, पचण्याजोगे अन्न खा. दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीज, चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, साखरयुक्त पदार्थ, अल्कोहोल, कॅफिन, शक्यतो खाऊ नका.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स