शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

फुड पॉयझनिंगची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा अन्यथा झालेला असेल खूप उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:19 IST

फूड पॉयझनिंग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कशी असतात ते जाणून घेऊया.

आज ७ जून जगभरात 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' साजरा केला जातो. अन्नातील धोके टाळणे, ते शोधणे आणि उपाय करण्यासाठी दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो. आपण जे काही खात आहात ते स्वच्छ, ताजे आणि पौष्टिक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दीर्घायुष्यासाठी आपले एकंदर आरोग्य चांगले राहील. आपण अन्नजन्य रोग, अन्न विषबाधा टाळू शकता. दरवर्षी एका खास थीम अंतर्गत लोकांचे लक्ष याकडे वेधले जाते, लोकांना जागरूक केले जाते. यंदाच्या 'जागतिक अन्न सुरक्षा दिना'ची थीम 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' अशी आहे. म्हणजेच जेवढे सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी खाल तेवढे तुमचे आरोग्य चांगले राहील.

सर्व वयोगटातील लोकांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः उन्हाळ्यात अन्नजन्य रोगांचा धोका जास्त असतो, ज्यामध्ये अन्न विषबाधा ही एक कॉमन समस्या आहे. फूड पॉयझनिंग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कशी असतात ते जाणून घेऊया.

अन्नजन्य रोग म्हणजे काय?जेव्हा तुम्ही दूषित अन्न किंवा पाणी, द्रवपदार्थ सेवन करता तेव्हा अन्नजन्य रोग होतात. अनेक प्रकारचे रोग निर्माण करणारे सूक्ष्मजंतू किंवा रोगजनक अन्नपदार्थ दूषित करू शकतात, त्यामुळे विविध प्रकारचे अन्नजन्य आजार होऊ शकतात. बहुतेक अन्नजन्य रोग हे विविध जीवाणू, विषाणू आणि परजीवी यांच्यामुळे होणारे संक्रमण असतात. असुरक्षित खाद्यपदार्थांमुळे अनेक रोग होतात.

अन्न विषबाधा म्हणजे काय? हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अन्नातून होणार्‍या आजारांना सामान्यतः अन्न विषबाधा म्हणतात. दूषित, खराब झालेले किंवा विषारी अन्न खाल्ल्याने असे होते. अन्न विषबाधेच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या आणि अतिसार यांचा समावेश होतो. दरवर्षी जगभरातील लाखो लोकांना कोणत्या ना कोणत्या अन्न विषबाधेचा त्रास होतो. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. अन्नातून विषबाधा झाल्यास काहीवेळा ते एका दिवसात बरे होऊ शकते, काहीवेळा यास 1 आठवड्यापासून 8 आठवडे देखील लागतात. काही प्रकरणे उपचाराशिवाय बरे होतात.

अन्न विषबाधेची लक्षणे -अन्न विषबाधा संसर्गाच्या स्त्रोतावर अवलंबून असल्याने लक्षणे देखील बदलू शकतात. अन्नातून विषबाधेच्या सामान्य प्रकरणांमध्ये खालील लक्षणे दिसतात-

  • ओटीपोटात दुखणे, पेटके
  • अतिसार
  • उलट्या, मळमळ
  • भूक न लागणे
  • अशक्त वाटणे
  • डोकेदुखी
  • अन्न विषबाधाची गंभीर लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात:
  • अतिसार जो 3 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकतो.
  • 102°F पेक्षा जास्त ताप आहे.
  • पाहण्यात किंवा बोलण्यात अडचण.
  • तोंड कोरडे पडण्यासह निर्जलीकरणाची गंभीर लक्षणे, लघवी कमी होणे.
  • लघवी करताना रक्त येणे.

अन्नातून विषबाधेवर उपचार -गंभीर लक्षणे दिसत नसल्यास या विषबाधेवर उपचार घरी देखील शक्य आहेत. यासाठी तुम्हाला स्वतःला हायड्रेट ठेवावे लागेल. इलेक्ट्रोलाइट्स समृद्ध स्पोर्ट्स ड्रिंक्स प्या. नारळ पाणी प्यायल्याने ताजी फळे, कार्बोहायड्रेट्स शरीरात राहतात आणि थकवा दूर होतो. या काळात कॅफिनचे सेवन टाळा. हर्बल चहा प्या, ज्यामध्ये कॅमोमाइल, पेपरमिंट, डँडेलियन औषधी वनस्पती असतील. हे सर्व खराब पोट, अस्वस्थ पचन सुधारण्यास मदत करतात. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे योग्य वेळी घ्या. जुलाब, उलट्या झाल्यास स्वत: औषध घेऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरी शिजवलेले हलके, पचण्याजोगे अन्न खा. दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीज, चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, साखरयुक्त पदार्थ, अल्कोहोल, कॅफिन, शक्यतो खाऊ नका.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स