शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

फुड पॉयझनिंगची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा अन्यथा झालेला असेल खूप उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:19 IST

फूड पॉयझनिंग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कशी असतात ते जाणून घेऊया.

आज ७ जून जगभरात 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' साजरा केला जातो. अन्नातील धोके टाळणे, ते शोधणे आणि उपाय करण्यासाठी दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो. आपण जे काही खात आहात ते स्वच्छ, ताजे आणि पौष्टिक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दीर्घायुष्यासाठी आपले एकंदर आरोग्य चांगले राहील. आपण अन्नजन्य रोग, अन्न विषबाधा टाळू शकता. दरवर्षी एका खास थीम अंतर्गत लोकांचे लक्ष याकडे वेधले जाते, लोकांना जागरूक केले जाते. यंदाच्या 'जागतिक अन्न सुरक्षा दिना'ची थीम 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' अशी आहे. म्हणजेच जेवढे सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी खाल तेवढे तुमचे आरोग्य चांगले राहील.

सर्व वयोगटातील लोकांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः उन्हाळ्यात अन्नजन्य रोगांचा धोका जास्त असतो, ज्यामध्ये अन्न विषबाधा ही एक कॉमन समस्या आहे. फूड पॉयझनिंग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कशी असतात ते जाणून घेऊया.

अन्नजन्य रोग म्हणजे काय?जेव्हा तुम्ही दूषित अन्न किंवा पाणी, द्रवपदार्थ सेवन करता तेव्हा अन्नजन्य रोग होतात. अनेक प्रकारचे रोग निर्माण करणारे सूक्ष्मजंतू किंवा रोगजनक अन्नपदार्थ दूषित करू शकतात, त्यामुळे विविध प्रकारचे अन्नजन्य आजार होऊ शकतात. बहुतेक अन्नजन्य रोग हे विविध जीवाणू, विषाणू आणि परजीवी यांच्यामुळे होणारे संक्रमण असतात. असुरक्षित खाद्यपदार्थांमुळे अनेक रोग होतात.

अन्न विषबाधा म्हणजे काय? हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अन्नातून होणार्‍या आजारांना सामान्यतः अन्न विषबाधा म्हणतात. दूषित, खराब झालेले किंवा विषारी अन्न खाल्ल्याने असे होते. अन्न विषबाधेच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या आणि अतिसार यांचा समावेश होतो. दरवर्षी जगभरातील लाखो लोकांना कोणत्या ना कोणत्या अन्न विषबाधेचा त्रास होतो. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. अन्नातून विषबाधा झाल्यास काहीवेळा ते एका दिवसात बरे होऊ शकते, काहीवेळा यास 1 आठवड्यापासून 8 आठवडे देखील लागतात. काही प्रकरणे उपचाराशिवाय बरे होतात.

अन्न विषबाधेची लक्षणे -अन्न विषबाधा संसर्गाच्या स्त्रोतावर अवलंबून असल्याने लक्षणे देखील बदलू शकतात. अन्नातून विषबाधेच्या सामान्य प्रकरणांमध्ये खालील लक्षणे दिसतात-

  • ओटीपोटात दुखणे, पेटके
  • अतिसार
  • उलट्या, मळमळ
  • भूक न लागणे
  • अशक्त वाटणे
  • डोकेदुखी
  • अन्न विषबाधाची गंभीर लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात:
  • अतिसार जो 3 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकतो.
  • 102°F पेक्षा जास्त ताप आहे.
  • पाहण्यात किंवा बोलण्यात अडचण.
  • तोंड कोरडे पडण्यासह निर्जलीकरणाची गंभीर लक्षणे, लघवी कमी होणे.
  • लघवी करताना रक्त येणे.

अन्नातून विषबाधेवर उपचार -गंभीर लक्षणे दिसत नसल्यास या विषबाधेवर उपचार घरी देखील शक्य आहेत. यासाठी तुम्हाला स्वतःला हायड्रेट ठेवावे लागेल. इलेक्ट्रोलाइट्स समृद्ध स्पोर्ट्स ड्रिंक्स प्या. नारळ पाणी प्यायल्याने ताजी फळे, कार्बोहायड्रेट्स शरीरात राहतात आणि थकवा दूर होतो. या काळात कॅफिनचे सेवन टाळा. हर्बल चहा प्या, ज्यामध्ये कॅमोमाइल, पेपरमिंट, डँडेलियन औषधी वनस्पती असतील. हे सर्व खराब पोट, अस्वस्थ पचन सुधारण्यास मदत करतात. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे योग्य वेळी घ्या. जुलाब, उलट्या झाल्यास स्वत: औषध घेऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरी शिजवलेले हलके, पचण्याजोगे अन्न खा. दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीज, चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, साखरयुक्त पदार्थ, अल्कोहोल, कॅफिन, शक्यतो खाऊ नका.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स