शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

फुड पॉयझनिंगची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा अन्यथा झालेला असेल खूप उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:19 IST

फूड पॉयझनिंग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कशी असतात ते जाणून घेऊया.

आज ७ जून जगभरात 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' साजरा केला जातो. अन्नातील धोके टाळणे, ते शोधणे आणि उपाय करण्यासाठी दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो. आपण जे काही खात आहात ते स्वच्छ, ताजे आणि पौष्टिक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दीर्घायुष्यासाठी आपले एकंदर आरोग्य चांगले राहील. आपण अन्नजन्य रोग, अन्न विषबाधा टाळू शकता. दरवर्षी एका खास थीम अंतर्गत लोकांचे लक्ष याकडे वेधले जाते, लोकांना जागरूक केले जाते. यंदाच्या 'जागतिक अन्न सुरक्षा दिना'ची थीम 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' अशी आहे. म्हणजेच जेवढे सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी खाल तेवढे तुमचे आरोग्य चांगले राहील.

सर्व वयोगटातील लोकांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः उन्हाळ्यात अन्नजन्य रोगांचा धोका जास्त असतो, ज्यामध्ये अन्न विषबाधा ही एक कॉमन समस्या आहे. फूड पॉयझनिंग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कशी असतात ते जाणून घेऊया.

अन्नजन्य रोग म्हणजे काय?जेव्हा तुम्ही दूषित अन्न किंवा पाणी, द्रवपदार्थ सेवन करता तेव्हा अन्नजन्य रोग होतात. अनेक प्रकारचे रोग निर्माण करणारे सूक्ष्मजंतू किंवा रोगजनक अन्नपदार्थ दूषित करू शकतात, त्यामुळे विविध प्रकारचे अन्नजन्य आजार होऊ शकतात. बहुतेक अन्नजन्य रोग हे विविध जीवाणू, विषाणू आणि परजीवी यांच्यामुळे होणारे संक्रमण असतात. असुरक्षित खाद्यपदार्थांमुळे अनेक रोग होतात.

अन्न विषबाधा म्हणजे काय? हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अन्नातून होणार्‍या आजारांना सामान्यतः अन्न विषबाधा म्हणतात. दूषित, खराब झालेले किंवा विषारी अन्न खाल्ल्याने असे होते. अन्न विषबाधेच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या आणि अतिसार यांचा समावेश होतो. दरवर्षी जगभरातील लाखो लोकांना कोणत्या ना कोणत्या अन्न विषबाधेचा त्रास होतो. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. अन्नातून विषबाधा झाल्यास काहीवेळा ते एका दिवसात बरे होऊ शकते, काहीवेळा यास 1 आठवड्यापासून 8 आठवडे देखील लागतात. काही प्रकरणे उपचाराशिवाय बरे होतात.

अन्न विषबाधेची लक्षणे -अन्न विषबाधा संसर्गाच्या स्त्रोतावर अवलंबून असल्याने लक्षणे देखील बदलू शकतात. अन्नातून विषबाधेच्या सामान्य प्रकरणांमध्ये खालील लक्षणे दिसतात-

  • ओटीपोटात दुखणे, पेटके
  • अतिसार
  • उलट्या, मळमळ
  • भूक न लागणे
  • अशक्त वाटणे
  • डोकेदुखी
  • अन्न विषबाधाची गंभीर लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात:
  • अतिसार जो 3 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकतो.
  • 102°F पेक्षा जास्त ताप आहे.
  • पाहण्यात किंवा बोलण्यात अडचण.
  • तोंड कोरडे पडण्यासह निर्जलीकरणाची गंभीर लक्षणे, लघवी कमी होणे.
  • लघवी करताना रक्त येणे.

अन्नातून विषबाधेवर उपचार -गंभीर लक्षणे दिसत नसल्यास या विषबाधेवर उपचार घरी देखील शक्य आहेत. यासाठी तुम्हाला स्वतःला हायड्रेट ठेवावे लागेल. इलेक्ट्रोलाइट्स समृद्ध स्पोर्ट्स ड्रिंक्स प्या. नारळ पाणी प्यायल्याने ताजी फळे, कार्बोहायड्रेट्स शरीरात राहतात आणि थकवा दूर होतो. या काळात कॅफिनचे सेवन टाळा. हर्बल चहा प्या, ज्यामध्ये कॅमोमाइल, पेपरमिंट, डँडेलियन औषधी वनस्पती असतील. हे सर्व खराब पोट, अस्वस्थ पचन सुधारण्यास मदत करतात. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे योग्य वेळी घ्या. जुलाब, उलट्या झाल्यास स्वत: औषध घेऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरी शिजवलेले हलके, पचण्याजोगे अन्न खा. दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीज, चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, साखरयुक्त पदार्थ, अल्कोहोल, कॅफिन, शक्यतो खाऊ नका.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स