शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चक्कर येणे नाही सामान्य, असु शकतो गंभीर आजारांचा धोका; वेळीच करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 17:42 IST

आपल्याला वारंवार खूप चक्कर येत असेल आणि उलट्या होत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. चक्कर येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण (Remedies for Dizziness) कोणते उपाय करू शकतो, ते जाणून घेऊया.

बहुतेक लोकांना चक्कर येण्याची समस्या असते. कधी-कधी बराच वेळ बसून राहिल्यानंतर अचानक उठल्यानंतरही चक्कर येते. सतत चक्कर येणं ही चांगली गोष्ट नाही. शरीरात रक्ताची कमतरता, अशक्तपणा किंवा इतर कोणत्याही शारीरिक समस्यांमुळे तीव्र चक्कर येऊ शकते. यामुळे एखादी व्यक्ती उठल्याबरोबर अचानक कुठेही पडून दुखापत होऊ शकते. उन्हाळ्यात उन्हात जास्त वेळ चालल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊनही चक्कर आल्यासारखे होते. ज्या लोकांना खूप कमी किंवा उच्च रक्तदाब, मॉर्निंग सिकनेस, मधुमेह आहे, त्यांनाही चक्कर येणे किंवा वर्टिगो (Vertigo) ची समस्या असू शकते. आपल्याला वारंवार खूप चक्कर येत असेल आणि उलट्या होत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. चक्कर येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण (Remedies for Dizziness) कोणते उपाय करू शकतो, ते जाणून घेऊया.

पेपरमिंट तेल -काही तेलांच्या वापराने चक्कर येण्याच्या समस्येवर मात करता येते. यासाठी तुम्ही पुदिना तेलाचे दोन ते तीन थेंब आणि एक छोटा चमचा बदाम तेल घ्या. ते मिसळा आणि कपाळावर आणि मानेच्या मागील बाजूस चांगले लावा. उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्यांवर पेपरमिंट तेलाने मात करता येते.

तळव्यांना आल्याचे तेल लावा -आल्याच्या तेलाने चक्कर येण्याची समस्याही कमी होऊ शकते. या तेलाचे दोन ते तीन थेंब घेऊन ते मानेच्या मागील बाजूस, कानांच्या मागे आणि पायाच्या तळव्याखाली लावावे. जेव्हा तुम्हाला चक्कर येते तेव्हा या ठिकाणी हे तेल नक्कीच लावा. आल्यामध्ये मळमळ विरोधी घटक असतात. याच्या मदतीने उलटी, चक्कर येण्याचा त्रास कमी होतो. आल्याचा छोटा तुकडा चघळूनही खाऊ शकता. चक्कर येताच आल्याचा चहा प्या.

फळांचा रस (ज्युस) प्या -काही फळांचा रस प्यायल्यानेही चक्कर येण्याची समस्याही कमी होऊ शकते. तुम्ही लिंबू, अननस, गाजर, संत्री, आले इत्यादींचा रस प्या. हे सर्व रस दिवसातून एकदा प्या. लिंबाचा रस बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. थोडे काळे मीठ, काळी मिरी पावडर टाकून प्या. दोन चमचे आल्याचा रस काढा. तो एक कप पाण्यात मिसळा. इच्छित असल्यास, चवीनुसार मध देखील थोडे घातले जाऊ शकते. हे सर्व रस काही दिवस प्यायल्याने चक्कर येण्याची समस्या दूर होईल. गाजर, अननस, संत्री शरीराला ऊर्जा देतात. चक्कर येण्याची लक्षणे कमी होतात. लिंबामध्ये असे घटक असतात जे मळमळण्याची समस्या कमी करतात, ज्यामुळे उलट्या होत नाहीत.

निरोगी आहार घ्या -सकस आहार घ्या. तुम्ही जे काही खात आहात, त्यात पोषक तत्वे भरपूर असली पाहिजेत, ज्यामुळे शरीरात लोह, रक्त, हिमोग्लोबिन इत्यादींची कमतरता भासू नये. सकस आहाराने शरीर आणि मन व्यवस्थित कार्य करते. शरीरातील पाण्याचे प्रमाण पुरेसे ठेवा. यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील सर्व द्रवपदार्थांचा प्रवाह सुरळीतपणे चालू राहील, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. ब्लॉकेजमुळेही चक्कर येते. हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन बी 3, नियासिन, पोटॅशियम, संपूर्ण धान्यापासून बनवलेले पदार्थ, भाज्यांचे रस इत्यादी खा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स