शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

चक्कर येणे नाही सामान्य, असु शकतो गंभीर आजारांचा धोका; वेळीच करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 17:42 IST

आपल्याला वारंवार खूप चक्कर येत असेल आणि उलट्या होत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. चक्कर येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण (Remedies for Dizziness) कोणते उपाय करू शकतो, ते जाणून घेऊया.

बहुतेक लोकांना चक्कर येण्याची समस्या असते. कधी-कधी बराच वेळ बसून राहिल्यानंतर अचानक उठल्यानंतरही चक्कर येते. सतत चक्कर येणं ही चांगली गोष्ट नाही. शरीरात रक्ताची कमतरता, अशक्तपणा किंवा इतर कोणत्याही शारीरिक समस्यांमुळे तीव्र चक्कर येऊ शकते. यामुळे एखादी व्यक्ती उठल्याबरोबर अचानक कुठेही पडून दुखापत होऊ शकते. उन्हाळ्यात उन्हात जास्त वेळ चालल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊनही चक्कर आल्यासारखे होते. ज्या लोकांना खूप कमी किंवा उच्च रक्तदाब, मॉर्निंग सिकनेस, मधुमेह आहे, त्यांनाही चक्कर येणे किंवा वर्टिगो (Vertigo) ची समस्या असू शकते. आपल्याला वारंवार खूप चक्कर येत असेल आणि उलट्या होत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. चक्कर येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण (Remedies for Dizziness) कोणते उपाय करू शकतो, ते जाणून घेऊया.

पेपरमिंट तेल -काही तेलांच्या वापराने चक्कर येण्याच्या समस्येवर मात करता येते. यासाठी तुम्ही पुदिना तेलाचे दोन ते तीन थेंब आणि एक छोटा चमचा बदाम तेल घ्या. ते मिसळा आणि कपाळावर आणि मानेच्या मागील बाजूस चांगले लावा. उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्यांवर पेपरमिंट तेलाने मात करता येते.

तळव्यांना आल्याचे तेल लावा -आल्याच्या तेलाने चक्कर येण्याची समस्याही कमी होऊ शकते. या तेलाचे दोन ते तीन थेंब घेऊन ते मानेच्या मागील बाजूस, कानांच्या मागे आणि पायाच्या तळव्याखाली लावावे. जेव्हा तुम्हाला चक्कर येते तेव्हा या ठिकाणी हे तेल नक्कीच लावा. आल्यामध्ये मळमळ विरोधी घटक असतात. याच्या मदतीने उलटी, चक्कर येण्याचा त्रास कमी होतो. आल्याचा छोटा तुकडा चघळूनही खाऊ शकता. चक्कर येताच आल्याचा चहा प्या.

फळांचा रस (ज्युस) प्या -काही फळांचा रस प्यायल्यानेही चक्कर येण्याची समस्याही कमी होऊ शकते. तुम्ही लिंबू, अननस, गाजर, संत्री, आले इत्यादींचा रस प्या. हे सर्व रस दिवसातून एकदा प्या. लिंबाचा रस बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. थोडे काळे मीठ, काळी मिरी पावडर टाकून प्या. दोन चमचे आल्याचा रस काढा. तो एक कप पाण्यात मिसळा. इच्छित असल्यास, चवीनुसार मध देखील थोडे घातले जाऊ शकते. हे सर्व रस काही दिवस प्यायल्याने चक्कर येण्याची समस्या दूर होईल. गाजर, अननस, संत्री शरीराला ऊर्जा देतात. चक्कर येण्याची लक्षणे कमी होतात. लिंबामध्ये असे घटक असतात जे मळमळण्याची समस्या कमी करतात, ज्यामुळे उलट्या होत नाहीत.

निरोगी आहार घ्या -सकस आहार घ्या. तुम्ही जे काही खात आहात, त्यात पोषक तत्वे भरपूर असली पाहिजेत, ज्यामुळे शरीरात लोह, रक्त, हिमोग्लोबिन इत्यादींची कमतरता भासू नये. सकस आहाराने शरीर आणि मन व्यवस्थित कार्य करते. शरीरातील पाण्याचे प्रमाण पुरेसे ठेवा. यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील सर्व द्रवपदार्थांचा प्रवाह सुरळीतपणे चालू राहील, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. ब्लॉकेजमुळेही चक्कर येते. हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन बी 3, नियासिन, पोटॅशियम, संपूर्ण धान्यापासून बनवलेले पदार्थ, भाज्यांचे रस इत्यादी खा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स