शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चक्कर येणे नाही सामान्य, असु शकतो गंभीर आजारांचा धोका; वेळीच करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 17:42 IST

आपल्याला वारंवार खूप चक्कर येत असेल आणि उलट्या होत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. चक्कर येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण (Remedies for Dizziness) कोणते उपाय करू शकतो, ते जाणून घेऊया.

बहुतेक लोकांना चक्कर येण्याची समस्या असते. कधी-कधी बराच वेळ बसून राहिल्यानंतर अचानक उठल्यानंतरही चक्कर येते. सतत चक्कर येणं ही चांगली गोष्ट नाही. शरीरात रक्ताची कमतरता, अशक्तपणा किंवा इतर कोणत्याही शारीरिक समस्यांमुळे तीव्र चक्कर येऊ शकते. यामुळे एखादी व्यक्ती उठल्याबरोबर अचानक कुठेही पडून दुखापत होऊ शकते. उन्हाळ्यात उन्हात जास्त वेळ चालल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊनही चक्कर आल्यासारखे होते. ज्या लोकांना खूप कमी किंवा उच्च रक्तदाब, मॉर्निंग सिकनेस, मधुमेह आहे, त्यांनाही चक्कर येणे किंवा वर्टिगो (Vertigo) ची समस्या असू शकते. आपल्याला वारंवार खूप चक्कर येत असेल आणि उलट्या होत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. चक्कर येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण (Remedies for Dizziness) कोणते उपाय करू शकतो, ते जाणून घेऊया.

पेपरमिंट तेल -काही तेलांच्या वापराने चक्कर येण्याच्या समस्येवर मात करता येते. यासाठी तुम्ही पुदिना तेलाचे दोन ते तीन थेंब आणि एक छोटा चमचा बदाम तेल घ्या. ते मिसळा आणि कपाळावर आणि मानेच्या मागील बाजूस चांगले लावा. उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्यांवर पेपरमिंट तेलाने मात करता येते.

तळव्यांना आल्याचे तेल लावा -आल्याच्या तेलाने चक्कर येण्याची समस्याही कमी होऊ शकते. या तेलाचे दोन ते तीन थेंब घेऊन ते मानेच्या मागील बाजूस, कानांच्या मागे आणि पायाच्या तळव्याखाली लावावे. जेव्हा तुम्हाला चक्कर येते तेव्हा या ठिकाणी हे तेल नक्कीच लावा. आल्यामध्ये मळमळ विरोधी घटक असतात. याच्या मदतीने उलटी, चक्कर येण्याचा त्रास कमी होतो. आल्याचा छोटा तुकडा चघळूनही खाऊ शकता. चक्कर येताच आल्याचा चहा प्या.

फळांचा रस (ज्युस) प्या -काही फळांचा रस प्यायल्यानेही चक्कर येण्याची समस्याही कमी होऊ शकते. तुम्ही लिंबू, अननस, गाजर, संत्री, आले इत्यादींचा रस प्या. हे सर्व रस दिवसातून एकदा प्या. लिंबाचा रस बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. थोडे काळे मीठ, काळी मिरी पावडर टाकून प्या. दोन चमचे आल्याचा रस काढा. तो एक कप पाण्यात मिसळा. इच्छित असल्यास, चवीनुसार मध देखील थोडे घातले जाऊ शकते. हे सर्व रस काही दिवस प्यायल्याने चक्कर येण्याची समस्या दूर होईल. गाजर, अननस, संत्री शरीराला ऊर्जा देतात. चक्कर येण्याची लक्षणे कमी होतात. लिंबामध्ये असे घटक असतात जे मळमळण्याची समस्या कमी करतात, ज्यामुळे उलट्या होत नाहीत.

निरोगी आहार घ्या -सकस आहार घ्या. तुम्ही जे काही खात आहात, त्यात पोषक तत्वे भरपूर असली पाहिजेत, ज्यामुळे शरीरात लोह, रक्त, हिमोग्लोबिन इत्यादींची कमतरता भासू नये. सकस आहाराने शरीर आणि मन व्यवस्थित कार्य करते. शरीरातील पाण्याचे प्रमाण पुरेसे ठेवा. यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील सर्व द्रवपदार्थांचा प्रवाह सुरळीतपणे चालू राहील, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. ब्लॉकेजमुळेही चक्कर येते. हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन बी 3, नियासिन, पोटॅशियम, संपूर्ण धान्यापासून बनवलेले पदार्थ, भाज्यांचे रस इत्यादी खा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स