शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

प्रत्येक १० पैकी २ शाळकरी मुलांना हायपरटेंशनची समस्या - स्टडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 11:34 AM

हायपरटेंशन म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या केवळ तरुण आणि वयोवृद्धांनाच नाही तर याच्या जाळ्यात आता शाळकरी मुलंही येऊ लागली आहेत.

(Image Credit : www.repertoiremag.com)

हायपरटेंशन म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या केवळ तरुण आणि वयोवृद्धांनाच नाही तर याच्या जाळ्यात आता शाळकरी मुलंही येऊ लागली आहेत. हरियाणा, गुजरात, गोवा आणि मणिपुरमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून हा खुलासा झाला आहे. त्यात सांगण्यात आलं की, प्रत्येक १० पैकी दोन शाळकरी मुलं-मुली हायपरटेंशनने पीडित आहेत. 

अभ्यासातून हे समोर आलं की, काही मुलांमध्ये उच्च रक्तदाब फार कमी असतो आणि हे जीवनशैलीमध्ये बदल करुन म्हणजेच नियमित व्यायाम, योग्य आहाराने ठीक केलं जाऊ शकतं. जाड मुलांमधील ही समस्या चटपटीत खाद्यपदार्थ कमी करुन आणि वजन कमी करुन दूर केली जाऊ शकते. जर असं केलं गेलं नाही तर स्थिती आणखी वाईट होऊ शकते आणि नंतर डायबिटीज, हार्ट डिजीज आणि स्ट्रोकसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

या चार राज्यांमधील प्राथमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शाळांमधील १४, ९५७ विद्यार्थ्यांवर हा सर्व्हे करण्यात आला. २०१६ मध्ये AIIMS द्वारे जर्नल पीडियाट्रिक्समध्ये प्रकाशित एका दुसऱ्या सर्व्हेमध्ये देण्यात आलेल्या सूचनांनुसार, या सर्व्हेसाठी ५, १० आणि १५ वयोगटातील मुलांची तपासणी करण्यात आली.

यूरोपियन जर्नल ऑफ प्रिवेंटिव कार्डियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या लेखिका डॉ. अनीत सक्सेना यांनी सांगितले की, २३ टक्के मुलांमध्ये हायपरटेंशनची समस्या होती. हा अभ्यास AIIMS, गोवा मेडिकल कॉलेज, मणिपुरच्या नेहरु आयुर्विज्ञान संस्थान, मुंबईतील कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल आणि यूकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोने एकत्र मिळून केला.

हरियाणा(26.5 टक्के), गुजरात(१५ टक्के), गोवा(१० टक्के) आणि मणिपुर (२९ टक्के) विद्यार्थ्यांमध्ये जास्त रक्तदाब आढळून आला. हायपरटेंशनमधील ही विविधता वेगवेगळ्या ठिकाणांवरील वेगवेगळ्या खाद्य संस्कृती आणि वातावरण यामुळे बघायला मिळाली.

डॉ. अनीता सक्सेना यांनी सांगितले की, शाळेतील मुलांच्या उच्च रक्तदाबाची नियमीत तपासणी केली गेली पाहिजे. जेणेकरुन त्यावर उपाय केले जातील. यासाठी शाळांनी आरोग्य कार्यक्रमांमध्ये ब्लड प्रेशरच्या तपासणीचा समावेश करावा. ज्या मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असेल त्यांना वेळीच स्पेशलिस्टकडे घेऊन जावं. तसेच शाळेत निरोगी जीवनशैलीच्या सवयींबाबतही शिक्षण दिलं गेलं पाहिजे. जर या सूचना वेळीच पाळल्या गेल्या तर पुढे जाऊन डायबिटीज, हृदयरोग आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांना रोखण्यास मदत मिळू शकते. 

उच्च रक्तदाब हेच हृदयविकारांचं कारण

उच्च रक्तदाब हेच भारतीयांना होणाऱ्या हृदयविकाराचे मुख्य कारण असून, या पाठोपाठ मधुमेह, तंबाखूचे सेवन व हाय कोलेस्टरॉल याही बाबी हृदयविकाराला कारणीभूत ठरत आहेत. ‘आऊटपेशन्ट केअर’वरील अभ्यासात ही बाब दिसून आली आहे.

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या पिनॅकल इंडिया कार्यक्रमात भारतीय नागरिकात वेगाने वाढणाऱ्या हृदयविकाराच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांच्या मते भारतात हृदयविकाराची शक्यता वाढत आहे; पण हृदयविकार असणाऱ्यांची काळजी किती व कशी घेतली जाते याची मात्र फारशी माहिती नाही. हे संशोधन जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रसिद्ध झाले. 

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगResearchसंशोधन