शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पालक उकडून पाणी फेकण्याची करू नका चूक, या पाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 10:40 IST

Spinach water benefits : जास्तीत जास्त लोक पालक उकडल्यानंतर त्याचं पाणी फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हे पाणी पालकाच्या पानांपेक्षा जास्त फायदेशीर असतं.

Spinach water benefits : पालेभाज्या खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहीत आहेत. पालेभाज्यांनी आरोग्याला अनेक फायदे मिळतात. अनेक आजरांना दूर करण्यास यांनी मदत मिळते. पालेभाज्यांमध्ये सगळ्यात महत्वाची भाजी पालक मानली जाते. पालकाची डाळभाजी लोक आवडीने खातात. लोक आधी पालक उकडतात आणि मग तिची भाजी करतात.

जास्तीत जास्त लोक पालक उकडल्यानंतर त्याचं पाणी फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हे पाणी पालकाच्या पानांपेक्षा जास्त फायदेशीर असतं. त्यात आरोग्याला फायदेशीर अनेक पोषक तत्व असतात. आज तेच जाणून घेऊ.

डोळ्यांसाठी फायदेशीर

पालकाचं गरम पाणी डोळ्यांसाठी फायदेशीर मानलं जातं. या पाण्यात भरपूर व्हिटॅमिन ए असतं, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी थेट फायदेशीर असतं. त्यासोबतच त्यात ल्यूटिन आणि जेक्साथिनसारखे अॅंटी-ऑक्सिडेंट्सही आढळतात. जे डोळ्यांच्या कोशिका मजबूत करतात.

त्वचे ताजीतवाणी होते

पालक उकडल्यानंतर शिल्लक राहिलेलं गरम पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर निघतात. याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या दूर होते. तसेच त्वचा चमकदार होते. इतकंच नाही तर या पाण्याच्या सेवनाने शरीरातील ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं.

इम्यूनिटी वाढते

पालकाच्या गरम पाण्यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि प्रोटीनसहीत अनेक पोषक तत्व असतात. ज्याचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी होतो.

केस होतात मजबूत

पालकाचं गरम पाणी पायल्याने डोक्यावर केसांना फार फायदा होतो. त्यात प्रोटीन आणि आयरन असतं. ज्याने केसांचं मूळ मजबूत होतं आणि ते पांढरे होण्याचा स्पीडही कमी होतो.

पोट चांगलं राहतं

ज्या लोकांना नेहमीच पोटात गडबड असण्याची समस्या असते, त्यांच्यासाटी पालकाचं पाणी फार फायदेशीर असतं. याच्यामुळे त्यांचं मेटाबॉल्जिम वाढतं, ज्यामुळे पोटाचं पचन तंत्र योग्यपणे काम करतं. हे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.

कसं कराल सेवन?

पालक उकडल्यानंतर त्याची पाने बाहेर काढा. शिल्लक राहिलेलं पाणी गाळून एका ग्लासमध्ये टाका. नंतर त्यातं काळं किंवा पांढरं मीठ टाका आणि नंतर हे पाणी चहासारखं एक एक घोट प्यावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य