शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

अहो, कोणाच्या पोटात ३, तर कोणाच्या ४ किडनी! तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 08:46 IST

किडनी पूर्णपणे निकामी झाल्यानंतर प्रत्यारोपण करण्यात येते. किडनी तात्पुरती निकामी झाली असल्यास डायलिसिस करून आयुष्य वाचविता येते.

संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क 

औरंगाबाद : प्रत्येक व्यक्तीच्या पोटात दोन किडनी असतात. मात्र, काही जणांच्या पोटात ३ किडनी, तर काहींच्या पोटात ४ किडनीही आहेत. विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. प्रत्यारोपणात निकामी झालेली किडनी काढली जात नाही, तर त्या किडनीच्या बाजूला नवीन किडनी बसविली जाते. त्यामुळे पोटात किडनींची संख्या वाढते. जुनी किडनीदेखील काही प्रमाणात का होईना काम करत असते, असे तज्ज्ञ सांगतात.     

किडनी पूर्णपणे निकामी झाल्यानंतर प्रत्यारोपण करण्यात येते. किडनी तात्पुरती निकामी झाली असल्यास डायलिसिस करून आयुष्य वाचविता येते. मात्र, किडनी तीन महिन्यांहून अधिक काळ निकामी झाली असेल तर प्रत्यारोपणाच्या पर्यायांची शक्यता तपासून पाहिली जाते.    

अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे रुग्णाच्या किडनीमध्ये जंतुसंसर्ग असेल, खूप सूज असेल, खूप सारे मुतखडे असतील अथवा कर्करोगाची शक्यता असेल तरच जुनी किडनी काढली जाते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

असे होते किडनी प्रत्यारोपण

किडनी दाता आणि रुग्ण या दोघांवर शस्त्रक्रिया एकाच वेळेस बाजूबाजूच्या शस्त्रक्रियागृहांमध्ये होते.डाॅक्टरांची एक टीम दात्याची एक किडनी बाहेर काढते. डाॅक्टरांची दुसरी टीम रुग्णाच्या पोटामध्ये नवीन किडनी बसविण्यासाठी जागा तयार करते. डोनरची किडनी या नवीन जागेत पोटामध्ये बसवली जाते. तिला रक्त पुरवठा व मूत्र विसर्जनासाठीची मूत्राशयाशी जोडणी  शस्त्रक्रियेद्वारे केली जाते.

आजवर ३५० पेक्षा अधिक रुग्णांच्या किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. फार कमी रुग्णांची जुनी किडनी काढावी लागली. प्रत्यारोपण केलेली किडनीही खराब झाली आणि पुन्हा प्रत्यारोपण झाले तर पोटात चार किडनी होतात.  - डाॅ. सचिन सोनी, किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ 

प्रत्यारोपणात निकामी किडनी काढात नाही तर बाजूला अथवा खाली नव्या किडनीचे प्रत्यारोपण करतात. त्यामुळे पोटात ३ किडनी होतात. - डॉ. सुधीर कुलकर्णी, माजी अध्यक्ष, झेडटीसीसी

किडनी निरोगी राहण्यासाठी 

- रोज १० ते १२ ग्लास पाणी पिणे.- नियमित व्यायाम- ४० वर्षांनंतर जेवणात मिठाचे प्रमाण कमी- डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे टाळणे.- उच्चरक्तदाब, मधुमेह, अतिस्थूलपणा नियंत्रणात ठेवणे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य