शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अहो, कोणाच्या पोटात ३, तर कोणाच्या ४ किडनी! तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 08:46 IST

किडनी पूर्णपणे निकामी झाल्यानंतर प्रत्यारोपण करण्यात येते. किडनी तात्पुरती निकामी झाली असल्यास डायलिसिस करून आयुष्य वाचविता येते.

संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क 

औरंगाबाद : प्रत्येक व्यक्तीच्या पोटात दोन किडनी असतात. मात्र, काही जणांच्या पोटात ३ किडनी, तर काहींच्या पोटात ४ किडनीही आहेत. विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. प्रत्यारोपणात निकामी झालेली किडनी काढली जात नाही, तर त्या किडनीच्या बाजूला नवीन किडनी बसविली जाते. त्यामुळे पोटात किडनींची संख्या वाढते. जुनी किडनीदेखील काही प्रमाणात का होईना काम करत असते, असे तज्ज्ञ सांगतात.     

किडनी पूर्णपणे निकामी झाल्यानंतर प्रत्यारोपण करण्यात येते. किडनी तात्पुरती निकामी झाली असल्यास डायलिसिस करून आयुष्य वाचविता येते. मात्र, किडनी तीन महिन्यांहून अधिक काळ निकामी झाली असेल तर प्रत्यारोपणाच्या पर्यायांची शक्यता तपासून पाहिली जाते.    

अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे रुग्णाच्या किडनीमध्ये जंतुसंसर्ग असेल, खूप सूज असेल, खूप सारे मुतखडे असतील अथवा कर्करोगाची शक्यता असेल तरच जुनी किडनी काढली जाते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

असे होते किडनी प्रत्यारोपण

किडनी दाता आणि रुग्ण या दोघांवर शस्त्रक्रिया एकाच वेळेस बाजूबाजूच्या शस्त्रक्रियागृहांमध्ये होते.डाॅक्टरांची एक टीम दात्याची एक किडनी बाहेर काढते. डाॅक्टरांची दुसरी टीम रुग्णाच्या पोटामध्ये नवीन किडनी बसविण्यासाठी जागा तयार करते. डोनरची किडनी या नवीन जागेत पोटामध्ये बसवली जाते. तिला रक्त पुरवठा व मूत्र विसर्जनासाठीची मूत्राशयाशी जोडणी  शस्त्रक्रियेद्वारे केली जाते.

आजवर ३५० पेक्षा अधिक रुग्णांच्या किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. फार कमी रुग्णांची जुनी किडनी काढावी लागली. प्रत्यारोपण केलेली किडनीही खराब झाली आणि पुन्हा प्रत्यारोपण झाले तर पोटात चार किडनी होतात.  - डाॅ. सचिन सोनी, किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ 

प्रत्यारोपणात निकामी किडनी काढात नाही तर बाजूला अथवा खाली नव्या किडनीचे प्रत्यारोपण करतात. त्यामुळे पोटात ३ किडनी होतात. - डॉ. सुधीर कुलकर्णी, माजी अध्यक्ष, झेडटीसीसी

किडनी निरोगी राहण्यासाठी 

- रोज १० ते १२ ग्लास पाणी पिणे.- नियमित व्यायाम- ४० वर्षांनंतर जेवणात मिठाचे प्रमाण कमी- डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे टाळणे.- उच्चरक्तदाब, मधुमेह, अतिस्थूलपणा नियंत्रणात ठेवणे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य