शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तुम्हीही झोपताना स्मार्टफोन जवळ ठेवता तर मग हे वाचाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 10:47 IST

सकाळी उठल्यापासून ते थेट झोपेपर्यंत मोबाईल सोबतच ठेवला जातो. एक क्षण देखील आपण मोबाईल शिवाय राहू शकत नाही. पण मोबाईल जितका उपयोगी आहे, तितकेच त्याचे वाईट परिणामही होत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई : आजच्या टेक्नोसॅव्ही विश्वात प्रत्येकजण हा मोबाईल वापरत असल्याचं पहायला मिळतं. मोबाईल ही गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय, असं बोललं जातं. सकाळी उठल्यापासून ते थेट झोपेपर्यंत मोबाईल सोबतच ठेवला जातो. एक क्षण देखील आपण मोबाईल शिवाय राहू शकत नाही. पण मोबाईल जितका उपयोगी आहे, तितकेच त्याचे वाईट परिणामही होत असल्याचं समोर आलं आहे.

आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपताना स्मार्टफोन सोबत घेऊन झोपण्याची सवय आहे. तुम्हालाही अशीच सवय असेल तर सावध व्हा. कारण यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. 

(Health Tips: मानसिक तणावानं ग्रासले आहात?, तर मग हे नक्की वाचा)

तुमच्या फेव्हरेट स्मार्टफोनमधून मोठ्या प्रमाणात घातक गॅस निघत असतात. संशोधकांनी यामुळेच सावधानतेचा इशारा दिला आहे. संशोधकांच्या एका टीमने लिथियम-आयर्न बॅटरीमधून निघणा-या १०० हून अधिक विषारी गॅसचं परिक्षण केलं आहे. यामध्ये कार्बन मोनोऑक्साइडचाही समावेश आहे. यामुळे डोळे, त्वचा आणि नाकात जळजळ होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. हा गॅस शरीराच्या ज्या अवयवांना थेट हाणी पोहोचवतो, तेवढ्याच प्रमाणात आजुबाजूच्या अवयवांनाही नुकसान पोहचवतो.

(Health 'असं' वजन कमी करायला जाल, तर 'भारी'च पडणार!)

चीनमधील इंस्टीट्यूट ऑफ एनबीसी डिफेंस अँड सिन्गुहा यूनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या संशोधनानुसार, अनेक मोबाईल यूझर्स हे गरम झाल्यानंतरही स्मार्टफोन वापरतात तसेच खराब चार्जरने मोबाईल चार्ज करतात. इंस्टीट्यूट ऑफ एनबीसी डिफेंसचे प्रोफेसर जी सन यांनी सांगितले की, सध्याच्या काळात नागरिक लिथियम ऑयर्न बॅटरीचा वापर करतात. यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Healthआरोग्यtechnologyतंत्रज्ञान