शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पाय आणि डोळ्यांवर सूज किडनीची समस्या असल्यावर शरीरात दिसतात 'हे' संकेत, दुर्लक्ष कराल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 11:58 IST

Kidney Disease Sign : किडनीमध्ये समस्या असेल तर शरीर काही संकेत देतं. ज्याकडे वेळीच लक्ष दिलं तर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो.

Kidney Disease Sign : किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहेत. शरीरातील वेगवेगळ्या कामांमध्ये किडनींची महत्वाची भूमिका असते. किडनीमुळे शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात. तसेच शरीरातील खनिजाचं संतुलन रेग्यूलेट करण्याचं आणि लाल रक्त पेशींची निर्मिती वाढवणाऱ्या हार्मोन्सना तयार करण्याचं काम किडनी करतात. पण किडनींमध्येही आपल्याच काही चुकांमुळे समस्या होतात. 

किडनीमध्ये समस्या असेल तर शरीर काही संकेत देतं. ज्याकडे वेळीच लक्ष दिलं तर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो. अनेकदा या समस्या जीवघेण्याही ठरू शकतात. अशात या संकेतांना ओळखणं गरजेचं असतं.

दिवसभर थकवा

एनएचएसनुसार, जर तुम्हाला अलिकडे जास्त थकवा जाणवत असेल तर याचं कारण तुमची किडनी योग्यप्रकारे काम करत नसल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्या कारणाने होऊ शकतं. विषारी पदार्थ आपल्या शरीरातील इतर जैविक क्रिया प्रभावित करण्याचं काम करतात आणि इतरही अनेक समस्या निर्माण करते.

पुरेश झोप न घेणं

शरीराला आवश्यक तेवढी झोप घेतली नाही तर अनेक समस्या होतात. तेच किडनीची समस्या हेही याचं एक कारण असू शकतं. स्लीप एपनिया किंवा चांगली झोप येत नसेल तर किडनीमध्ये समस्या आहे असं समजा. अशात जर तुम्हाला सतत चांगली झोप येत नसेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा.

कोरडी, खाज असलेली त्वचा

कोरडी आणि खाज असलेली त्वचा विनाकारण बराच काळ राहिली तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. तसेच किडनीसंबंधी टेस्ट करून घ्या. विषारी पदार्थ शरीरात जमा झाल्याने खनिज आणि इतर पोषक तत्वांचं प्रमाण बिघडतं. ज्यामुळे नंतर त्वचा आणि हाडांचं नुकसान होतं.

पायांवर सूज

किडनीमध्ये समस्या असेल तर शरीरातील विषारी  पदार्थ पूर्णपणे बाहेर निघत नाहीत. ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. याचप्रमाणे जेव्हा शरीरातून सोडिअमचं अतिरिक्त प्रमाण बाहेर निघत नाही. तेव्हा पायांवर, टाचांवर आणि तळपायांवर सूज येते. पायांवर सूज येण्याची इतरही आणखी काही कारणे आहेत. पण सल्ला हाच दिला जातो की, पायांवर सूज येत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

डोळ्यांवर सूज

जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला सूज आलेली दिसत असेल तर लगेच किडनीची टेस्ट करा. ही समस्या सामान्यपणे किडनीतील समस्येमुळे होते. कारण किडनी खराब झाल्यावर प्रोटीन लघवीद्वारे बाहेर निघून जातं.

श्वास घेण्यास त्रास

जेव्हा किडनीमध्ये काही समस्या होते तेव्हा रूग्णाला योग्यप्रकारे श्वास घेता येत नाही. हे एरिथ्रोपोइटिन नावाच्या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतं. वेबएमडीनुसार, एरिथ्रोपोयटिन हार्मोन आपल्या शरीराला लाल रक्त पेशी तयार करण्यासाठी संकेत देतात. त्याशिवाय तुम्हाला एनीमिया होऊ शकतो आणि श्वासासंबंधी समस्याही होऊ शकते.

जास्त वेळा लघवी लागणे

अनेकदा लघवीला जास्त जावं लागण्याला किडनीसंबंधी समस्येशी जोडलं जातं. जर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला जास्त वेळा लघवीला जावं लागत असेल तर उशीर न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य