शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पाणी जीव वाचवू शकतं, तसं जिवावर बेतूही शकतं, जास्त पाणी प्यायल्याने होतं 'असं' नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 11:31 IST

Drinking too much water Side Effects : पाणी प्यायल्याने शरीर डायड्रेट राहतं, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण कोणत्याही गोष्टी अति करणं महागात पडत असतं. ते पाण्याबाबतही लागू पडतं. 

Drinking too much water Side Effects : पाणी हे जीवन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याशिवाय जगणं अशक्य आहे. पाण्याने केवळ तहान भागते असं नाही तर पाण्यातून शरीराला अनेक महत्वाचे मिनरल्स मिळतात जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने शरीर डायड्रेट राहतं, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण कोणत्याही गोष्टी अति करणं महागात पडत असतं. ते पाण्याबाबतही लागू पडतं. 

जास्त पाणी पिण्याचे नुकसान

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं घातकही ठरू शकतं. जास्त पाणी प्यायल्याने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. शरीरात जास्त पाणी जमा झाल्याने वॉटर टॉक्सिसिटी होऊ शकते.ही समस्या तेव्हा होते जेव्हा शरीरात प्रमाणापेक्षा जास्त पाणी जमा होतं. जे किडनी बाहेरद्वारे बाहेर काढलं जातं. अशात शरीरात जास्त पाणी झाल्यावर काय समस्या होतात याबाबत एक्सपर्टने काही गोष्टी सांगितल्या आहेत.

काय सांगतात एक्सपर्ट?

एक्सपर्ट सांगतात की, फार जास्त पाणी पिण्याला हायपोनेट्रेमिया किंवा वॉटर इन्टॉक्सिफिकेशन असं म्हटलं जातं. जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट असंतुलित करतात. फार जास्त पाण्याने रक्तात सोडिअमचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे सेल्समध्ये सूज येते. गंभीर स्थितींमध्ये यामुळे झटकेही येऊ शकतात. व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते. 

त्याशिवाय जास्त पाणी प्यायल्याने डोकेदुखी, मळमळ, उलटी आणि भ्रम होण्यासारख्या समस्या होतात. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याचं काम करतात, पण जेव्हा शरीरात पाणी जास्त वाढतं तेव्हा किडनीवर जास्त दबाव पडतो. ज्यामुळे किडनी हे पाणी पूर्णपणे बाहेर काढू शकत नाही.

काय काळजी घ्याल?

शरीर हायड्रेटेड राहणं फार महत्वाचं आहे. तेवढंच गरजेचं आहे की, पाणी योग्य प्रमाणात प्यावं आणि शरीराच्या गरजांवर लक्ष द्यावं. एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण शरीराची पाण्याची गरज ही प्रत्येक व्यक्तीनुसार, वजनानुसार, वयानुसार वेगळी असते. अशात जास्त पाणी पिणं टाळलं पाहिजे. 

किती पाणी प्यावे?

वेगवेगळ्या कारणांनी पाणी पिण्याच्या खास वेळा असतात. पण याचा अर्थ असा नाही की, फक्त याच वेळेवर पाणी प्यावं. कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. ती शरीराची गरज आहे. ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य