शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

पाणी जीव वाचवू शकतं, तसं जिवावर बेतूही शकतं, जास्त पाणी प्यायल्याने होतं 'असं' नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 11:31 IST

Drinking too much water Side Effects : पाणी प्यायल्याने शरीर डायड्रेट राहतं, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण कोणत्याही गोष्टी अति करणं महागात पडत असतं. ते पाण्याबाबतही लागू पडतं. 

Drinking too much water Side Effects : पाणी हे जीवन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याशिवाय जगणं अशक्य आहे. पाण्याने केवळ तहान भागते असं नाही तर पाण्यातून शरीराला अनेक महत्वाचे मिनरल्स मिळतात जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने शरीर डायड्रेट राहतं, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण कोणत्याही गोष्टी अति करणं महागात पडत असतं. ते पाण्याबाबतही लागू पडतं. 

जास्त पाणी पिण्याचे नुकसान

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं घातकही ठरू शकतं. जास्त पाणी प्यायल्याने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. शरीरात जास्त पाणी जमा झाल्याने वॉटर टॉक्सिसिटी होऊ शकते.ही समस्या तेव्हा होते जेव्हा शरीरात प्रमाणापेक्षा जास्त पाणी जमा होतं. जे किडनी बाहेरद्वारे बाहेर काढलं जातं. अशात शरीरात जास्त पाणी झाल्यावर काय समस्या होतात याबाबत एक्सपर्टने काही गोष्टी सांगितल्या आहेत.

काय सांगतात एक्सपर्ट?

एक्सपर्ट सांगतात की, फार जास्त पाणी पिण्याला हायपोनेट्रेमिया किंवा वॉटर इन्टॉक्सिफिकेशन असं म्हटलं जातं. जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट असंतुलित करतात. फार जास्त पाण्याने रक्तात सोडिअमचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे सेल्समध्ये सूज येते. गंभीर स्थितींमध्ये यामुळे झटकेही येऊ शकतात. व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते. 

त्याशिवाय जास्त पाणी प्यायल्याने डोकेदुखी, मळमळ, उलटी आणि भ्रम होण्यासारख्या समस्या होतात. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याचं काम करतात, पण जेव्हा शरीरात पाणी जास्त वाढतं तेव्हा किडनीवर जास्त दबाव पडतो. ज्यामुळे किडनी हे पाणी पूर्णपणे बाहेर काढू शकत नाही.

काय काळजी घ्याल?

शरीर हायड्रेटेड राहणं फार महत्वाचं आहे. तेवढंच गरजेचं आहे की, पाणी योग्य प्रमाणात प्यावं आणि शरीराच्या गरजांवर लक्ष द्यावं. एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण शरीराची पाण्याची गरज ही प्रत्येक व्यक्तीनुसार, वजनानुसार, वयानुसार वेगळी असते. अशात जास्त पाणी पिणं टाळलं पाहिजे. 

किती पाणी प्यावे?

वेगवेगळ्या कारणांनी पाणी पिण्याच्या खास वेळा असतात. पण याचा अर्थ असा नाही की, फक्त याच वेळेवर पाणी प्यावं. कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. ती शरीराची गरज आहे. ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य