काहींना तिखट खाण्यास फार आवडतं. अशा लोकांना जेवणात देखील मिर्ची खाण्याची सवय असते. मिर्ची केवळ जेवणाचा स्वाद वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील लाभदायक ठरते. मात्र मिर्चीचं अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. काही विशिष्ट आजारांच्या व्यक्तींनी मात्र र्चीचं सेवन पूर्ण टाळलं पाहिजे.
बद्धकोष्ठताज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी मिरच्यांचं सेवन अजिबात सेवन करू नये. अन्यथा ही समस्या मुळव्याधाचं रूप धारण करते. याशिवाय ज्यांना आधीच मूळव्याधची समस्या आहे त्यांच्यासाठी मिरचीचे सेवन धोकादायक ठरतं. यामुळे समस्या अधिक वाढू शकते.
अल्सरज्या लोकांना पोटात अल्सरची समस्या आहे, अशा लोकांनी मिरचीचं सेवन करून नये. मिरची खाल्ल्याने जखमा अधिक खोल होतात आणि समस्या खूप गंभीर बनते.
अॅसिडीटीज्या लोकांना अॅसिडीटीची समस्या आहे, त्यांनी मिरची खाणं टाळलं पाहिजे. विशेषत: लाल मिरची अजिबात खाऊ नये. अन्यथा पोटात जळजळ होण्याची समस्या आणि अॅसिडीटी जास्त वाढते. या व्यतिरिक्त, जे लोक जास्त मिरची खातात त्यांना अतिसाराची समस्या देखील असते