शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मिरची जितकी तिखट, त्याचे दुष्परिणाम त्याहूनही तिखट! 'या' व्यक्तींनी तर ढुंकुनही बघु नये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 14:30 IST

मिर्चीचं अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. काही विशिष्ट आजारांच्या व्यक्तींनी मात्र र्चीचं सेवन पूर्ण टाळलं पाहिजे.

काहींना तिखट खाण्यास फार आवडतं. अशा लोकांना जेवणात देखील मिर्ची खाण्याची सवय असते. मिर्ची केवळ जेवणाचा स्वाद वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील लाभदायक ठरते. मात्र मिर्चीचं अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. काही विशिष्ट आजारांच्या व्यक्तींनी मात्र र्चीचं सेवन पूर्ण टाळलं पाहिजे.

दम्याचे रुग्णजास्त प्रमाणात मिरच्यांचं सेवन केल्याने दम्याचा अटॅक येऊ शकतो. म्हणून, जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल किंवा कोणत्याही श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुम्ही मिरच्या, विशेषत: लाल मिरच्यांचं सेवन करणं टाळावं.

बद्धकोष्ठताज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी मिरच्यांचं सेवन अजिबात सेवन करू नये. अन्यथा ही समस्या मुळव्याधाचं रूप धारण करते. याशिवाय ज्यांना आधीच मूळव्याधची समस्या आहे त्यांच्यासाठी मिरचीचे सेवन धोकादायक ठरतं. यामुळे समस्या अधिक वाढू शकते.

त्वचेच्या समस्यास्कीन संदर्भात तक्रार असलेल्या व्यक्तींनीही मिरच्यांचं सेवन करणं टाळावं. ज्या लोकांना त्वचेची समस्या आहे किंवा बऱ्याचदा त्वचेवर पुरळ, खाज सुटणं या तक्रारी असतात त्यांनी मिरचीचं सेवन करू नये. हिरव्या मिरचीत कॅप्सेसीन असतं जे त्वचेच्या समस्या आणखी वाढवते.

अल्सरज्या लोकांना पोटात अल्सरची समस्या आहे, अशा लोकांनी मिरचीचं सेवन करून नये. मिरची खाल्ल्याने जखमा अधिक खोल होतात आणि समस्या खूप गंभीर बनते.

अ‍ॅसिडीटीज्या लोकांना अ‍ॅसिडीटीची समस्या आहे, त्यांनी मिरची खाणं टाळलं पाहिजे. विशेषत: लाल मिरची अजिबात खाऊ नये. अन्यथा पोटात जळजळ होण्याची समस्या आणि अ‍ॅसिडीटी जास्त वाढते. या व्यतिरिक्त, जे लोक जास्त मिरची खातात त्यांना अतिसाराची समस्या देखील असते

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स