शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

जेवण केल्यावर आंघोळ केल्यानं काय होतं? तुम्हीही करत असाल तर लगेच वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:54 IST

Eating Tips : आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अपर्णा पद्मनाभनी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. बरेच लोक जेवणानंतर आंघोळ करतात. पण ही सवय चूक की बरोबर याबाबत त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Bath After Meal Side Effects : आयुर्वेद आरोग्य चांगलं ठेवण्याचा खजिना मानलं जातं. कारण यात जीवन कसं जगायचं आणि आरोग्य कसं निरोगी ठेवायचं याबाबत खडान् खडा माहीत दिली गेली आहे. म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून भारतात लोक आयुर्वेदातील सल्ले फॉलो करतात. तुम्ही अनेकदा घरातील वृद्धांकडून ऐकलं असेल की, रात्री उशीरापर्यंत जागू नये, रिकाम्या पोटी झोपू नये, सकाळी आंघोळ करूनच जेवण करावं. जर तुम्ही याकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलं असेल तर मोठी चूक करत आहात.

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अपर्णा पद्मनाभनी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. बरेच लोक जेवणानंतर आंघोळ करतात. पण ही सवय चूक की बरोबर याबाबत त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.  त्यांनी लिहिलं की, जेवण केल्यानंतर आंघोळ करणं ही चुकीच्या क्रियांपैकी एक आहे. आयुर्वेदात या सवयीला संधीवात किंवा त्वचा रोग होण्याचं मुख्य कारण म्हटलं आहे.

जेवणानंतर का करू नये आंघोळ?

तज्ज्ञांनी सांगितलं की, रिसर्चनुसार जेवण केल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान 2 डिग्रीपर्यंत वाढतं. याने जेवण पचवण्यात मदत होते. जेव्हा पोटात पचनक्रिया सुरू असते तेव्हा ब्लड फ्लो सुद्धा वेगाने होत असतो.

आयर्वेद काय सांगतं?

तज्ज्ञांनी सांगितलं की, आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर लगेच आंघोळ केल्याने पचनक्रिया हळुवार होते. ज्यामुळे अन्नातील पोषक तत्व शरीराला प्रभावीपणे मिळत नाहीत. शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जसे की, संधीवातापासून ते त्वचासंबंधी रोग.

तज्ज्ञ सांगतात की आयुर्वेदानुसार, जेवणाआधी आंघोळ केल्याने तुम्ही निरोगी रहाल. तसेच तुम्ही पोटभर आरामात जेवणही करू शकता. डॉ. अपर्णा यांनी सांगितलं की, जड काही जेवल्यानंतर जवळपास 2 ते 3 तासांपर्यंत आंघोळ करू नये. तर ब्रेकफास्टनंतर 1 तासापर्यंत आंघोळ न केल्यानेही तुमचं आरोग्य चांगलं राहतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स