शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

आजार नसूनही आजारी असल्याच्या भावनेत जगतात ८० टक्के रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 21:51 IST

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात तणावामुळे आजार वाढत आहेत असे म्हटले जाते जाते. मात्र तणावामुळे रक्तदाब किंवा मधुमेह एवढेच नाही तर मनोशारीरिक (सायकोसोमॅटीक) आजारांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज असलेल्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ही खास माहिती.

ठळक मुद्देमनोशारीरिक विकार असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ तणावामुळे आजार असल्याच्या भासात घेतले जात उपचार 

पुणे : प्रसंग एक :  प्रसाद (नाव बदललेले)वय २७, मागील दोन तास डॉक्टरांना मेंदूत बिघाड झाल्याचे पटवत होता. डॉक्टर मात्र एमआरआयचे तपासणीत तसे काहीही निष्पन्न न झाल्याने त्याला गोळ्या देण्यात तयार नव्हते. अखेर प्रसादने दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. 

प्रसंग दोन : वीणाताई (नाव बदललेले) वय ५५ ह्रदयविकाराचा झटका आल्याचा दावा करत एका आठवड्यात तिसऱ्यांदा डॉक्टरांकडे आल्या होत्या. त्यांनाही डॉक्टरांनी तपासणीअंती काहीही झाले नसल्याचे सांगितले. मात्र तरीही त्या मानायला तयार नव्हत्या. 

वरील दोनही केसेसमध्ये शारीरिक आजार नसताना केवळ तणावामुळे शारीरिक आजार आहेतच असा गैरसमज व्यक्ती करून घेते. मनोशारीरिक या नावाने हा  आजार ओळखला जातो. जगभरात तब्बल ८० टक्के लोक या विकाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे तणावाचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषतः मनोशारीरिक विकार असलेल्या रुग्णाला शारीरिक व्याधी नसताना आजारी असल्याची भावना होते, अगदी काहीवेळा वेदनाही होतात. तपासणीअंती काहीही झालं नाहिये असे डॉक्टरांनी पटवले तरी रुग्ण ऐकायला तयार नसतात. 

ही आहेत लक्षणे ?

तणाव हे एकमेव कारण नसले तरी सर्वांचे महत्वाचे कर आहे. कमी वयात वाढत्या अपेक्षांची परिणती तणावात होते आणि त्यातून आजार रुग्णाला जडल्याची भावना निर्माण होते. त्यातही पोटात गाठ आहे, छातीत सतत वेदना होत आहेत, सतत डोके दुखते,हात पाय थरथरणे अशी लक्षणे रुग्णाला जाणवायला लागतात. काही अपवादात्मकवेळा ती खरी असतातही पण अनेकदा त्या भासातून पुढील तपासण्या केल्या तर काहीही निष्पन्न होत नाही. याचा अर्थ रुग्णाला शारीरिक नव्हे तर मानसिक आजार असतो. याच प्रकारचे रुग्ण रोज अपचन होते, अंग दुखते म्हणून गोळीची सवय करतात आणि एका पातळीला त्रास होवो अगर न होवो त्यांना गोळ्या घेतल्याशिवाय चैन पडत नाही. 

प्रतिक्रिया 

हल्ली प्रमाण वाढत आहे मनोशारीरिक आजारांचे. त्यासाठी तणाव हे मुख्य कारण आहे. सर्व वयोगटात असे रुग्ण असून त्यांना आपल्याला काहीही आजार नाही हे स्वीकारणे कठीण जाते. मात्र समुपदेशन आणि तणाव कमी झाल्यावर ते अखेर यातून बाहेर पडतात.  

- डॉ दीपा निलेगावकर, समुपदेशक 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य