शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
6
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
7
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
8
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
9
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

आजार नसूनही आजारी असल्याच्या भावनेत जगतात ८० टक्के रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 21:51 IST

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात तणावामुळे आजार वाढत आहेत असे म्हटले जाते जाते. मात्र तणावामुळे रक्तदाब किंवा मधुमेह एवढेच नाही तर मनोशारीरिक (सायकोसोमॅटीक) आजारांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज असलेल्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ही खास माहिती.

ठळक मुद्देमनोशारीरिक विकार असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ तणावामुळे आजार असल्याच्या भासात घेतले जात उपचार 

पुणे : प्रसंग एक :  प्रसाद (नाव बदललेले)वय २७, मागील दोन तास डॉक्टरांना मेंदूत बिघाड झाल्याचे पटवत होता. डॉक्टर मात्र एमआरआयचे तपासणीत तसे काहीही निष्पन्न न झाल्याने त्याला गोळ्या देण्यात तयार नव्हते. अखेर प्रसादने दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. 

प्रसंग दोन : वीणाताई (नाव बदललेले) वय ५५ ह्रदयविकाराचा झटका आल्याचा दावा करत एका आठवड्यात तिसऱ्यांदा डॉक्टरांकडे आल्या होत्या. त्यांनाही डॉक्टरांनी तपासणीअंती काहीही झाले नसल्याचे सांगितले. मात्र तरीही त्या मानायला तयार नव्हत्या. 

वरील दोनही केसेसमध्ये शारीरिक आजार नसताना केवळ तणावामुळे शारीरिक आजार आहेतच असा गैरसमज व्यक्ती करून घेते. मनोशारीरिक या नावाने हा  आजार ओळखला जातो. जगभरात तब्बल ८० टक्के लोक या विकाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे तणावाचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषतः मनोशारीरिक विकार असलेल्या रुग्णाला शारीरिक व्याधी नसताना आजारी असल्याची भावना होते, अगदी काहीवेळा वेदनाही होतात. तपासणीअंती काहीही झालं नाहिये असे डॉक्टरांनी पटवले तरी रुग्ण ऐकायला तयार नसतात. 

ही आहेत लक्षणे ?

तणाव हे एकमेव कारण नसले तरी सर्वांचे महत्वाचे कर आहे. कमी वयात वाढत्या अपेक्षांची परिणती तणावात होते आणि त्यातून आजार रुग्णाला जडल्याची भावना निर्माण होते. त्यातही पोटात गाठ आहे, छातीत सतत वेदना होत आहेत, सतत डोके दुखते,हात पाय थरथरणे अशी लक्षणे रुग्णाला जाणवायला लागतात. काही अपवादात्मकवेळा ती खरी असतातही पण अनेकदा त्या भासातून पुढील तपासण्या केल्या तर काहीही निष्पन्न होत नाही. याचा अर्थ रुग्णाला शारीरिक नव्हे तर मानसिक आजार असतो. याच प्रकारचे रुग्ण रोज अपचन होते, अंग दुखते म्हणून गोळीची सवय करतात आणि एका पातळीला त्रास होवो अगर न होवो त्यांना गोळ्या घेतल्याशिवाय चैन पडत नाही. 

प्रतिक्रिया 

हल्ली प्रमाण वाढत आहे मनोशारीरिक आजारांचे. त्यासाठी तणाव हे मुख्य कारण आहे. सर्व वयोगटात असे रुग्ण असून त्यांना आपल्याला काहीही आजार नाही हे स्वीकारणे कठीण जाते. मात्र समुपदेशन आणि तणाव कमी झाल्यावर ते अखेर यातून बाहेर पडतात.  

- डॉ दीपा निलेगावकर, समुपदेशक 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य