शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोरोनाच नाही इतरही आजारांना निमंत्रण देऊ शकतो उन्हाळा; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 14:44 IST

गरमीच्या वातावरणात व्हायरल इन्फेंक्शनशी संबंधीत आजार पसरायला सुरूवात होते.  

(image credit- buzz feed news)

उन्हाळा सुरू झाल्यामुळे दिवसेंदिवस वातावरणात गरमीचं प्रमाण वाढत चाललं आहे. वाढत्या तापमानात त्वचेसह शरीराची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. लॉकडाऊनमुळे अनेकजण घरी बसले आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की बाहेर गेल्यानंतरच फक्त उन्हाचा त्रास होतो. पण असं नाही घरच्याघरी सुद्धा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे तुम्ही आजरांना बळी पडू शकता. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणं गरजेंचं आहे. अन्यथा आजारांचा सामना करावा लागू शकतो.

गरमीच्या वातावरणात व्हायरल इन्फेंक्शनशी संबंधीत आजार पसरायला सुरूवात होते.  उन्हाळ्यात अनेकदा टायफाईडची  साथ पसरते. साधारण ताप समजून या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ऊलट्या, जुलाब, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणं हा त्रास होऊ शकतो.  

डायरिया म्हणजेच पोटावर सूज येणे, पोट दुखणे, सतत टॉयलेटला जावं लागणे ही या आजाराची लक्षणे आहेत. या आजाराचे परीणाम अनेकदा गंभीर बघायला मिळतात. त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक चांगलं ठरेल.

 गरमीमुळे डोकेदुखी आणि मायग्रेन समस्या अधिक भेडसावू शकते. गरमीमुळे रक्तनलिका आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदुला होणारा रक्त पुरवठा कमी होतो. यात डोकेदुखी  समोरच्या बाजूने सुरू होऊन मागच्या बाजूपर्यंत जाते. जास्त वेळ उन्हात घालवल्याने ही समस्या अधिक जाणवते.

उन्हाळ्यात कांजण्यांचं संक्रमण वेगाने पसरतं.  लहान मुलांना हा आजार जास्त  होताना दिसून येतो. या आजारात संपूर्ण शरीरावर लाल डाग येतात तसंच तीव्र ताप येतो. हा आजार पसरू नये या साठी लसीकरण करणं आवश्यक असतं.  (हे पण वाचा-CoronaVirus News : शरीरातील रक्त गोठण्याचं कारण ठरत आहे कोरोना, 'या' औषधांनी होऊ शकतो बचाव)

उपाय

जास्तीत जास्त पाणी प्या, त्यामुळे शरीर डायड्रेट राहील.  रोज जवळपास ८ ते १० ग्लास पाणी पिणे गरजेचं आहे. शक्यतो कोमट किंवा गरम पाणी प्या. आहारात अंडी, दूध, हिरव्या भाज्यांचा समावेश करा. 

जर तुम्हाला घामोळ्या झाल्या असतील तर तुळशीची पानं वाटून त्या भागाला लावल्यास आराम मिळेल. याशिवाय गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून त्या पाण्याने चेहरा धुतल्यास फ्रेश वाटेल. 

आहारात द्रव पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करा. म्हणजेच ताक, भाज्यांचे सूप, टॉमोटो सूप असे पदार्थ आहारात घ्या. रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. शक्य असल्यास रात्री  हळदीच्या दूधाचे सेवन करून झोपा.

तेलकट, तिखट पदार्थाचा समावेश करू नका.  शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी रात्रभर धन्याचे पाणी भिजवून सकाळी गाळून या पाण्याचे सेवन करा. ( हे पण वाचा-छातीत दुखणं ठरू शकतं जीवघेणं, एंजायनामुळे येणारा हार्ट अटॅक टाळण्याासाठी वापरा 'हे' उपाय)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSummer Specialसमर स्पेशल