शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

वाढत्या तापमानात किती काळ तुमच्या हृदयाची धडधड टिकेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 20:16 IST

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानानं अक्षरश: कहर केला. महाराष्ट्रातही अनेक शहरांत सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलं.

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानानं अक्षरश: कहर केला. महाराष्ट्रातही अनेक शहरांत सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलं. दिल्लीत ४८ अंश, तर राजस्थानात ढोलपूरसारख्या ठिकाणी ५१ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमानानं नागरिक अक्षरश: पोळून निघाले.अर्थातच हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम. त्यामुळे पृथ्वीवरचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललंय. एकाच परिस्थितीत दीर्घ काळ राहिल्यानंतर माणसाच्या किंवा कुठल्याही प्राण्याची ती गोष्ट सहन करण्याची क्षमता वाढत जाते, हे खरं असलं तरी, त्यालाही काही नैसर्गिक मर्यादा आहेच. मग तापमान सहन करण्याची माणसाच्या शरिराची क्षमता नेमकी आहे तरी किती? शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधनातून काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.तापमानाच्या संदर्भात दोन गोष्टी महत्त्वाच्या. एक म्हणजे आपल्या शरिराचं तापमान आणि दुसरं म्हणजे बाह्य वातावरणाचं तापमान.

परिस्थितीनुसार आणि क्षमतेनुसार प्रत्येकाची सहनक्षमता वेगवेगळी असली तरी शरीराचं तापमान ३६ ते ३७.५ अंश सेल्सिअस या मर्यादेत असताना मानवी शरीर उत्तम काम करतं. शरीराचं तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेलं तर मात्र चिंताजनक परिस्थिती ओढवते.दुसरी गोष्ट बाह्य तापमानाची. बाह्य तापमान वाढत गेलं की अर्थातच आपल्या शरिराचं तापमानही वाढत जातं. बाह्य तापमान जर ५४ अंश सेल्सिअस किंवा १३० फॅरनहिटच्या पलीकडे गेलं आणि अशा वातावरणात जास्त काळ आपण वावरलो तर मृत्यूची शक्यता वाढते. यात पुन्हा दोन प्रकार. अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधी. अल्प कालावधी काही सेकंदांपासून ते काही मिनिटांपासून तर दीर्घ कालावधी काही तासांपासून एक-दोन दिवसांपर्यंतचा असू शकतो.

अगदी अत्यल्प काळ सर्वाधिक उष्णता सहन करण्याची क्षमता इराणमध्ये नोंदवली गेली आहे आणि हे तापमान होतं जवळपास ७३ अंश सेल्सिअस आहे. थंडीपेक्षा उष्णता सहन करण्याची मानसाची क्षमता थोडी जास्त आहे. त्यामुळेच थंडीमुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या जास्त ऐकायला येतात. अर्थात उष्माघातामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

शरिरांतर्गत आणि बाह्य उष्णता वाढत गेली की त्याचा परिणाम श्वासोच्छवासावर होतो. वातावरणात ओझोन वायूचं प्रमाण वाढलं की उष्णता वाढते. हा ओझोन आपल्या फुफ्फुसांच्या पेशीही कमजोर करतो. त्यामुळे श्वसनाचा त्रास सुरू होतो. वाढत्या उष्म्यामुळे आलेला घाम आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. मात्र अतिरिक्त घामामुळे आपल्या रक्ताची घनता वाढते. घट्ट झालेलं हे रक्त शरीरभर पोहोचवण्यास हृदयाला जास्त कष्ट पडतात आणि हृदय जास्त वेगानं धडधडायला लागतं. प्रमाणाबाहेर पोहोचलेली ही धडधड झेपेनाशी झाली, की मग आपलं हृदय कायमचंच थांबतं.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सTemperatureतापमान