शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वाढत्या तापमानात किती काळ तुमच्या हृदयाची धडधड टिकेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 20:16 IST

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानानं अक्षरश: कहर केला. महाराष्ट्रातही अनेक शहरांत सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलं.

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानानं अक्षरश: कहर केला. महाराष्ट्रातही अनेक शहरांत सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलं. दिल्लीत ४८ अंश, तर राजस्थानात ढोलपूरसारख्या ठिकाणी ५१ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमानानं नागरिक अक्षरश: पोळून निघाले.अर्थातच हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम. त्यामुळे पृथ्वीवरचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललंय. एकाच परिस्थितीत दीर्घ काळ राहिल्यानंतर माणसाच्या किंवा कुठल्याही प्राण्याची ती गोष्ट सहन करण्याची क्षमता वाढत जाते, हे खरं असलं तरी, त्यालाही काही नैसर्गिक मर्यादा आहेच. मग तापमान सहन करण्याची माणसाच्या शरिराची क्षमता नेमकी आहे तरी किती? शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधनातून काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.तापमानाच्या संदर्भात दोन गोष्टी महत्त्वाच्या. एक म्हणजे आपल्या शरिराचं तापमान आणि दुसरं म्हणजे बाह्य वातावरणाचं तापमान.

परिस्थितीनुसार आणि क्षमतेनुसार प्रत्येकाची सहनक्षमता वेगवेगळी असली तरी शरीराचं तापमान ३६ ते ३७.५ अंश सेल्सिअस या मर्यादेत असताना मानवी शरीर उत्तम काम करतं. शरीराचं तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेलं तर मात्र चिंताजनक परिस्थिती ओढवते.दुसरी गोष्ट बाह्य तापमानाची. बाह्य तापमान वाढत गेलं की अर्थातच आपल्या शरिराचं तापमानही वाढत जातं. बाह्य तापमान जर ५४ अंश सेल्सिअस किंवा १३० फॅरनहिटच्या पलीकडे गेलं आणि अशा वातावरणात जास्त काळ आपण वावरलो तर मृत्यूची शक्यता वाढते. यात पुन्हा दोन प्रकार. अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधी. अल्प कालावधी काही सेकंदांपासून ते काही मिनिटांपासून तर दीर्घ कालावधी काही तासांपासून एक-दोन दिवसांपर्यंतचा असू शकतो.

अगदी अत्यल्प काळ सर्वाधिक उष्णता सहन करण्याची क्षमता इराणमध्ये नोंदवली गेली आहे आणि हे तापमान होतं जवळपास ७३ अंश सेल्सिअस आहे. थंडीपेक्षा उष्णता सहन करण्याची मानसाची क्षमता थोडी जास्त आहे. त्यामुळेच थंडीमुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या जास्त ऐकायला येतात. अर्थात उष्माघातामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

शरिरांतर्गत आणि बाह्य उष्णता वाढत गेली की त्याचा परिणाम श्वासोच्छवासावर होतो. वातावरणात ओझोन वायूचं प्रमाण वाढलं की उष्णता वाढते. हा ओझोन आपल्या फुफ्फुसांच्या पेशीही कमजोर करतो. त्यामुळे श्वसनाचा त्रास सुरू होतो. वाढत्या उष्म्यामुळे आलेला घाम आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. मात्र अतिरिक्त घामामुळे आपल्या रक्ताची घनता वाढते. घट्ट झालेलं हे रक्त शरीरभर पोहोचवण्यास हृदयाला जास्त कष्ट पडतात आणि हृदय जास्त वेगानं धडधडायला लागतं. प्रमाणाबाहेर पोहोचलेली ही धडधड झेपेनाशी झाली, की मग आपलं हृदय कायमचंच थांबतं.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सTemperatureतापमान