शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानात किती काळ तुमच्या हृदयाची धडधड टिकेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 20:16 IST

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानानं अक्षरश: कहर केला. महाराष्ट्रातही अनेक शहरांत सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलं.

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानानं अक्षरश: कहर केला. महाराष्ट्रातही अनेक शहरांत सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलं. दिल्लीत ४८ अंश, तर राजस्थानात ढोलपूरसारख्या ठिकाणी ५१ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमानानं नागरिक अक्षरश: पोळून निघाले.अर्थातच हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम. त्यामुळे पृथ्वीवरचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललंय. एकाच परिस्थितीत दीर्घ काळ राहिल्यानंतर माणसाच्या किंवा कुठल्याही प्राण्याची ती गोष्ट सहन करण्याची क्षमता वाढत जाते, हे खरं असलं तरी, त्यालाही काही नैसर्गिक मर्यादा आहेच. मग तापमान सहन करण्याची माणसाच्या शरिराची क्षमता नेमकी आहे तरी किती? शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधनातून काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.तापमानाच्या संदर्भात दोन गोष्टी महत्त्वाच्या. एक म्हणजे आपल्या शरिराचं तापमान आणि दुसरं म्हणजे बाह्य वातावरणाचं तापमान.

परिस्थितीनुसार आणि क्षमतेनुसार प्रत्येकाची सहनक्षमता वेगवेगळी असली तरी शरीराचं तापमान ३६ ते ३७.५ अंश सेल्सिअस या मर्यादेत असताना मानवी शरीर उत्तम काम करतं. शरीराचं तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेलं तर मात्र चिंताजनक परिस्थिती ओढवते.दुसरी गोष्ट बाह्य तापमानाची. बाह्य तापमान वाढत गेलं की अर्थातच आपल्या शरिराचं तापमानही वाढत जातं. बाह्य तापमान जर ५४ अंश सेल्सिअस किंवा १३० फॅरनहिटच्या पलीकडे गेलं आणि अशा वातावरणात जास्त काळ आपण वावरलो तर मृत्यूची शक्यता वाढते. यात पुन्हा दोन प्रकार. अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधी. अल्प कालावधी काही सेकंदांपासून ते काही मिनिटांपासून तर दीर्घ कालावधी काही तासांपासून एक-दोन दिवसांपर्यंतचा असू शकतो.

अगदी अत्यल्प काळ सर्वाधिक उष्णता सहन करण्याची क्षमता इराणमध्ये नोंदवली गेली आहे आणि हे तापमान होतं जवळपास ७३ अंश सेल्सिअस आहे. थंडीपेक्षा उष्णता सहन करण्याची मानसाची क्षमता थोडी जास्त आहे. त्यामुळेच थंडीमुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या जास्त ऐकायला येतात. अर्थात उष्माघातामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

शरिरांतर्गत आणि बाह्य उष्णता वाढत गेली की त्याचा परिणाम श्वासोच्छवासावर होतो. वातावरणात ओझोन वायूचं प्रमाण वाढलं की उष्णता वाढते. हा ओझोन आपल्या फुफ्फुसांच्या पेशीही कमजोर करतो. त्यामुळे श्वसनाचा त्रास सुरू होतो. वाढत्या उष्म्यामुळे आलेला घाम आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. मात्र अतिरिक्त घामामुळे आपल्या रक्ताची घनता वाढते. घट्ट झालेलं हे रक्त शरीरभर पोहोचवण्यास हृदयाला जास्त कष्ट पडतात आणि हृदय जास्त वेगानं धडधडायला लागतं. प्रमाणाबाहेर पोहोचलेली ही धडधड झेपेनाशी झाली, की मग आपलं हृदय कायमचंच थांबतं.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सTemperatureतापमान