शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

जेवण करण्याची योग्य पद्धत माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 10:41 IST

अनेकजणांना ताट समोर आलं की, पटापट ते संपवण्याची घाई लागलेली असते. अशात प्रत्येक घास चाऊन न खाता ते अर्धवट चावून गिळले जातात.

(Image Credit : Daily Express)

अनेकजणांना ताट समोर आलं की, पटापट ते संपवण्याची घाई लागलेली असते. अशात प्रत्येक घास चाऊन न खाता ते अर्धवट चावून गिळले जातात. नंतर पोट दुखणे, पचन न होणे अशा समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. पण जेवण ही सर्वात महत्त्वाची क्रिया असून ती योग्यप्रकारेच केली गेली पाहिजे.

तुम्ही जेवण हळूहळू करता की पटापट? जर तुम्ही जेवण पटापट करत असाल तर वेळीच सावध होण्याती गरज आहे. कारण एका अभ्यासानुसार, चावून चावून न खाता घाईने जेवणाऱ्यांचं वजन हळू जेवणाऱ्यांच्या तुलनेत वेगाने वाढतं. त्यामुळे जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर वेळीच ही सवय बदला. 

अभ्यासकांनुसार, एकदाच पोटभर खाण्याऐवजी थोडं थोडं आणि दिवसातून तीन ते चार वेळा काही खायला हवं. या अभ्यासात ३० ते ६९ वयोगटातील ११२२ पुरुष आणि २१६५ महिलांच्या जेवणाच्या सवयी व त्यांच्या शरीरावर एक अभ्यास करण्यात आला. यातील अर्ध्या पुरुषांना आणि अर्ध्या महिलांना पटापट पोटभर जेवण करण्यास सांगितले. नंतर असे आढळले की, यांचं वजन इतरांच्या तुलनेत वेगाने वाढलं होतं. चला जाणून घेऊ चावून चावून खाण्याचे फायदे...

वजन कमी करणे - जेवण बारीक चावून खाल्ल्याने पोटात रसायनांची निर्मिती होते, ज्यामुळे जेवण चांगल्याप्रकारे पचन होतं. याने लवकर भूकही लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहतं. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्याआधी ही एक चांगली सवय लावली तर तुम्हाला वजन वाढण्याची समस्या होणार नाही. 

सकारात्मक प्रभाव - जेवण चावून चावून खाल्ल्यास अनेक फायदे होतात. याने पदार्थांमधील प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स इतर पोषक तत्वांचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. याने तुम्हाला आवश्यक तत्त्वे मिळतात आणि शरीर निरोगी राहतं. 

पचनक्रिया चांगली राहते - जेवण चांगलं बारीक चावून खाताना तोंडात लाळ तयार होते, याने पदार्थ मुलायम होतात. तसेच बारीक चावून खाल्ल्याने कार्बोहायड्रेट आणि फॅट्स वेगळं करते. याने पचनक्रिया चांगली होते. 

कॅविटीपासूनच बचाव - जेवण चांगल्याप्रकारे बारीक चावून खाल्ल्याने दातांमध्ये पदार्थांचे कण अडकत नाहीत. याने दातांना किड लागत नाही आणि तोंडाची दुर्गंधीही येत नाही. 

बॅक्टेरिया नष्ट होतात - जेवण चांगल्याप्रकारे चावून खाल्ल्यास तोंडातील वाईट बॅक्टेरिया नष्ट होतात. हळूहळू खाल्ल्याने तोडांत तयार होणारी लाळ बॅक्टेरिया नष्ट करते. याने शरीराला बॅक्टेरिअल संक्रमण होण्यापासून बचाव होतो.

कसे कराल जेवण?

पदार्थांचे छोटे छोटे तुकडे करुन खावे. पदार्थ तोपर्यंत चावत रहावे जोपर्यंत ते तोंडात व्यवस्थित मिसळत नाहीत. पदार्थ लगेच गिळायचे नाहीत. पदार्थ खाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. याने पचनक्रिया चांगली होत नाही. त्यामुळे पदार्थ आधी चावून बारीक करावे मग गिळावे. पदार्थ खाताना पाणी पिऊ नये.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य