शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
3
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
4
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
5
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
6
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
7
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
8
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
9
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
10
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
11
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
12
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
13
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
14
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
15
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
16
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
17
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
18
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
19
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
20
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या

जेवण करण्याची योग्य पद्धत माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 10:41 IST

अनेकजणांना ताट समोर आलं की, पटापट ते संपवण्याची घाई लागलेली असते. अशात प्रत्येक घास चाऊन न खाता ते अर्धवट चावून गिळले जातात.

(Image Credit : Daily Express)

अनेकजणांना ताट समोर आलं की, पटापट ते संपवण्याची घाई लागलेली असते. अशात प्रत्येक घास चाऊन न खाता ते अर्धवट चावून गिळले जातात. नंतर पोट दुखणे, पचन न होणे अशा समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. पण जेवण ही सर्वात महत्त्वाची क्रिया असून ती योग्यप्रकारेच केली गेली पाहिजे.

तुम्ही जेवण हळूहळू करता की पटापट? जर तुम्ही जेवण पटापट करत असाल तर वेळीच सावध होण्याती गरज आहे. कारण एका अभ्यासानुसार, चावून चावून न खाता घाईने जेवणाऱ्यांचं वजन हळू जेवणाऱ्यांच्या तुलनेत वेगाने वाढतं. त्यामुळे जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर वेळीच ही सवय बदला. 

अभ्यासकांनुसार, एकदाच पोटभर खाण्याऐवजी थोडं थोडं आणि दिवसातून तीन ते चार वेळा काही खायला हवं. या अभ्यासात ३० ते ६९ वयोगटातील ११२२ पुरुष आणि २१६५ महिलांच्या जेवणाच्या सवयी व त्यांच्या शरीरावर एक अभ्यास करण्यात आला. यातील अर्ध्या पुरुषांना आणि अर्ध्या महिलांना पटापट पोटभर जेवण करण्यास सांगितले. नंतर असे आढळले की, यांचं वजन इतरांच्या तुलनेत वेगाने वाढलं होतं. चला जाणून घेऊ चावून चावून खाण्याचे फायदे...

वजन कमी करणे - जेवण बारीक चावून खाल्ल्याने पोटात रसायनांची निर्मिती होते, ज्यामुळे जेवण चांगल्याप्रकारे पचन होतं. याने लवकर भूकही लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहतं. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्याआधी ही एक चांगली सवय लावली तर तुम्हाला वजन वाढण्याची समस्या होणार नाही. 

सकारात्मक प्रभाव - जेवण चावून चावून खाल्ल्यास अनेक फायदे होतात. याने पदार्थांमधील प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स इतर पोषक तत्वांचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. याने तुम्हाला आवश्यक तत्त्वे मिळतात आणि शरीर निरोगी राहतं. 

पचनक्रिया चांगली राहते - जेवण चांगलं बारीक चावून खाताना तोंडात लाळ तयार होते, याने पदार्थ मुलायम होतात. तसेच बारीक चावून खाल्ल्याने कार्बोहायड्रेट आणि फॅट्स वेगळं करते. याने पचनक्रिया चांगली होते. 

कॅविटीपासूनच बचाव - जेवण चांगल्याप्रकारे बारीक चावून खाल्ल्याने दातांमध्ये पदार्थांचे कण अडकत नाहीत. याने दातांना किड लागत नाही आणि तोंडाची दुर्गंधीही येत नाही. 

बॅक्टेरिया नष्ट होतात - जेवण चांगल्याप्रकारे चावून खाल्ल्यास तोंडातील वाईट बॅक्टेरिया नष्ट होतात. हळूहळू खाल्ल्याने तोडांत तयार होणारी लाळ बॅक्टेरिया नष्ट करते. याने शरीराला बॅक्टेरिअल संक्रमण होण्यापासून बचाव होतो.

कसे कराल जेवण?

पदार्थांचे छोटे छोटे तुकडे करुन खावे. पदार्थ तोपर्यंत चावत रहावे जोपर्यंत ते तोंडात व्यवस्थित मिसळत नाहीत. पदार्थ लगेच गिळायचे नाहीत. पदार्थ खाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. याने पचनक्रिया चांगली होत नाही. त्यामुळे पदार्थ आधी चावून बारीक करावे मग गिळावे. पदार्थ खाताना पाणी पिऊ नये.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य