शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

जेवण करण्याची योग्य पद्धत माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 10:41 IST

अनेकजणांना ताट समोर आलं की, पटापट ते संपवण्याची घाई लागलेली असते. अशात प्रत्येक घास चाऊन न खाता ते अर्धवट चावून गिळले जातात.

(Image Credit : Daily Express)

अनेकजणांना ताट समोर आलं की, पटापट ते संपवण्याची घाई लागलेली असते. अशात प्रत्येक घास चाऊन न खाता ते अर्धवट चावून गिळले जातात. नंतर पोट दुखणे, पचन न होणे अशा समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. पण जेवण ही सर्वात महत्त्वाची क्रिया असून ती योग्यप्रकारेच केली गेली पाहिजे.

तुम्ही जेवण हळूहळू करता की पटापट? जर तुम्ही जेवण पटापट करत असाल तर वेळीच सावध होण्याती गरज आहे. कारण एका अभ्यासानुसार, चावून चावून न खाता घाईने जेवणाऱ्यांचं वजन हळू जेवणाऱ्यांच्या तुलनेत वेगाने वाढतं. त्यामुळे जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर वेळीच ही सवय बदला. 

अभ्यासकांनुसार, एकदाच पोटभर खाण्याऐवजी थोडं थोडं आणि दिवसातून तीन ते चार वेळा काही खायला हवं. या अभ्यासात ३० ते ६९ वयोगटातील ११२२ पुरुष आणि २१६५ महिलांच्या जेवणाच्या सवयी व त्यांच्या शरीरावर एक अभ्यास करण्यात आला. यातील अर्ध्या पुरुषांना आणि अर्ध्या महिलांना पटापट पोटभर जेवण करण्यास सांगितले. नंतर असे आढळले की, यांचं वजन इतरांच्या तुलनेत वेगाने वाढलं होतं. चला जाणून घेऊ चावून चावून खाण्याचे फायदे...

वजन कमी करणे - जेवण बारीक चावून खाल्ल्याने पोटात रसायनांची निर्मिती होते, ज्यामुळे जेवण चांगल्याप्रकारे पचन होतं. याने लवकर भूकही लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहतं. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्याआधी ही एक चांगली सवय लावली तर तुम्हाला वजन वाढण्याची समस्या होणार नाही. 

सकारात्मक प्रभाव - जेवण चावून चावून खाल्ल्यास अनेक फायदे होतात. याने पदार्थांमधील प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स इतर पोषक तत्वांचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. याने तुम्हाला आवश्यक तत्त्वे मिळतात आणि शरीर निरोगी राहतं. 

पचनक्रिया चांगली राहते - जेवण चांगलं बारीक चावून खाताना तोंडात लाळ तयार होते, याने पदार्थ मुलायम होतात. तसेच बारीक चावून खाल्ल्याने कार्बोहायड्रेट आणि फॅट्स वेगळं करते. याने पचनक्रिया चांगली होते. 

कॅविटीपासूनच बचाव - जेवण चांगल्याप्रकारे बारीक चावून खाल्ल्याने दातांमध्ये पदार्थांचे कण अडकत नाहीत. याने दातांना किड लागत नाही आणि तोंडाची दुर्गंधीही येत नाही. 

बॅक्टेरिया नष्ट होतात - जेवण चांगल्याप्रकारे चावून खाल्ल्यास तोंडातील वाईट बॅक्टेरिया नष्ट होतात. हळूहळू खाल्ल्याने तोडांत तयार होणारी लाळ बॅक्टेरिया नष्ट करते. याने शरीराला बॅक्टेरिअल संक्रमण होण्यापासून बचाव होतो.

कसे कराल जेवण?

पदार्थांचे छोटे छोटे तुकडे करुन खावे. पदार्थ तोपर्यंत चावत रहावे जोपर्यंत ते तोंडात व्यवस्थित मिसळत नाहीत. पदार्थ लगेच गिळायचे नाहीत. पदार्थ खाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. याने पचनक्रिया चांगली होत नाही. त्यामुळे पदार्थ आधी चावून बारीक करावे मग गिळावे. पदार्थ खाताना पाणी पिऊ नये.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य