शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

फळं आरोग्यासाठी उत्तम म्हणून कधीही खाऊ नका.. पडेल चांगलेच महागात, जाणून घ्या योग्य वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:18 IST

फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, ज्याचे सेवन दिवसभर करता येते. परंतु, कोणताही आजार किंवा उपचार सुरू असताना योग्य वेळेनुसार फळांचे सेवन करावे.

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फळांचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही फळे खायला आवडतात. फळांमध्ये विविध प्रकारचे पोषक आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात जे अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. आजारी असताना फक्त फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, ऐरव्हीदेखील फळे किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी खावीत, याची अचूक माहिती असणेही महत्त्वाचे आहे.

अनेकजण संध्याकाळी फळे न खाण्याचा सल्ला देतात, तर कोणी जेवणानंतर फळे खाऊ नयेत, असे म्हणतात. त्याचबरोबर अशी काही फळे आहेत जी, रिकाम्या पोटी खाल्ल्यास नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया फळे खाण्याची योग्य वेळ कोणती आणि कोणती फळे रिकाम्या पोटी खाणे हानिकारक ठरू शकते.

शरीर सशक्त आणि निरोगी राहण्यासाठी फळांचे सेवन आवश्यक आहे. हेल्थलाईनच्या माहितीनुसार दिवसा कधीही फळे खाऊ शकता. फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, ज्याचे सेवन दिवसभर करता येते. परंतु, कोणताही आजार किंवा उपचार सुरू असताना योग्य वेळेनुसार फळांचे सेवन करावे.

वजन कमी -फळांमध्ये भरपूर फायबर असते, फळे खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेले राहते. त्यामुळे वजन कमी राखण्यासाठी दुपारी 11 ते 12 या वेळेत फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. 12 वाजता फळे खाल्ल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल, त्यामुळे दुपारच्या जेवणात कमी कॅलरीज खाल्ल्या जाऊ शकतात. याशिवाय फळे गोड असतात, त्यामुळे त्यात कॅलरीज जास्त असतात. जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढू शकतात, त्यामुळे जेवणानंतर फळे न खाण्याचा सल्ला दिला जातो.

गर्भधारणेमध्ये फळे खाणे -गर्भधारणेदरम्यान फळे खाणे खूप महत्त्वाचे आहे. गरोदरपणात फळे कधीही खाऊ शकता, पण जेवण्यापूर्वी फळे खाल्ल्याने गॅसची समस्या होऊ शकते. त्यामुळे गरोदरपणात न्याहारीनंतर फळांचे सेवन करणे चांगले. गरोदरपणात मधुमेहाचा धोकाही जास्त असतो, त्यामुळे कॅलरीज नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.

ही फळे रिकाम्या पोटी खाऊ नका -

  • केळी
  • नाशपाती
  • संत्रा
  • मौसंबी
  • आंबा
  • द्राक्षे
  • लिची
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स