शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रात्री की दिवसा? काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या योग्य पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 13:04 IST

Cucumber benefits :काकडी खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहीत असतात. पण काकडी खाण्याची योग्य वेळ आणि पद्धतही माहीत असली पाहिजे.

Cucumber benefits :  काकडी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण याच्या डिटेल्स अनेकांना माहीत नसतात. कमी कॅलरी आणि पाणी भरपूर असल्याने काकडी वजन कमी करण्यासोबतच डिहायड्रेशनमध्ये फार प्रभावी आहे. बरेच लोक रोज जेवणासोबत कच्ची काकडी खातात. याशिवाय काकडीचा ज्यूस करून प्याल तर यूरिनरी इंफेक्शनपासून बचाव होऊ शकतो. पण हे सगळे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा काकडीचं योग्यवेळी सेवन कराल. चला जाणून घेऊन त्याबाबत...

काकडी खाण्याची योग्य वेळ

एक्सपर्ट सांगतात की, काकडी दिवसाच खाल्ली पाहिजे. याने मेटाबॉल्जिम मजबूत होतं. ज्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून बचाव करू शकता. यात 95 टक्के पाणी असते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होत नाही. तसेच याने इम्यूनिटी आणि हाडेही मजबूत होतात.

तुम्ही जर रात्री काकडी खाल्ली तर पोट जड होऊ शकतं. काकडी पचवणं अवघड होऊ शकतं. यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते. ज्या लोकांचं पचन कमजोर आहे त्यांनी रात्री काकडी अजिबात खाऊ नये.

जर तुम्ही सकाळी काकडी खात असाल तर याचे तुम्हाला खूप फायदे मिळतात. याने तुमचं वजन कंट्रोल होतं. जेवणाच्या अर्धातासआधी तुम्ही काकडी खावी. कारण याला पचायला वेळ लागतो.

काकडी खाण्याची योग्य पद्धत

काकडीच्या सालीमध्येही सिलिकासारखं आवश्यक पोषक तत्व असतं. पण अनेकांना काकडी खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर तुम्ही काकडी खाल्ल्यानंतर पाणी पित असाल तर ही चूक अजिबात करू नका. याने तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. 

काकडी केस आणि त्वचेसाठी फार फायदेशीर असते. या फळातील पोषक तत्व शरीराला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही काकडी खाल्ल्यावर पाणी पिणं टाळलं तर. कारण काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायलात तर पचनक्रियेसंबंधी समस्या होऊ शकते. काकडी उन्हाळ्यात फार फायदेशीर मानली जाते. हेल्दी डाएटमध्ये याचं फार महत्व आहे. कारण  यात व्हिटॅमिन सी, फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे शरीरातील फ्री रेडिकल्स दूर करतात.

हाडं होतात मजबूत

काकडी खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे काकडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि इम्यूनिटीही वाढते. तेच काकडीची सालही फार फायदेशीर असते. पण हेही लक्षात ठेवा की, काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. कारण त्याने त्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत.

काकडी खाल्ल्यावर पाणी पिल्याचे नुकसान

- काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने खाद्य पदार्थांना पचवणारं पोटातील अॅसिड योग्य प्रकारे काम करत नाही.

- जर काकडी खाऊन तुम्ही पाणी प्यायलात तुम्हाला लूज मोशन आणि डायरिया होण्याचाही धोका होऊ शकतो.

- काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने शरीराची पीएच लेव्हलही डिस्टर्ब होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य