शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

रात्री की दिवसा? काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या योग्य पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 13:04 IST

Cucumber benefits :काकडी खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहीत असतात. पण काकडी खाण्याची योग्य वेळ आणि पद्धतही माहीत असली पाहिजे.

Cucumber benefits :  काकडी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण याच्या डिटेल्स अनेकांना माहीत नसतात. कमी कॅलरी आणि पाणी भरपूर असल्याने काकडी वजन कमी करण्यासोबतच डिहायड्रेशनमध्ये फार प्रभावी आहे. बरेच लोक रोज जेवणासोबत कच्ची काकडी खातात. याशिवाय काकडीचा ज्यूस करून प्याल तर यूरिनरी इंफेक्शनपासून बचाव होऊ शकतो. पण हे सगळे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा काकडीचं योग्यवेळी सेवन कराल. चला जाणून घेऊन त्याबाबत...

काकडी खाण्याची योग्य वेळ

एक्सपर्ट सांगतात की, काकडी दिवसाच खाल्ली पाहिजे. याने मेटाबॉल्जिम मजबूत होतं. ज्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून बचाव करू शकता. यात 95 टक्के पाणी असते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होत नाही. तसेच याने इम्यूनिटी आणि हाडेही मजबूत होतात.

तुम्ही जर रात्री काकडी खाल्ली तर पोट जड होऊ शकतं. काकडी पचवणं अवघड होऊ शकतं. यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते. ज्या लोकांचं पचन कमजोर आहे त्यांनी रात्री काकडी अजिबात खाऊ नये.

जर तुम्ही सकाळी काकडी खात असाल तर याचे तुम्हाला खूप फायदे मिळतात. याने तुमचं वजन कंट्रोल होतं. जेवणाच्या अर्धातासआधी तुम्ही काकडी खावी. कारण याला पचायला वेळ लागतो.

काकडी खाण्याची योग्य पद्धत

काकडीच्या सालीमध्येही सिलिकासारखं आवश्यक पोषक तत्व असतं. पण अनेकांना काकडी खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर तुम्ही काकडी खाल्ल्यानंतर पाणी पित असाल तर ही चूक अजिबात करू नका. याने तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. 

काकडी केस आणि त्वचेसाठी फार फायदेशीर असते. या फळातील पोषक तत्व शरीराला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही काकडी खाल्ल्यावर पाणी पिणं टाळलं तर. कारण काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायलात तर पचनक्रियेसंबंधी समस्या होऊ शकते. काकडी उन्हाळ्यात फार फायदेशीर मानली जाते. हेल्दी डाएटमध्ये याचं फार महत्व आहे. कारण  यात व्हिटॅमिन सी, फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे शरीरातील फ्री रेडिकल्स दूर करतात.

हाडं होतात मजबूत

काकडी खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे काकडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि इम्यूनिटीही वाढते. तेच काकडीची सालही फार फायदेशीर असते. पण हेही लक्षात ठेवा की, काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. कारण त्याने त्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत.

काकडी खाल्ल्यावर पाणी पिल्याचे नुकसान

- काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने खाद्य पदार्थांना पचवणारं पोटातील अॅसिड योग्य प्रकारे काम करत नाही.

- जर काकडी खाऊन तुम्ही पाणी प्यायलात तुम्हाला लूज मोशन आणि डायरिया होण्याचाही धोका होऊ शकतो.

- काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने शरीराची पीएच लेव्हलही डिस्टर्ब होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य