शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

कोणी सांगितलं, भातामुळे लठ्ठपणा वाढतो?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 16:51 IST

भाताबद्दलचे गैरसमज दूर करा, आहारात भाताला पुन्हा सन्मानाचं स्थान द्या आणि लठ्ठपणाही कंट्रोलमध्ये ठेवा..

ठळक मुद्देभातानं केवळ वजनच ताब्यात राहात नाही, ते तुम्हाला लठ्ठ आणि ओव्हरवेट होण्यापासूनही वाचवतं.भात जगात सर्वत्र खाल्ला जातो, त्यामुळे लठ्ठपणा येत असता, तर ती सारीच माणसं जाड झाली असती.भातात आहेत अनेक पोषक घटक, जे तुम्हाला ठेवतात हेल्दी आणि फिट.

- मयूर पठाडेआपण कायमच ऐकत आलोय, भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं, जाडेपणा येतो. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचंय किंवा चुकूनही आपल्या शरीरावरची चरबी अगदी मिलिमिटरनंही वाढू द्यायची नाही, असे सारेच लोक पहिल्यांदा भाताला अडगळीत टाकतात. आपल्या आहारातून भात अक्षरश: हद्दपारच करून टाकतात.याचं कारण आपण कायमच ऐकत आलोय, वजन वाढू द्यायचं नसेल, तर भाताला दूर ठेवा. बºयाचदा डॉक्टरही तोच सल्ला देतात.पण एक लक्षात घ्या, भाताला आपल्या आयुष्यातूनच हद्दपार केलं तर काय होईल?अनेक उपयुक्त घटकांना आपण मुकू.आणखी दुसरं एक वास्तव.जगात भात हे असं एकच अन्न आहे, जे जवळपास संपूर्ण जगात वापरलं जातं.माणसाला जगवण्याची ताकद भातात आहे. ब्राऊन राईस तर आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे. त्यामुळे साध्या भाताऐवजी हातसडीचा तांदुळ जर आपण वापरला तर तो आपलं आयुष्य आणखी वाढवील.आणि आपण म्हणतो, त्याप्रमाणे भातामुळे माणसं जर जाड होत असतील, तर मग भात खाणारी जगातली सारीच माणसं जाड झाली असती.अगदी आपल्या भारतातही भात हे मुख्य अन्न असलेले अनेक भाग आहेत. त्यांच्या जेवणात रोज सकाळ संध्याकाळ भात असतो. ही लोकं मग सगळी लठ्ठच असायला पाहिजे होती. ती तशी नाहीत, कारण आपली संकल्पना, समजूत चुकीची आहे.अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला, तर त्याचे दुष्परिणाम होतीलच. मग तो भात असू द्या, नाहीतर आणखी काही..

भातामुळे लठ्ठपणा वाढत नाही कमी होतो!..१- वजन वाढीला कारणीभूत ठरणारे, त्याचबरोबर आपल्या शरीराला हानीकारक ठरतील असे कोणतेही घटक भातात नाहीत.२- कोलेस्टोरॉल, सोडियम यासारखे घटकही भातात नाहीत.३- भात हे खरं तर बॅलन्स्ड डाएट आहे.४- शरीरावर कोणतेही नकारात्मक परिणाम होऊ न देता, तुम्हाला पोषक तत्त्व मिळवून देणारा भात खरंतर खूपच उपयुक्त आहे.५- आणखी एक महत्त्वाचं. जगात केवळ भात हा असा एकच अन्नपदार्थ आहे, जो अगदी थोड्या प्रमाणात खाल्ला तरी तुम्हाला जिवंत ठेऊ शकतो. नुसतं जिवंतच नाही, आरोग्यदायीदेखील..भाताचे आणखीही बरेच उपयोग आहेत..त्याबद्दल पाहू या पुढच्या भागात..