शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी पुन्हा गरम करून खाता का? वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 09:50 IST

जास्तीत जास्त घरांमध्ये रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी गरम करून किंवा त्याला फोडणी देऊन नाश्ता म्हणून खाल्ला जातो.

भारतात जास्तीत जास्त लोक जेवताना भात खातात. अनेकांना तर भात असल्याशिवाय जेवणही जात नाही. भात हा आरोग्यासाठी फार फायदेशीर असतो. आजकाल अनेक वजन वाढण्याची समस्या होते. अशात लोकांना वाटतं की, त्यांनी भात खाल्ला तर वजन वाढतं. पण भात आवडणारे लोक भात खाणं काही सोडत नाहीत.

जास्तीत जास्त घरांमध्ये रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी गरम करून किंवा त्याला फोडणी देऊन नाश्ता म्हणून खाल्ला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, एकदा शिजवलेल्या भाताला पुन्हा एकापेक्षा जास्त वेळ गरम करणं धोक्याचं ठरू शकतं. असं केल्यास तुम्हाला उल्टी, पोट बिघडणे यासोबतच हृदयाशी संबंधीत आजारही होऊ शकतात.

एक्सपर्टचा सल्ला

ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कच्च्या तांदुळामध्ये बॅसिलस सेरस नामक बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया तांदूळ शिजवल्यावरही जिंवत राहतात. एक्सपर्टनुसार, तुम्ही एकदा शिजवलेला भात पुन्हा केवळ एकदाच गरम करु शकता. एकापेक्षा जास्तवेळ हा भात गरम केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

होतात 'या' समस्या

पुन्हा पुन्हा गरम केलेला भात खाल्ल्याने तुम्हाला उल्टी, लूज मोशन, पोट दुखणे अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे एक्सपर्ट हे तांदूळ शिजवल्यावर एका तासाच्या आत फ्रिजमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात. कारण त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य