शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

लोखंडी कढईत जेवण न करण्याचा का दिला जातो सल्ला? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 13:46 IST

Health Tips : अनेकांना हे माहीत नाही की, कढईत जेवण न करणं यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. हे कारण आपल्या आरोग्याशी संबंधित आहे.

Health Tips : अनेकदा तुम्ही घरातील वयोवृद्ध लोकांना नेहमीच हे सांगताना ऐकलं असेल की, कढईत कधीच जेवण करू नये. असं मानलं जातं की, अविवाहित लोक जर कढईत जेवत असतील तर, त्यांच्या लग्नावेळी पाऊस येतो, तेच विवाहित लोकांनी आयुष्यभर आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. याच भितीने आजही लोक कढईत जेवण करणं टाळतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, कढईत जेवण न करणं यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. हे कारण आपल्या आरोग्याशी संबंधित आहे.

राखेने धुवत होते भांडी 

काही वर्षांआधीपर्यंत स्टीलची भांडी नव्हती, ना ते धुण्यासाठी डिटर्जेंट किंवा लिक्विडचा वापर केला जात होता. त्यावेळी जास्तीत जास्त लोक लोखंडाच्या कढईचा वापर करत होते. भात किंवा इतर पदार्थ बनवल्यानंतर त्यावर जळाल्याचे किंवा चिकट डाग राहत होते. ते दूर होण्यासाठी कढई लगेच पाण्यात टाकली जात होती. जेणेकरून कढईला गंज लागू नये किंवा ग्रीस त्यावर राहू नये. त्यानंतर कढई राख किंवा मातीने घासली होत होती. पण आज राखेचा वापर होत नाही. अशात लोखंडाच्या कढईला लागलेला चिकटपणा तसाच राहतो आणि तो नंतर आपल्या पोटात जातो. ज्यामुळे आपण आजारी पडतो.

चिकटपणा वाढण्याची भिती

जर पदार्थ तयार केल्यानंतर लगेच कढईतील पदार्थ काढले नाहीत किंवा ती स्वच्छ केली नाही तर भांड चिकट होऊ शकतं. अशात राख किंवा मातीनेही चिकटपणा दूर होत नाही. जे आरोग्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकतं.

पोट बिघडतं

चिकटपणा असलेल्या कढईत जेवण केल्याने किंवा त्यात पुन्हा पदार्थ बनवल्याने पोट खराब होण्याची शक्यता जास्त असते. बरीच स्वच्छ करूनही काही दिवसांपूर्वीचा चिकटपणा कढईला चिकटून असतो. अशात तुम्ही या कढईत जेवण केलं तर हे कण आपल्या पोटात जातात आणि त्यामुळे पोट खराब होतं.

वैज्ञानिक तथ्य

पूर्वी ही बाब प्रचलित झाली की, जे लोक अविवाहित असतात ते जर कढईत जेवले तर त्यांच्या लग्नावेळी पाऊस येईल आणि विवाहित लोकांनी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. वैज्ञानिक तथ्याला मान्यतेचं रूप देण्यात आलं. जेणेकरून लोकांनी कढईत जेवण करू नये. ही मान्यता आजही लोक मानतात आणि कढईत जेवण करणं टाळतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य