शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

लोखंडी कढईत जेवण न करण्याचा का दिला जातो सल्ला? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 13:46 IST

Health Tips : अनेकांना हे माहीत नाही की, कढईत जेवण न करणं यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. हे कारण आपल्या आरोग्याशी संबंधित आहे.

Health Tips : अनेकदा तुम्ही घरातील वयोवृद्ध लोकांना नेहमीच हे सांगताना ऐकलं असेल की, कढईत कधीच जेवण करू नये. असं मानलं जातं की, अविवाहित लोक जर कढईत जेवत असतील तर, त्यांच्या लग्नावेळी पाऊस येतो, तेच विवाहित लोकांनी आयुष्यभर आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. याच भितीने आजही लोक कढईत जेवण करणं टाळतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, कढईत जेवण न करणं यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. हे कारण आपल्या आरोग्याशी संबंधित आहे.

राखेने धुवत होते भांडी 

काही वर्षांआधीपर्यंत स्टीलची भांडी नव्हती, ना ते धुण्यासाठी डिटर्जेंट किंवा लिक्विडचा वापर केला जात होता. त्यावेळी जास्तीत जास्त लोक लोखंडाच्या कढईचा वापर करत होते. भात किंवा इतर पदार्थ बनवल्यानंतर त्यावर जळाल्याचे किंवा चिकट डाग राहत होते. ते दूर होण्यासाठी कढई लगेच पाण्यात टाकली जात होती. जेणेकरून कढईला गंज लागू नये किंवा ग्रीस त्यावर राहू नये. त्यानंतर कढई राख किंवा मातीने घासली होत होती. पण आज राखेचा वापर होत नाही. अशात लोखंडाच्या कढईला लागलेला चिकटपणा तसाच राहतो आणि तो नंतर आपल्या पोटात जातो. ज्यामुळे आपण आजारी पडतो.

चिकटपणा वाढण्याची भिती

जर पदार्थ तयार केल्यानंतर लगेच कढईतील पदार्थ काढले नाहीत किंवा ती स्वच्छ केली नाही तर भांड चिकट होऊ शकतं. अशात राख किंवा मातीनेही चिकटपणा दूर होत नाही. जे आरोग्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकतं.

पोट बिघडतं

चिकटपणा असलेल्या कढईत जेवण केल्याने किंवा त्यात पुन्हा पदार्थ बनवल्याने पोट खराब होण्याची शक्यता जास्त असते. बरीच स्वच्छ करूनही काही दिवसांपूर्वीचा चिकटपणा कढईला चिकटून असतो. अशात तुम्ही या कढईत जेवण केलं तर हे कण आपल्या पोटात जातात आणि त्यामुळे पोट खराब होतं.

वैज्ञानिक तथ्य

पूर्वी ही बाब प्रचलित झाली की, जे लोक अविवाहित असतात ते जर कढईत जेवले तर त्यांच्या लग्नावेळी पाऊस येईल आणि विवाहित लोकांनी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. वैज्ञानिक तथ्याला मान्यतेचं रूप देण्यात आलं. जेणेकरून लोकांनी कढईत जेवण करू नये. ही मान्यता आजही लोक मानतात आणि कढईत जेवण करणं टाळतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य