शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

विमान अपहरण अन् बॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 02:31 IST

‘नीरजा’ हा चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. एअरहोस्टेस्ट नीरजा भानोत हिने केलेल्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट सर्वस्तरातून प्रसंशा मिळवित आहे.

रान माधवानी दिग्दर्शित व सोनम कपूरच्या मुख्य भूमिकेतील ‘नीरजा’ हा चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. एअरहोस्टेस्ट नीरजा भानोत हिने केलेल्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट सर्वस्तरातून प्रसंशा मिळवित आहे. 1986 साली झालेल्या विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित हा चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते. मुंबई विमानतळावरून न्यूयार्क जाणा-या PAN AM 73 विमानाचे पाकिस्तानातील कराचीच्या एम जिन्ना विमानतळावरून अपहरण करण्यात आले होते. 360 प्रवाशांना वाचविताना 23 वर्षीय नीरजा भनोत शहीद झाली. विमान अपहरणाच्या पाश्वभूमिवर अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. यात मल्यामळ भाषेतील अमिताभ बच्चन व मोहनलाल यांच्या प्रमुख भमिके चा ‘कंधार’ व तामीळ व तेलगू भाषेत प्रदर्शित झालेला नागर्जून अभिनित ‘गगनम’ यांचाही उल्लेख करता येईल. विमान अपहरण या विषयावर सपेशल बॉलिवूड चित्रपट देखील तयार झाले आहेत. जमीन (2003)रोहित शेट्टी दिग्दर्शित हा पहिला चित्रपट होता. अजय देवगन, अभिषेक बच्चन व बिपाशा बसू यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट चांगल्या पटकथेसाठी लक्षात राहतो. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा सरकत जाते. दहशतवादी आपल्या नेत्याला सोडण्याच्या मागणीसाठी विमान अपहरण करतात. या चित्रपटाची कथा डिसेंबर 1999 साली झालेल्या ‘कंधार विमान अपहरणा’वर आधारित होती. हायजॅक (2008)शायनी अहुजा, ईशा देओल व दाक्षिणात्य अभिनेत्री अनुषा यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा हॉलिवूडच्या ‘डाय हार्ट’ या चित्रपटासारखी होती. डाय हार्टप्रमाणे अ‍ॅक्शन यात नसले तरी देखील तसा प्रयत्न दिग्दर्शकाने केला होता. सहा दहशतवादी विमानाचे अपहरण करून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रवाशांची हत्या करतात. ‘आयसी 814’ या विमान अपहरणावर या चित्रपट तयार करण्यात आला होता. ये दिल आशिकाना (2002)दिग्दशक कुकू  कोहली यांच्या रोमॉटिक-अ‍ॅक्शन ‘ये दिल आशिकाना’ या चित्रपटात करण नाथ व जिविका शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा दोन ट्रॅकवर पुढे सरकत जाते. कॉलेजचे रोमॉटिक वातावरण तर दुसरीकडे दहशतवादी करावाया. ज्या विमानातून नायिका प्रवास करीत असते त्याचे अपहरण होते. नायिकेची सुटका करण्यासाठी नायकाची धडपड यात दाखविली आहे.