शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

दिलासादायक! लॉकडाऊनचा आरोग्यावर चांगला परिणाम; कमी झाले 'या' आजाराचे रुग्ण, रिसर्च 

By manali.bagul | Updated: October 4, 2020 15:30 IST

Health Tips & Research in Marathi : हेल्दियंस (Healthians )च्या रिपोर्टनुसार कॉलेस्ट्रॉलची वाढ होत असलेल्या लोकांमध्ये २२.३ टक्क्यांनी कमतरता दिसून आली आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रसार  रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग एकाच ठिकाणी थांबल्याप्रमाणे भासत होते. अशा स्थितीत लोकांना घरी थांबण्याशिवाय पर्याय नव्हता परिणामी लोकांच्या जीवनशैलीत बराच बदल घडून आला. एका रिसर्चनुसार लॉकडाऊनच्या काळात लोकांमध्ये हृदयाच्या विकारांचे प्रमाण कमी झाले आहे. हेल्दियंस (Healthians )च्या रिपोर्टनुसार कॉलेस्ट्रॉलची वाढ होत असलेल्या लोकांमध्ये २२.३ टक्क्यांनी कमतरता दिसून आली आहे. 

हा रिसर्च २०२० च्या पहिल्या तीन महिन्यात आणि २०२९ त्या  शेवटच्या तीन महिन्यांत ५० हजारांपेक्षा जास्त लोकांवर  करण्यात आला होता.  या अभ्यासानंतर महिला आणि पुरूषांमधील आकडेवारीचे सखोल विश्लेषण करण्यात आले होते.  महिलांच्या तुलनेत जास्त वयाच्या पुरूषांच्या हृदयाच्या आरोग्यात सुधारणा दिसून आली. हृदयासंबंधी समस्या असलेल्या महिलांमध्ये १७.२ टक्के तर पुरूषांमध्ये २५.५ टक्के कमतरता दिसून आली. या सकारात्मक बदलाचे कारण कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेले लॉकडाऊन मानलं जात आहे. 

योग्यप्रमाणात अन्नपदार्थाचे सेवन

या संशोधनात दिसून आलं की, लॉकडाऊनदरम्यान लोक जंक फूड, फास्ड फूड, तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करत होते.  तसंच खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतही बदल घडून आला त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या हृदयाचे आरोग्य सुधारले. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यामागे जंक फूडचं सेवन कमी करणं हे महत्वाचं कारण समजलं जात आहे. हेल्दीयंसच्यामते कॉलेस्ट्रेरॉलमुळे हार्मोन्स, व्हिटामीन डी, पेशी निरोगी राहतात. पण कॉलेस्ट्रेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे धमन्यांच्या भींतींवर एक थर जमा होतो. त्यामुळे हृदयावर ताण पडतो. अनेकदा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. म्हणून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फॅटफूल, मैद्याच्या, तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करायला हवे. 

वयस्कर लोकांच्या प्रकृतीत सुधारणा

या अभ्यासातून एक महत्वपूर्ण बाब समोर आली ती म्हणजे २०, ३० आणि ४० वर्षातील लोकांच्या तुलनेत ५० आणि यावरील वयोगटातील लोकांमध्ये हृदयासंबंधी समस्याचे  प्रमाण कमी झालेले दिसून आले. याचं सगळ्यात मोठं कारण कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात असणं हे असल्याचे दिसून आले. 

मोठ्या शहरांमध्येही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. 

डोरस्टेप हेल्थ सोल्यूशन प्रोव्हाईडरच्या रिपोर्टनुसार , अमृतसर, कानपुर आणि जालंधर या शहरात हृदयासंबंधी समस्यांमध्ये घट दिसून आली आहे. लहान शहरांमध्येही हृदयाच्या आजारांमध्ये कमतरता दिसून आली आहे. कारण जीवनशैलीत फरक असतो. शहरांच्या तुलनेत गावांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य  चांगले  राहते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यHeart DiseaseहृदयरोगResearchसंशोधन