शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्ती १८ नाही तर 'या' वयात होतात प्रौढ - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 10:37 IST

अनेकदा गमती गमतीमध्ये एक तिशीतला मित्र दुसऱ्या तिशीतल्या मित्राला तू म्हातारा झालास, असं म्हणताना अनेकदा ऐकलं असेल.

(Image Credit : The Independent)

अनेकदा गमती गमतीमध्ये एक तिशीतला मित्र दुसऱ्या तिशीतल्या मित्राला तू म्हातारा झालास, असं म्हणताना अनेकदा ऐकलं असेल. अनेकदा व्यक्ती प्रौढ कधी होतो यावरूनही वेगवेगळी मते ऐकायला मिळतात. पण नुकत्याच एका रिसर्चमधून याचा खुलासा करण्यात आला आहे. या रिसर्चनुसार, व्यक्ती तोपर्यंत अ‍ॅडल्ट म्हणजेच प्रौढ  होत नाहीत, जोपर्यंत ते ३० वय ओलांडत नाहीत. मेंदूच्या अभ्यासकांनुसार, मेंदूचा पूर्ण विकास १८ नाही तर ३० व्या वयात पूर्ण होतो. 

अभ्यासकांचं म्हणणं आहे की, व्यक्तीच्या मेंदूमध्ये नर्व्सचे कार्य, विकासाशी निगडीत प्रक्रिया गर्भापासून सुरू होऊन अनेक दशकांपर्यंत सुरू असते. मेंदूच्या विकासाची प्रक्रिया आणि त्यामुळे होणाऱ्या बदलांचा तरूणांच्या व्यवहारावर मुख्य प्रभाव पडत असतो. याने ते मानसिक समस्यांबाबत अतिसंवेदनशील होतात. 

किशोरावस्था संपल्यावरही सुरू असतो विकास

किशोरावस्थेदरम्यान अनेकदा लहान मुलांमध्ये व्यवहाराशी संबंधित समस्या बघायला मिळतात. याकडे या वयात मेंदूमध्ये होणाऱ्या बदलांशी जोडून बघितलं जातं आणि असं मानलं जातं की, किशोरावस्था संपल्यावर ही समस्या दूर होईल, पण असं नसतं. 

कॅम्ब्रिज विश्वविद्यालयात न्यूरोसायंटिस्टचे प्राध्यापक पीटर जोन्स यांच्यानुसार, 'बालपणापासून प्रौढ स्थितीत पोहोचण्याबाबत जी परिभाषा मानत आलो आहोत, आता ती बालिश वाटायला लागली आहे'.

मेंदूबाबत या सर्व गोष्टी मिथक

'बाल्यावस्थेपासून प्रौढ होताना मेंदूचा विकास फार सूक्ष्म होतो आणि ही प्रक्रिया साधारण तीन दशकांपर्यंत सुरूच असते. शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि कायदे व्यवस्थेने त्यांच्या सुविधेसाठी ही परिभाषा ठरवली आहे', असं ते म्हणाले.

प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूचा विकास वेगळा

कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील प्राध्यापक डेनिअल गेश्विंद यांनी यावर जोर दिला आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूच्या विकासाचा स्तर वेगवेगळा असतो. ते म्हणाले की, व्यावहारिक कारणांमुळे, शिक्षण प्रणालीने व्यक्तींऐवजी समूहांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी चूक केली आहे. 

अभ्यासकांनी स्किट्जोफ्रेनियासारख्या मनोवैज्ञानिक स्थितींवर पर्यावरणाच्या पडणाऱ्या प्रभावावर चर्चा केली. त्यांच्यानुसार, किशोरावस्था आणि अर्ली ट्वेन्टीजमध्ये स्किट्जोफ्रेनियाची लक्षणे दिसणे सामान्य बाब आहे. एकदा मेंदूने जर त्याचे सर्किट छाटले आणि पूर्णपणे त्याचा विकास झाला तेव्हा व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारच्या मनोविकृतीचा धोका कमी होतो. 

प्राध्यापक जोन्स यांच्यानुसार, जे लोक शहरांमध्ये राहतात, खासकरून गरीब आणि प्रवासी लोकांना आजूबाजूच्या पर्यावरणीय प्रभावांमुळे मानसिक विकारांचा धोका जास्त राहतो. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स