शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

प्रदूषणामुळे लहान मुलांमध्ये 'या' आजाराचा वाढतो धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 09:53 IST

प्रदूषण आणि स्मॉगची समस्या सध्या दिल्ली भारताचच्या काही भागांमध्ये डोकं वर काढत आहे.

प्रदूषण आणि स्मॉगची समस्या सध्या दिल्ली भारताचच्या काही भागांमध्ये डोकं वर काढत आहे. यामुळे अनेकांना केवळ श्वासासंबंधी आणि हृदयासंबंधीच समस्यांचा सामना करावा लागतो असे नाही तर लहान मुलांना ऑटिझमचाही धोका अधिक असतो. याकारणाने नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात इशारा देण्यात आला आहे की, ऑउटडोर प्रदूषण म्हणजेच गाड्यांमधून निघणारा आणि फॅक्टरींमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे लहान मुलांमध्ये ऑटिझमचा धोका ७८ टक्क्यांनी वाढतो. या शोधामध्ये चीनच्या शांघायमध्ये जन्मलेल्या मुलांचा अभ्यास करण्यात आला.

काय आहे ऑटिझम?

ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी (न्युरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे. मेंदूतील काही भागांच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानस‌कि क्षमता विकसित होत नाही. यामुळे अर्थबोध, विचार करण्याची क्षमता, वाचा, संवाद साधणे व वागणे यात समस्या निर्माण होतात. ही मुले इतर मुलांसारखी दिसत असली, तरी त्यांचे दैनंदिन जीवन इतरांसारखे नसते. ऑटिझमग्रस्त मुलांच्या काही समस्या वेगळ्या असतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.

९ वर्ष केलं गेलं परिक्षण

या अभ्यासात १२४ अशा मुलांना सहभागी करुन घेतले होते, जे आधीपासून ऑटिझमने ग्रस्त आहेत. तर १ हजार २४० सामान्य मुलांना सहभागी करुन घेतले होते. ९ वर्ष या मुलांवर अभ्यास करण्यात आला. दरम्यान वायु प्रदूषण आणि ऑटिझम यात काय संबंध आहे याचा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास एन्वायर्नमेंट इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. हा असा पहिला अभ्यास आहे ज्यात विकसनशील देशातील मुलांवर वायु प्रदूषणात जास्त वेळ राहणे आणि ऑटिझममध्ये संबंध असल्याचं सांगण्यात आलं आहे.

वातावरणातील इतरही काही गोष्टी कारणीभूत

चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसचे शिलिंग गुओ सांगतात की, 'ऑटिझम का होतो? आणि याचं कारणं शोधणं कठीण काम आहे. हे पूर्णपणे समजून घेता येत नाही. पण आंनुवांशिकता आणि इतर कारणांसोबतच वातावरणाशी संबंधित काही गोष्टींमुळे हा वाढतो. लहान मुलांचा मेंदू विकसीत होत असतो आणि अशावेळी वातावरणातील विषारी कण लहान मुलांच्या इम्यून सिस्टमसोबतच मेंदूच्या कार्यालाही प्रभावित करतात.

प्रदूषणामुळे इतक्यांचा होतो मृत्यू

WHO नुसार, दररोज वाढत्या प्रदूषण हा चिंतेचा विषय ठरतो आहे. कारण याने दरवर्षी ४.२ मिनियन म्हणजेच ४२ लाख लोकांचा मृत्यू होतो आहे. वातावरणातील प्रदूषित तत्वांमुळे चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये आजारांसोबतच वेळेआधी मृत्यू होणे अशाही घटना वेगाने वाढत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स