शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

प्रदूषणामुळे लहान मुलांमध्ये 'या' आजाराचा वाढतो धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 09:53 IST

प्रदूषण आणि स्मॉगची समस्या सध्या दिल्ली भारताचच्या काही भागांमध्ये डोकं वर काढत आहे.

प्रदूषण आणि स्मॉगची समस्या सध्या दिल्ली भारताचच्या काही भागांमध्ये डोकं वर काढत आहे. यामुळे अनेकांना केवळ श्वासासंबंधी आणि हृदयासंबंधीच समस्यांचा सामना करावा लागतो असे नाही तर लहान मुलांना ऑटिझमचाही धोका अधिक असतो. याकारणाने नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात इशारा देण्यात आला आहे की, ऑउटडोर प्रदूषण म्हणजेच गाड्यांमधून निघणारा आणि फॅक्टरींमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे लहान मुलांमध्ये ऑटिझमचा धोका ७८ टक्क्यांनी वाढतो. या शोधामध्ये चीनच्या शांघायमध्ये जन्मलेल्या मुलांचा अभ्यास करण्यात आला.

काय आहे ऑटिझम?

ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी (न्युरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे. मेंदूतील काही भागांच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानस‌कि क्षमता विकसित होत नाही. यामुळे अर्थबोध, विचार करण्याची क्षमता, वाचा, संवाद साधणे व वागणे यात समस्या निर्माण होतात. ही मुले इतर मुलांसारखी दिसत असली, तरी त्यांचे दैनंदिन जीवन इतरांसारखे नसते. ऑटिझमग्रस्त मुलांच्या काही समस्या वेगळ्या असतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.

९ वर्ष केलं गेलं परिक्षण

या अभ्यासात १२४ अशा मुलांना सहभागी करुन घेतले होते, जे आधीपासून ऑटिझमने ग्रस्त आहेत. तर १ हजार २४० सामान्य मुलांना सहभागी करुन घेतले होते. ९ वर्ष या मुलांवर अभ्यास करण्यात आला. दरम्यान वायु प्रदूषण आणि ऑटिझम यात काय संबंध आहे याचा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास एन्वायर्नमेंट इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. हा असा पहिला अभ्यास आहे ज्यात विकसनशील देशातील मुलांवर वायु प्रदूषणात जास्त वेळ राहणे आणि ऑटिझममध्ये संबंध असल्याचं सांगण्यात आलं आहे.

वातावरणातील इतरही काही गोष्टी कारणीभूत

चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसचे शिलिंग गुओ सांगतात की, 'ऑटिझम का होतो? आणि याचं कारणं शोधणं कठीण काम आहे. हे पूर्णपणे समजून घेता येत नाही. पण आंनुवांशिकता आणि इतर कारणांसोबतच वातावरणाशी संबंधित काही गोष्टींमुळे हा वाढतो. लहान मुलांचा मेंदू विकसीत होत असतो आणि अशावेळी वातावरणातील विषारी कण लहान मुलांच्या इम्यून सिस्टमसोबतच मेंदूच्या कार्यालाही प्रभावित करतात.

प्रदूषणामुळे इतक्यांचा होतो मृत्यू

WHO नुसार, दररोज वाढत्या प्रदूषण हा चिंतेचा विषय ठरतो आहे. कारण याने दरवर्षी ४.२ मिनियन म्हणजेच ४२ लाख लोकांचा मृत्यू होतो आहे. वातावरणातील प्रदूषित तत्वांमुळे चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये आजारांसोबतच वेळेआधी मृत्यू होणे अशाही घटना वेगाने वाढत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स