शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या पोहोचपासून आदिवासी वाडया, दुर्गम भाग दूरच वर्षभरात गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिम जिल्हयात सुमार कामगिरी

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

सर्वआवृत्तींसाठीपुणे : राज्यात राहणार्‍या गरीबातील गरीब व्यक्तीला तातडीच्या वेळी दारात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, त्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) गेल्या वर्षभरात आदिवासी वाडया व दुर्गम भागापासून दूरच राहिली आहे. गेल्या वर्षभरात मोठया शहरांमध्यील नागरिकांनाच ही सेवा सर्वाधिक देण्यात आलेली आहे. आदिवासी व दुर्गम जिल्हे असलेल्या गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिममध्ये या सेवेची कामगिरी सुमारच ठरली आहे.

सर्वआवृत्तींसाठीपुणे : राज्यात राहणार्‍या गरीबातील गरीब व्यक्तीला तातडीच्या वेळी दारात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, त्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) गेल्या वर्षभरात आदिवासी वाडया व दुर्गम भागापासून दूरच राहिली आहे. गेल्या वर्षभरात मोठया शहरांमध्यील नागरिकांनाच ही सेवा सर्वाधिक देण्यात आलेली आहे. आदिवासी व दुर्गम जिल्हे असलेल्या गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिममध्ये या सेवेची कामगिरी सुमारच ठरली आहे.
तातडीच्या वेळी वैद्यकीय सेवा न मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण राज्यात खूप आहे. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी एकाच क्रमांकाची राज्यव्यापी रुग्णवाहिका सेवा असावी म्हणून गेल्यावर्षी २६ जानेवारीला राज्यशासनाच्या आरोग्य विभागाने कोटयावधी रूपये खर्च करून महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस सुरू केली होती. यासाठी राज्यभरात ९३७ अत्याधुनिक रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या. 'एक फोन करा तुम्ही कोठेही राहत असला तरी तुम्हाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका तुमच्या दारासमोर अवघ्या काही मिनिटांमध्ये उभी राहिल, अशी डरकाळी त्यावेळी राज्यशासनाने फोडली होती. मात्र या सेवेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीवरून ही डरकाळी फक्त डरकाळीच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
दि. २६ जानेवारी २०१४ ते २६ जानेवारी २०१५ या वर्षभरात गडचिरोलीतील केवळ १ हजार ४८५ जणांनाच या सेवेचा लाभ मिळाला आहे. त्यापाठोपाठ वर्धा जिल्हयात १ हजार ६१७ जणांना, सिंधुदुर्ग जिल्हयात १ हजार ७८२ लोकांना, रत्नागिरी जिल्हयात २ हजार १०० लोकांना, भंडारा जिल्हयातील २ हजार ६१० जणांना, नंदूरबार जिल्हयात २ हजार ८२५ जणांना, रायगड जिल्हयात ३ हजार १२ जणांना, वाशिम जिल्हयात केवळ २ हजार ६४६ जणांनाच या सेवेचा लाभ मिळाला आहे.
याउलट मोठया शहरांमध्ये या सेवेने दुहेरी आकडा गाठला आहे. मुंबई जिल्हयामध्ये एकूण १७ हजार ९१२ जणांना, पुणे जिल्हयात १५ हजार ३१६ जणांना, नागपूर जिल्हयात ८ हजार १४१ जणांना, नांदेड जिल्हयात ८ हजार ५०३ जणांना, नाशिकमध्ये १० हजार १६९ जणांना, ठाणे जिल्हयात १० हजार २१२ जणांना या सेवेचा लाभ देण्यात आला आहे.
या दोन्ही आकडेवारींची तुलना करता आदिवासी वाडयांवर, दुर्गम भागांमध्ये ही सेवा पोहोचतच नसल्याचे सिध्द होत आहे.