शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या पोहोचपासून आदिवासी वाडया, दुर्गम भाग दूरच वर्षभरात गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिम जिल्हयात सुमार कामगिरी

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

सर्वआवृत्तींसाठीपुणे : राज्यात राहणार्‍या गरीबातील गरीब व्यक्तीला तातडीच्या वेळी दारात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, त्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) गेल्या वर्षभरात आदिवासी वाडया व दुर्गम भागापासून दूरच राहिली आहे. गेल्या वर्षभरात मोठया शहरांमध्यील नागरिकांनाच ही सेवा सर्वाधिक देण्यात आलेली आहे. आदिवासी व दुर्गम जिल्हे असलेल्या गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिममध्ये या सेवेची कामगिरी सुमारच ठरली आहे.

सर्वआवृत्तींसाठीपुणे : राज्यात राहणार्‍या गरीबातील गरीब व्यक्तीला तातडीच्या वेळी दारात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, त्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) गेल्या वर्षभरात आदिवासी वाडया व दुर्गम भागापासून दूरच राहिली आहे. गेल्या वर्षभरात मोठया शहरांमध्यील नागरिकांनाच ही सेवा सर्वाधिक देण्यात आलेली आहे. आदिवासी व दुर्गम जिल्हे असलेल्या गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिममध्ये या सेवेची कामगिरी सुमारच ठरली आहे.
तातडीच्या वेळी वैद्यकीय सेवा न मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण राज्यात खूप आहे. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी एकाच क्रमांकाची राज्यव्यापी रुग्णवाहिका सेवा असावी म्हणून गेल्यावर्षी २६ जानेवारीला राज्यशासनाच्या आरोग्य विभागाने कोटयावधी रूपये खर्च करून महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस सुरू केली होती. यासाठी राज्यभरात ९३७ अत्याधुनिक रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या. 'एक फोन करा तुम्ही कोठेही राहत असला तरी तुम्हाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका तुमच्या दारासमोर अवघ्या काही मिनिटांमध्ये उभी राहिल, अशी डरकाळी त्यावेळी राज्यशासनाने फोडली होती. मात्र या सेवेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीवरून ही डरकाळी फक्त डरकाळीच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
दि. २६ जानेवारी २०१४ ते २६ जानेवारी २०१५ या वर्षभरात गडचिरोलीतील केवळ १ हजार ४८५ जणांनाच या सेवेचा लाभ मिळाला आहे. त्यापाठोपाठ वर्धा जिल्हयात १ हजार ६१७ जणांना, सिंधुदुर्ग जिल्हयात १ हजार ७८२ लोकांना, रत्नागिरी जिल्हयात २ हजार १०० लोकांना, भंडारा जिल्हयातील २ हजार ६१० जणांना, नंदूरबार जिल्हयात २ हजार ८२५ जणांना, रायगड जिल्हयात ३ हजार १२ जणांना, वाशिम जिल्हयात केवळ २ हजार ६४६ जणांनाच या सेवेचा लाभ मिळाला आहे.
याउलट मोठया शहरांमध्ये या सेवेने दुहेरी आकडा गाठला आहे. मुंबई जिल्हयामध्ये एकूण १७ हजार ९१२ जणांना, पुणे जिल्हयात १५ हजार ३१६ जणांना, नागपूर जिल्हयात ८ हजार १४१ जणांना, नांदेड जिल्हयात ८ हजार ५०३ जणांना, नाशिकमध्ये १० हजार १६९ जणांना, ठाणे जिल्हयात १० हजार २१२ जणांना या सेवेचा लाभ देण्यात आला आहे.
या दोन्ही आकडेवारींची तुलना करता आदिवासी वाडयांवर, दुर्गम भागांमध्ये ही सेवा पोहोचतच नसल्याचे सिध्द होत आहे.