शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

‘क्षणा’चं रूपांतर ‘आठवणी’त झालं की संपलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:21 IST

Health: आज फुललेलं फूल काहीच काळाने कोमेजून जातं. आपल्या जगण्याबद्दल आणि त्यातल्या असंख्य आठवणींबद्दल हेच सत्य असतं. एकदा फूल कोमेजलं, की ते कसं कोमेजलं असं म्हणण्यात अर्थ नसतो. फुललेलं असतं तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जिवंत असतं.

- - डॉ. श्रुती पानसे (मेंदू आणि शिक्षण अभ्यासक)आज फुललेलं फूल काहीच काळाने कोमेजून जातं. आपल्या जगण्याबद्दल आणि त्यातल्या असंख्य आठवणींबद्दल हेच सत्य असतं. एकदा फूल कोमेजलं, की ते कसं कोमेजलं असं म्हणण्यात अर्थ नसतो. फुललेलं असतं तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जिवंत असतं.

असं म्हणतात की, आपण प्रत्येक क्षण जगायला हवा. प्रत्येक क्षणाला आपण सजग राहायला हवं। यालाच इंग्रजीत माइंडफुलनेस असं म्हणतात. अनेकदा आपण सवयीने काही गोष्टी करत राहतो. सवयीने जेवतो. काम करतो. एखाद्या छान गोष्टीचा आस्वादसुद्धा तितक्याशा सजगपणे घेत नाही. आला क्षण.. गेला क्षण... अशा पद्धतीने आपण जगत असतो आणि असं जगत असताना हे विसरूनच जातो की आत्ताचा क्षण हाच काय तो जिवंत आहे. अजून दोनच सेकंदांनी जेव्हा आत्ताचा क्षण मागे पडेल, तेव्हा तो क्षण असणार नाही, तर  ती एक आठवण असेल. ‘आत्ता मी माझ्या मैत्रिणीशी बोलते आहे, हे वाक्य दोनच मिनिटानंतर एक आठवण बनवून राहणार आहे.’ म्हणून प्रत्येक जिवंत क्षणाचं महत्त्व खूप मोठं आहे.

म्हणून दुसऱ्याच क्षणी भूतकाळात जमा होणारा तो क्षण जास्तीत जास्त छान, अर्थपूर्ण, समाधानात असला पाहिजे. एकदा का तो क्षण निघून गेला आणि त्या ‘क्षणा’चं रूपांतर ‘आठवणी’त झालं की मग आपल्याला काहीच करता येत नाही. 

योग करतानासुद्धा सजगतेचं फार महत्त्व आहे. कुठलाच क्षण आला तसा जाऊ द्यायचा नाही. प्रत्येक श्वास हा काहीतरी सांगतो आहे. येणारा प्रत्येक क्षण हा नवीन काहीतरी घेऊन येतो आहे, ही जाणीव असणं म्हणजेच सजगता.

जर आपण तो तो श्वास, तो तो क्षण जगला, अगदी उत्कटतेने जगला, तर अशा क्षणांच्या आठवणी तितक्याशा पुसट होणार नाहीत. नवीन कोणतीही गोष्ट शिकताना, मुलं अभ्यास करत असतात तेव्हा, निसर्गात फिरताना अगदी रोजचं काम पुन्हा पुन्हा करतानाही प्रत्येक क्षणाकडे लक्ष हवं. प्रत्येकश्वासाकडे लक्ष हवं. हे केलं तर आठवणी निर्माण होतील; पण त्या सहजपणे पुसल्या जाणार नाहीत आणि हेच तर आपल्याला हवं असतं!..(shruti.akrodcourses@gmail.com)

टॅग्स :Healthआरोग्य