शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

‘क्षणा’चं रूपांतर ‘आठवणी’त झालं की संपलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:21 IST

Health: आज फुललेलं फूल काहीच काळाने कोमेजून जातं. आपल्या जगण्याबद्दल आणि त्यातल्या असंख्य आठवणींबद्दल हेच सत्य असतं. एकदा फूल कोमेजलं, की ते कसं कोमेजलं असं म्हणण्यात अर्थ नसतो. फुललेलं असतं तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जिवंत असतं.

- - डॉ. श्रुती पानसे (मेंदू आणि शिक्षण अभ्यासक)आज फुललेलं फूल काहीच काळाने कोमेजून जातं. आपल्या जगण्याबद्दल आणि त्यातल्या असंख्य आठवणींबद्दल हेच सत्य असतं. एकदा फूल कोमेजलं, की ते कसं कोमेजलं असं म्हणण्यात अर्थ नसतो. फुललेलं असतं तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जिवंत असतं.

असं म्हणतात की, आपण प्रत्येक क्षण जगायला हवा. प्रत्येक क्षणाला आपण सजग राहायला हवं। यालाच इंग्रजीत माइंडफुलनेस असं म्हणतात. अनेकदा आपण सवयीने काही गोष्टी करत राहतो. सवयीने जेवतो. काम करतो. एखाद्या छान गोष्टीचा आस्वादसुद्धा तितक्याशा सजगपणे घेत नाही. आला क्षण.. गेला क्षण... अशा पद्धतीने आपण जगत असतो आणि असं जगत असताना हे विसरूनच जातो की आत्ताचा क्षण हाच काय तो जिवंत आहे. अजून दोनच सेकंदांनी जेव्हा आत्ताचा क्षण मागे पडेल, तेव्हा तो क्षण असणार नाही, तर  ती एक आठवण असेल. ‘आत्ता मी माझ्या मैत्रिणीशी बोलते आहे, हे वाक्य दोनच मिनिटानंतर एक आठवण बनवून राहणार आहे.’ म्हणून प्रत्येक जिवंत क्षणाचं महत्त्व खूप मोठं आहे.

म्हणून दुसऱ्याच क्षणी भूतकाळात जमा होणारा तो क्षण जास्तीत जास्त छान, अर्थपूर्ण, समाधानात असला पाहिजे. एकदा का तो क्षण निघून गेला आणि त्या ‘क्षणा’चं रूपांतर ‘आठवणी’त झालं की मग आपल्याला काहीच करता येत नाही. 

योग करतानासुद्धा सजगतेचं फार महत्त्व आहे. कुठलाच क्षण आला तसा जाऊ द्यायचा नाही. प्रत्येक श्वास हा काहीतरी सांगतो आहे. येणारा प्रत्येक क्षण हा नवीन काहीतरी घेऊन येतो आहे, ही जाणीव असणं म्हणजेच सजगता.

जर आपण तो तो श्वास, तो तो क्षण जगला, अगदी उत्कटतेने जगला, तर अशा क्षणांच्या आठवणी तितक्याशा पुसट होणार नाहीत. नवीन कोणतीही गोष्ट शिकताना, मुलं अभ्यास करत असतात तेव्हा, निसर्गात फिरताना अगदी रोजचं काम पुन्हा पुन्हा करतानाही प्रत्येक क्षणाकडे लक्ष हवं. प्रत्येकश्वासाकडे लक्ष हवं. हे केलं तर आठवणी निर्माण होतील; पण त्या सहजपणे पुसल्या जाणार नाहीत आणि हेच तर आपल्याला हवं असतं!..(shruti.akrodcourses@gmail.com)

टॅग्स :Healthआरोग्य